शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

ब्राम्हणों से जाती व्यवस्था के विरुद्ध विद्रोह करने की आशा नहीं कर सकते

"ब्राम्हणों से आशा नहीं कर सकते कि वे जाति व्यवस्था के विरुद्ध विद्रोह करें, क्योंकि यह व्यवस्था उनको कुछ विशिष्ट विशेषाधिकार देती है और वे पदानुक्रम में अपनी विशिष्ट स्थिति और वर्त्तमान सर्वोच्चता को स्वेच्छा से नहीं छोड़ेंगे। उनसे यह आशा करना बहुत अधिक होगा कि वे अपने सभी विशेषाधिकारों को छोड़ दे जैसा कि जापान के 'सामुराइयों' ने किया था। हम गैर-ब्राम्हणों पर भी विश्वास नहीं कर सकते, और उनसे अपनी लड़ाई लड़ने को नहीं कह सकते। उनमें से बहुत से तो अभी भी जाति व्यवस्था के प्रति आसक्त है और ब्राम्हणों के हाथों की कठपुतलियां है, इन अन्य लोगों में से अधिकतर लोग, जो ब्राम्हणों की सर्वोच्चता से अप्रसन्न है, दलित वर्गों के स्तर को ऊंचा उठाने की बजाए ब्राम्हणों के स्तर को नीचा करने में अधिक रूचि रखते है, वे भी चाहते है कि लोगों का एक ऐसा वर्ग हो जिसको वे तुच्छ समझ सकें तथा उन्हें यह संतोष हो कि वे समाज के नितांत अभागे व्यक्ति नहीं है। इसका मतलब यह है कि हमें स्वयं पर विश्वास करते हुए अपनी लड़ाइयां अपने आप ही लड़नी चाहिए।"

- डॉ. बाबासाहेब अम्बेडकर
संदर्भ - बाबासाहेब डॉ. अम्बेडकर सम्पूर्ण वाङ्गमय खंड 35 (पेज 23)

वर्ण व्यवस्था के बारे में मा. गांधी के विचार

 वर्ण-धर्म में हर वर्ण को अपना अपना काम धर्म समझकर करना है। पेट भरना तो इसका थोड़ा सा फल है। यह मिले या न मिले तो भी चारों वर्ण कों अपने अपने धर्म में लगा रहना चाहिए।

शुद्र का तो कहना ही क्या? और अगर किसी भी तरह मुकाबिला किया जा सकता है तो शुद्र सिर्फ धर्म समझकर सेवा ही करता है। जिसके पास कोई जायदाद कभी होनेवाली ही नहीं और जिसे मालिक बनने का लालच तक नहीं, वह हजार नमस्कार के लायक है और सबसे ऊंचा है। धर्म पर चलने वाला शुद्र अपने बारे में ऐसा न समझेगा, लेकिन देवता तो उसपर फूल बरसाएंगे।

अब रोटी-बेटी व्यवहार के बारे में जाँच करे। मैं मानता हूँ कि एकराष्ट्रीयता या कौमियत भावको फैलाने के खातिर एक थाली में खाना या चाहे जिसके साथ शादी करने की छूट लेना जरुरी नहीं है।
- मा. गांधी

वर्ण यानी इंसानके धंदे का चुनाव का पहलेसे किया हुआ फैसला। आदमी अपने गुजारे के लिए बापदादोंका ही पेशा करे, इसका नाम वर्ण-धर्म.
- मा. गांधी

शुद्र को ज्ञान पाने का उतना ही हक़ है जितना ब्राम्हण को। लेकिन वह अपना गुजारा लोगो को लिखा-पढ़ाकर करने की कोशिश करे, तो वह जरूर वर्ण-धर्म से गिर जाएगा। बाप दादा का धंदा ही उसकी पसंद का अकेला धंदा होना चाहिए। यह पेशा पसंद करने में कोई बुराई नहीं। उलटे इसमे कुलीनता है। आज हम सतरंगे आदमी देखते है। इसीसे समाज में हिंसा फैली हुई है और समाज तितर-बितर हो गया है। बापका धंदा करने वाले बढई के लडके हजारो होंगे, जबकि वकिलका धंदा करने वाले बढई के छोकरे शायद सौ भी न हो।
- मा. गांधी

श्री गांधी की उपलब्धि के बारे में श्री बोल्टन का कथन

गोलमेज संमेलनाच्या काळात देशातील सर्व मोठमोठे उद्योगपती गांधींच्या पाठीशी होते. त्यांच्या दानावरच काँग्रेसचे काम चालत होते. अस्पृश्यांचा हितशत्रू बहुतांश ब्राम्हण-ब्राम्हणेत्तर वर्ग गांधींच्या पाठीशी होता. देशातील सर्व सवर्ण चाटुकार मीडिया गांधींच्या पाठीशी होता. एवढं सगळ असूनही काही निपक्ष लोक होते जे गांधींच्या चुकीच्या वागणुकीवर बोट ठेवत होते. त्यापैकी एक त्यांचे मित्र श्री बोल्टन होते.

काय म्हणतात ते मा. गांधीबाबत?
प्रस्तुत है गोलमेज सम्मलेन में श्री गांधी की उपलब्धि के बारे में श्री बोल्टन का कथन : 'कूटनीतिज्ञ और राजनेता के रूप में श्री गांधी का क्या योगदान रहा?
मेरे विचार में यह कहना अनुचित नहीं होगा कि श्री गांधी ने सम्मलेन में नया मतभेद पैदा कर दिया। उन्होंने हर भारतीय प्रतिनिधि की खिल्ली उड़ाने की बचकाना हरकत शुरू कर दी। उन्होंने उनकी ईमानदारी और उनके प्रतिनिधि स्वरूप पर अंगुली उठाई। उन्होंने उदारपंथियों पर छीटाकाशी करते हुए कहा कि वे तो कोरे सिद्धांत बघारने वाले निष्क्रिय राजनेता है और उनके कोई समर्थक नहीं है। मुस्लिमों के बारे में उन्होंने कहा कि उनसे कहीं बेहतर प्रतिनिधित्व तो मुसलमानों का वह करते है। उन्होंने दावा किया कि दलित वर्गों का प्रतिनिधित्व तो वह करते है, न कि दलित वर्ग के प्रतिनिधि। अपने हर भाषण के अंत में वह यही बात बार-बार दोहराते थे और उससे घृणा-सी होने लगी थी। गैर -काँग्रेसी प्रतिनिधियों को सभी ईमानदार लोगों की ओर से धन्यवाद मिलना चाहिए कि उन्होंने श्री गांधी की इस बकवास और दंभ को सहन किया। उन्होंने न केवल श्री गांधी का बचाव करने के लिए उनसे सहयोग किया, बल्कि देश को उनकी गलती से बचाया। साथी प्रतिनिधियों के प्रति इस अभद्रता के अलावा क्या श्री गांधी उस ध्येय का समर्थन कर सके, जिसकी वकालत करने के लिए वह गए थे? वह ऐसा नहीं कर सके। उनका कार्य-संचालन अपयशकारी था। विरोध और संघर्ष के स्थान पर वह उन मामलों पर घुटने टेकने लगे, जिनके बारे में उन्हें कभी हथियार नहीं डालने चाहिए थे। वह नरेशों के आगे झुक गए और उन्होंने उनकी यह बात स्वीकार कर ली कि संघात्मक विधान-मंडल में अपने प्रतिनिधि वे स्वयं मनोनीत करेंगे। प्रतिनिधि चुने नहीं जाएंगे, जैसे कि मांग उनके प्रजा-जनों ने की थी। वह अनुदारपंथियों के आगे झुक गए और प्रांतीय स्वायत्तता से संतुष्ट होने के लिए राजी हो गए। वह इस बात के लिए सहमत हो गए कि केंद्रीय दायित्व पर आग्रह नहीं किया जाएगा, जिसके लाखो भारतीय जेल गए थे। केवल वह अल्पसंख्यको के आगे नहीं झुके। यही वह एकमात्र पक्ष था, जिसके आगे वह झुक सकते थे और अपनी प्रतिष्ठा बढ़ा सकते थे तथा देश का भला कर सकते थे।
श्री गांधी की प्रतिष्ठा को ध्वस्त करने में सबसे अधिक योगदान गोलमेज सम्मलेन में उनकी भागीदारी ने किया। जिस भूमिका को निभाने का दायित्व उन्होंने लिया, उसके लिए वह उपयुक्त नहीं थे। किसी भी देश ने कभी भी संविधान-रचना के लिए ऐसा प्रतिनिधि नहीं भेजा था, जिसे न तो पूरा प्रशिक्षण मिला था, और न ही उसने पूरा अध्ययन किया था। गोलमेज सम्मलेन में श्री गांधी अपनी जुबान पर संत नरसी मेहता का गीत लेकर गए। उनके लिए और देश के लिए बेहतर तो यही होता कि वह अपने साथ तुलनात्मक संवैधनिक विधि का एक ग्रंथ ले जाते। जिस विषय का निपटारा उन्हें करना था, उसका ज्ञान उन्हें नहीं था। अत: वह इस बारे में नितांत असमर्थ और असहाय थे कि वह ब्रिटिश प्रस्तावों का खंडन कर सके या उनके जबाब में अपने वैकल्पिक प्रस्ताव रख सके। तो इसमे अचरज कैसा, यदि अपने भक्तों की टोली से बिछुड़े और राजनेताओं के चक्कर में फंसे श्री गांधी किंकर्तव्यविमूढ़ हो गए। हर मोड़ पर उन्होंने गड़बड़ी की और जब देखा कि उससे भी काम नहीं चलेगा तो वह हताश होकर भारत लौट आए।

बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना

मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मी इतकं उच्च शिक्षण कसं काय घेतलं? दुसरा प्रश्न विचारला जातो माझा कल बुद्ध धम्माकडे कसा काय झुकला? हे प्रश्न मला विचारले जातात, त्याचं कारण मी ज्या समाजात जन्मलो तो समाज भारतात ‘अस्पृश्य’ मानला जातो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याची ही जागा नाही. पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रस्तावनेत देणं उपयोगी ठरू शकेल.

या प्रश्नाचं थेट उत्तर असं की, बुद्धाचा धम्म हा श्रेष्ठ आहे. अन्य कुणाही धर्माशी त्याची तुलनाच होऊ शकत नाही. विज्ञाननिष्ठ आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल, तर स्वीकारार्ह असा एकच धर्म म्हणजे बुद्धांचा धर्म. हा जो विश्वास मी व्यक्त करतो आहे, ते मत गेल्या पस्तीस वर्षांत सर्व धर्माचा बारकाईने अभ्यास केल्याने दृढ झालं आहे. मी बुद्ध धम्माच्या अभ्यासाकडे कसा वळलो याची वेगळी कथा आहे. ती जाणून घेणं वाचकांना आवडेल असं वाटतं. 

माझे वडील सैन्यात अधिकारी होते, त्याचबरोबर ते एक धार्मिक गृहस्थही होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवलं. लहानपणापासून मला वडिलांच्या धार्मिक जीवनात काही अंतर्विरोध जाणवायचे. माझ्या वडिलांचे वडील रामानंदी असले तरी वडील कबीरपंथी होते. त्यांचा विश्वास मूर्तिपूजेवर नसला, तरी ते आमच्यासाठी गणपतीची पूजा करायचे. हे मला आवडायचं  नाही. पंथाच्या पुस्तकांचं त्यांचं वाचन होतं. असं असलं तरीही मी आणि माझे मोठे बंधू यांनी आमच्या बहिणी, जमलेल्या अन्य मंडळींना रामायण आणि महाभारतातला काही भाग दररोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी वाचून दाखवला पाहिजे, यासाठी वडील भाग पाडायचे. पुढची अनेक वर्ष हे सुरू राहिलं.

इंग्रजी चौथीची परीक्षा मी पास झालो, त्या वर्षी माझ्या समाजातल्या लोकांनी माझं अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा आयोजित करावी असं त्यांना वाटतं होतं. इतर समाजातली शैक्षणिक स्थिती लक्षात घेता हा काही साजरा करावा असा प्रसंग नव्हता. पण इथपर्यंत पोचलेला आमच्या समाजातला मी पहिलाच मुलगा आहे, असं या सभेच्या आयोजकांना वाटत होतं. त्यांना मी मोठी उंची गाठली आहे असं वाटलं.

ते परवानगी घ्यायला वडिलांकडे गेले. असलं काही केल्यानं मुलं बिघडतात असं सांगून त्यांनी  परवानगी नाकारली. फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काय केलं त्याने? असं म्हणाल्याने आयोजकांची निराशा झाली. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. 

माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळूसकर यांना भेटले आणि मध्यस्थी करायला सांगितली. दादांनी ती मान्यही केली. थोड्या युक्तिवादानंतर वडील ऐकले आणि ती सभा झाली. दादा केळूसकर सभेचे अध्यक्ष होते. ते त्यांच्या काळातील साहित्यिक. त्यांचं भाषण झाल्यानंतर मला बक्षीस म्हणून त्यांनी बुद्धांच्या जीवनावरचं बडोदा सयाजीराव ओरिएण्टल सीरिजसाठी लिहिलेलं पुस्तक भेट म्हणून दिलं. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचलं. फार प्रभावित आणि प्रेरित झालो.

मला प्रश्न पडला की वडिलांनी बौद्ध साहित्याची ओळख आम्हाला का करून दिली नाही. हा प्रश्न माझ्या वडिलांनाही विचारण्याचा निश्चय केला. एके दिवशी तो विचारलाही. मी विचारलं, की ब्राह्मण क्षत्रिय उच्च जातींचेच गोडवे गाऊन शूद्र आणि अस्पृश्यांच्या अधःपतनाच्या कथाच वारंवार सांगणाऱ्या रामायण आणि महाभारतातल्या कथा वाचायला का सांगता? हा प्रश्न वडिलांना आवडला नाही.

ते इतकंच म्हणाले, ‘तू असले मूर्ख प्रश्न विचारू नकोस. तुम्ही अद्याप लहान आहात. सांगितलं तेवढं ऐकायला पाहिजे.’ माझे वडील म्हणजे जणू रोमन हुकूमशहा सारखेच होते आणि आम्हा मुलांवर ते हुकूमशाही गाजवायचे. मीच एकटा मोकळीक घेऊन त्यांच्याशी बोलू लागलो होतो. माझी आई लहानपणीच वारल्याने आत्याच्या देखरेखीखाली मी वाढलो होतो.

काही काळाने मी त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारला. यावेळी नक्कीच माझ्या वडिलांनी मला उत्तर देण्याची तयारी ठेवली होती. ते म्हणाले, ‘मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचायला सांगतो कारण आपण अस्पृश्य आहोत. त्यामुळे तुझ्यात न्यूनगंड येईल, हे स्वाभाविक आहे. तो दूर करायला रामायण आणि महाभारताची मदत होईल. द्रोण आणि कर्ण यांच्याकडे पाहा. ती सामान्य माणसं. त्यांनी मोठी उंची गाठली होती. वाल्मिकीकडे पाहा. तो मूळचा कोळी होता. पण त्याने रामायण लिहिलं. अशा प्रकारे तुमच्यातला न्यूनगंड घालवण्यासाठी मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचावयास सांगतो.’

माझ्या वडिलांच्या म्हणण्यात तथ्य होतं पण माझं समाधान झालं नाही. मी वडिलांना सांगितलं की, मला महाभारतातली कोणतीच पात्रं आवडत नाहीत. मी म्हणालो, ‘मला भीष्म आणि द्रोणच काय, पण महाभारतातला कृष्णसुद्धा पटत नाही. भीष्म आणि द्रोण हे ढोंगी आहेत कारण त्यांनी सांगितलं एक आणि केलं दुसरंच. कृष्णाचाही लबाडीवर विश्वास होता. त्याचे जीवनचरित्र लबाडय़ांनी भरलेले आहे. तितकीच अढी मला रामाबद्दलही आहे. शूर्पणखा प्रकरणात, वाली सुग्रीव प्रकरणातलं त्याचं वर्तन पाहा. सीतेशीही अमानुष वागले.’

यावर माझे वडील शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिलं नाही. बंड झालं आहे, याची त्यांना कल्पना आलेली होती.

दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. लहान वयातच बुद्धाकडे वळलो तरी रिकाम्या डोक्याने वळलो नाही. मला पार्श्वभूमी होती. बुद्धांच्या कथा मला माहीत झाल्यानंतर त्यांची तुलना करायचो. त्यातला विरोधाभास पाहणं शक्य होतं. बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यात रस घेण्याची माझी सुरवात ही अशी आहे.

हे पुस्तक लिहिण्याची कुळकथा वेगळी आहे. कलकत्त्याच्या ‘महाबोधी सोसायटीज् जर्नल’च्या संपादकांनी १९५१ सालच्या त्यांच्या वैशाख अंकासाठी मला एक लेख लिहायला सांगितला. या लेखात मी असं  म्हटल होतं की, विज्ञाननिष्ठ  समाजाने स्वीकारावा असा बुद्ध धम्म हा एकमेव धर्म आहे. अन्यथा त्या समाजाचा ऱ्हास होऊ शकतो. मी असंही म्हटलं होतं की, आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचं तर बुद्ध धम्माची कास धरावी लागेल.

बुद्ध धम्माची वाटचाल मंद गतीने व्हायचं कारण असं की, या धर्माचं साहित्य इतकं अधिक आहे की कुणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही. या धर्माला ख्रिस्तीधर्मीयांच्या ‘बायबल’सारखा एकच एक ग्रंथ नाही, ही यामागची मोठी अडचण ठरते आहे. या लेखानंतर मला अनेकांनी पत्राने आणि तोंडी विनंत्या केल्या की, असं एखादं पुस्तक तुम्हीच लिहा. त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे काम हाती घेतलं.

टीका होण्याआधीच मी हे स्पष्ट करू इच्छितो की, या पुस्तकात मूळचं असं माझं काही नाही. अनेक पुस्तकातलं साहित्य याकरता जमवलं आहे. अश्वघोषाच्या ‘बुद्धचरित’ ग्रंथाचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. यातली काव्य प्रतिभा उत्कृष्ट आहे. काही प्रसंगांच्या वर्णनासाठी तर मी त्यातली भाषा शैली उचलली आहे. 

माझं मूळ काम जर या पुस्तकात काही असेल तर ते एवढंच की, मी मुद्दय़ांची केलेली मांडणी होय. त्यात  स्पष्टता आणि सुलभपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. बुद्ध धम्माच्या अभ्यासकांना यातल्या काही बाबी डोकेदुखीसारख्या वाटतील, याचा उहापोह मी पुस्तकाच्या परिचयात केला आहे.

ज्या सगळ्यांची या कामात मदत झाली त्या सगळ्यांचे आभार मानतो. साकरुली गावचे नानकचंद रत्तू आणि नांगल खुर्द जिल्हा होशियारपूर, पंजाब इथे राहणारे प्रकाश चंद यांनी पुस्तकाचे हस्तलिखित टाइप करून दिले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विशेषत: नानकचंद रत्तू यांनी आपल्या तब्येतीची काळजी न करता तसंच आर्थिक अपेक्षा न ठेवता, केवळ माझ्यावरच्या प्रेमापोटी हे काम केलं. त्यांच्या कष्टाचं मोल करता येणार नाही.

मी या पुस्तकाची जुळवाजुळव सुरू केली तेव्हापासून आजारी होतो. आताही आजारीच आहे. या गेल्या पाच वर्षांच्या काळात माझ्या प्रकृतीत बरेच चढउतार झाले. काही वेळा तर माझी परिस्थिती अशी होती की डॉक्टर मला विझणारी ज्योत समजायचे. या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देण्याचं काम माझी पत्नी आणि माझ्यावर उपचार करणारे डॉ. मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झालं. मी त्यांचा हार्दिक आभारी आहे. त्यांनीच हे काम तडीस न्यायला मदत केली आहे. संपूर्ण पुस्तकाच्या मुद्रितशोधनात रस घेणारे एम. बी. चिटणीस यांचेही आभार.

मी हे नमूद करू इच्छितो की, हे पुस्तक तीन पुस्तकांपैकी एक असून त्या तीन पुस्तकांमुळे बुद्ध धम्माचे योग्य आकलन व्हायला मदत होईल. अन्य दोन पुस्तकं पहिलं ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्‍स’ आणि दुसरं ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ अशी आहेत. त्यांपैकी काही भाग लिहून झाले असून, तीही लवकरच प्रकाशित होतील.

(समता सैनिक दलाने प्रकाशित केलेल्या बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकातल्या प्रस्तावनेवर आधारित.)

गांधींचा अस्पृश्यांच्या स्वतंत्र आंदोलनाला विरोध का?

अनुसूचित जाती, जमातींनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला की काँग्रेसच्या सरंजामी, जातीयवाद्यांकडून त्यांना बी टीम ठरविणे ही वृत्ती काही आजची नाही. ही वृत्ती वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करणा-या मा. गांधींपासून चालत आलेली आहे. डॉ. आंबेडकरांच्या काळात अस्पृश्य जेंव्हा स्वतंत्ररित्या आंदोलने करीत होते त्यावेळेस मा. गांधींची भूमिका सुद्धा अशीच होती. त्यावेळेस मा. गांधींनी जे तर्क प्रस्तुत केले ते वाचले तर मा. गांधी आणि आजचे काँग्रेसी सरंजामी, जातीयवादी यांच्यात फार मोठा काही फरक आहे असे दिसून येत नाही.

याविषयी डॉ. आंबेडकर काय म्हणतात?

"काँग्रेस-जनो और श्री गांधी ने उन अस्पृश्यों की कितनी मदद की, जो अपने लोगो के उत्थान के लिए स्वतंत्र रूप से कार्य कर रहे थे। यह वह समय था, जब अस्पृश्य स्वयं संघर्ष-पथ पर थे। वे भी अपने नागरिक तथा सामाजिक अधिकारों की प्राप्ति के लिए हिंदुओं के खिलाफ सविनय अवज्ञा का प्रयोग करने लगे थे। यह वह समय था, जब बंबई प्रेसिडेंसी के अस्पृश्यों ने महाड में सार्वजनिक तालाब से पानी लेने के लिए और नासिक में हिंदू मंदिर में प्रवेश के अपने अधिकार की स्थापना के लिए अपना सत्याग्रह छेड दिया था। सवर्ण हिंदुओं के खिलाफ अस्पृश्यों ने जो यह सत्याग्रह आंदोलन छेडा था, उसके प्रति श्री गांधी का क्या दृष्टिकोण था? कम-से-कम इतना तो कहा ही जा सकता है कि श्री गांधी का रवैया बहुत ही असंगत था।

शुरू में तो सवर्ण हिंदुओं के खिलाफ अस्पृश्यों के इस सत्याग्रह की निंदा श्री गांधी ने की। उन्होंने उसका समर्थन नहीं किया। इस विवाद में अस्पृश्यों का पक्ष पुर्णतः तर्क-सम्मत था। उनका कहना था कि यदि सविनय अवज्ञा ऐसा हथियार था जिसका इस्तेमाल श्री गांधी के अनुसार हिंदू वैध रूप से स्वाधीनता की प्राप्ति के लिए अंग्रेजों के विरुद्ध कर सकते है, तो इसका क्या औचित्य है कि वे दासता से अपनी मुक्ति के लिए सवर्ण हिंदुओं के खिलाफ उसका इस्तेमाल नहीं कर सकते। कितना सही यह तर्क था, पर श्री गांधी पर उसका कोई प्रभाव नहीं पड़ा। उन्होंने उनके इस तर्क का उत्तर अपने तर्क से देने का प्रयास किया। उन्होंने कहा कि अस्पृश्यता तो हिंदुओं का पाप है। अतः प्रायश्चित्त भी हिंदुओं को ही करना चाहिए। उन्हें ही अस्पृश्यता मिटाने के लिए सत्याग्रह करना चाहिए। सत्याग्रह अस्पृश्यों का कार्य नहीं है, क्योंकि पापी वे नहीं है। वे पापी कैसे हुए, उनके प्रति तो पाप किया गया है। निश्चय ही यह अरस्तू जैसा तर्क नहीं है। यह तो महात्मा जैसा तर्क है, जिसे वाक्छल भी कह सकते है। लेकिन यह तो स्पष्ट है कि महात्मा जैसा यह तर्क कोरी बकवास है। अस्पृश्यों का उत्तर था कि यदि श्री गांधी का यही दृष्टिकोण है कि सत्याग्रह एक ऐसा प्रायश्चित्त है, जिसे पापी को ही करना चाहिए, तो वह हिंदुओं से अंग्रेजों के खिलाफ सत्याग्रह करने के लिए क्यों कहते है। अंग्रेजी साम्राज्यवाद तो अंग्रेजों का पाप है। अतः उनके ही तर्क के अनुसार सत्याग्रह तो अंग्रेजों को ही करना चाहिए, न कि सवर्ण हिंदुओं को। अस्पृश्यों ने उनके तर्क को ध्वस्त कर दिया था। यह स्पष्ट हो गया था कि सवर्ण हिंदुओं के विरुद्ध अस्पृश्यों के इस सत्याग्रह के प्रति श्री गांधी के इस दृष्टिकोण में भ्रांति अथवा अनिष्ठा है। लेकिन श्री गांधी ने विरोध का जो हठी दृष्टिकोण अपना लिया था, अस्पृश्य उन्हें उससे डिगा नहीं सके।

श्री गांधी के दृष्टिकोण में एक और विसंगती है। दो स्थानों पर एक से सत्याग्रह हुए, पर उनके बारे में श्री गांधी का दृष्टिकोण अलग-अलग था। सवर्ण हिंदुओं के खिलाफ अस्पृश्यों ने महाड और नासिक में सत्याग्रह किया। वैसा ही सत्याग्रह उन्होंने वाइकोम में किया। श्री गांधी ने वाइकोम सत्याग्रह का समर्थन किया। उन्होंने इसके लिए आशीर्वाद और प्रोत्साहन भी दिया। तो फिर श्री गांधी ने महाड और नासिक के सत्याग्रह का विरोध क्यों किया? क्या इन दोनों में कोई असमानता थी? हां, असमानता थी। अस्पृश्यों ने वाइकोम सत्याग्रह काँग्रेस के झंडे तले किया। अन्य दोनों सत्याग्रह अस्पृश्यों ने काँग्रेस के बिना स्वतंत्र रूप से किए। क्या श्री गांधी के विरोध का कोई वास्ता इस असमानता से था? श्री गांधी ने तो इसका कोई उत्तर नहीं दिया है। संभवतः श्री गांधी नहीं चाहते थे कि वे उन निर्बल व्यक्तियों (मेमनों) की रक्षा करे, जो उन्हें अपना रक्षक स्वीकार नहीं करते। जब श्री गांधी ने अस्पृश्यों के सत्याग्रह को आशीर्वाद प्रदान नहीं किया, तो यह अनिवार्य निष्कर्ष था कि रूढ़िवादी हिंदुओं के खिलाफ अस्पृश्यों के संघर्ष में कोई भी कांग्रेसी आगे बढकर उनकी मदद नहीं करेगा। वास्तविकता तो यह है कि श्री गांधी के इस रवैए ने ही काँग्रेसी हिंदुओं को रूढ़िवादी हिंदुओं के साथ जोड़ दिया। वे तो सगोत्र और सजातीय है। दोनों को विभाजित करने वाली रेखा भी बहुत ही महीन है। वे निस्संकोच होकर अस्पृश्यों के सिर तोड़ते-फोड़ते है। यदि विकृत नहीं तो अपने निहायत बेतुके रवैए से श्री गांधी ने केवल यही शरारत नहीं की। उन्होंने न केवल खुले आम यह कहा कि मुसलमान, ईसाई, पारसी और यहूदी कोई मदद न दे, बल्कि उन्होंने तो आपत्ति करते हुए सिखों से भी कहा, जो एक प्रकार से युद्धप्रिय और प्रोटेस्टैंट हिंदू ही है, कि वे अस्पृश्यों की मदद न करे। यहां भी उनका तर्क दुनिया से निराला था। अस्पृश्यता तो सवर्ण हिंदुओं का पाप है। उन्हें ही उसका प्रायश्चित्त करना होगा। अस्पृश्यों की मदद करना एक प्रायश्चित्त है और प्रायश्चित्त तो पापी का दायित्व है, अतः केवल पापी ही सत्याग्रह कर सकता है और उनकी सहायता कर सकता है। अस्पृश्यता के मामले में मुसलमान, ईसाई, पारसी यहूदी और सिख पापी नहीं है। अतः अस्पृश्यता-निवारण के सत्याग्रह में वे मदद नहीं दे सकते। निश्चय ही श्री गांधी ने उसे अस्पृश्यों के दृष्टिकोण से नहीं देखा। उन्होंने यह नहीं देखा कि जो सवर्ण हिंदुओं के लिए पाप है, वही अस्पृश्यों के लिए गुलामी है। यदि पापी को प्रायश्चित्त करना ही पड़ता है, तो गुलाम को भी अपनी गुलामी के बंधनो से मुक्त होने का अधिकार है और आजादी का समर्थन करने वाले हर व्यक्ती का, चाहे वह किसी भी जाती या पंथ का हो, यह अनिवार्य कर्तव्य हो जाता है कि वह बिना किसी संकोच के संघर्ष में मदद दे और उसमे भाग ले।

पर श्री गांधी इस बात के लिए तैयार नहीं हुए कि इस तर्क का लाभ अस्पृश्यों को भी मिले। वह अड़ गए। अहिंदू, हिंदू की मदद कर सकता है। हिंदू, अहिंदू की मदद कर सकता है। लेकिन किसी को भी अस्पृश्य की मदद नहीं करनी चाहिए। श्री गांधी के दोस्त आतुर थे कि उनके तर्क की कठोरता को कुछ कम किया जाए। उन्होंने कहा कि अस्पृश्यों की असुविधाओं की प्रकृति के आधार पर कोई विभेद आवश्यक है। उनका तर्क था कि अस्पृश्यों की कुछ असुविधाएं नागरिक है, कुछ धार्मिक है और जहां तक नागरिक असुविधाओं का संबंध है, अहिंदुओ को भी अनुमति दी जाए कि वे अस्पृश्यों के सत्याग्रह में उनकी मदद करें। श्री गांधी इसे भी सुनने के लिए तैयार नहीं हुए। उनका निषेधादेश सभी अवस्थाओं के लिए था और कोई भी विभेद संभव नहीं था। बाह्य सहायता संबंधी निषेध की इस तलवार से 'अस्पृश्यों के मित्र' श्री गांधी ने अस्पृश्यों की मदद की डोर ही काट दी और उन्हें युद्ध की कुमुक से पूर्णतया वंचित कर दिया।"
सन्दर्भ - डॉ. बी. आर. अम्बेडकर (बाबासाहेब डॉ अम्बेडकर सम्पूर्ण वाङ्गमय, खंड - 10, पेज नं. 222 - 225)

पूना समझौते का परिणाम

 पूना समझौते का परिणाम

- डॉ. बी. आर. अम्बेडकर

इतना कहना काफी होगा कि भले ही श्री गांधी ने आमरण अनशन किया, पर वह मरना नहीं चाहते थे। वह तो ज़िंदा रहना चाहते थे।

आमरण अनशन श्री गांधी का एक बड़ा दांव था। संभवत उनका विचार था कि केवल आमरण अनशन की धमकी से मै और दलित वर्ग के मेरे साथी घबराकर झुक जाएंगे। लेकिन शीघ्र ही उन्हें पता चल गया कि उनका अनुमान सही नहीं था और अस्पृश्य भी अपने अधिकारों के लिए अंतिम सांस तक संघर्ष करने के लिए उतने ही कृत-संकल्प थे। उनके अपने अनुयायियों के अलावा अन्य किसी को भी इस बारे में संतोष नहीं था कि श्री गांधी के अनशन का कोई नैतिक अधिकार था। यदि श्री गांधी को नया जीवन-दान मिला तो उसका पूरा श्रेय उनके प्रति अस्पृश्यों की उदारता और सद्भावना को जाता है।

पूना समझौता करने से अस्पृश्यों को क्या लाभ हुआ इसे समझने के लिए हमें विधान-मंडलों के लिए हुए चुनावों के परिणामों की निरख-परख करनी ही होगी। जहा तक अस्पृश्यों का संबंध है, फरवरी 1937 में जो चुनाव हुए, वे पूना समझौते के अनुसार हुए। इसमे विभिन्न प्रांतीय विधान-मंडलो में अस्पृश्यों के लिए आरक्षित 151 सीटों में से 78 सीटें काँग्रेस को मिली।

प्रश्न उठता है कि पूना समझौता करने से और श्री गांधी के प्राणों की रक्षा करने से क्या अस्पृश्यों के हाथ कोई काम की चीज लगी है और क्या पूना समझौते से अस्पृश्य लोग हिंदुओं के दास नहीं बन गए है?

विश्लेषण से पता चलता है कि उनमे से अधिकतर कांग्रेसियों के रूप में चुने गए है। मेरा यह दृढ़ विश्वास है कि अस्पृश्यों के लिए काँग्रेस में या उस प्रयोजन के लिए किसी विशाल राजनीतिक पार्टी में शामिल हो जाना उनके लिए घातक ही सिद्ध होगा।

अस्पृश्यों को आंदोलन करना होगा, यदि वे अपनी गलतियों के प्रति सचेत रहना चाहते है, यदि वे अपने बीच विद्रोह की भावना को जीवित रखना चाहते है। उन्हें आंदोलन करना होगा, क्योंकि उन्हें हिंदुओं को जताना होगा कि जो अस्पृश्यों के लिए त्रासदी है, वही सवर्ण हिंदुओं के लिए अपराध है।

काँग्रेस के भीतर अस्पृश्यों का आंदोलन हो ही नहीं सकता। निश्चय ही इसका अर्थ होना चाहिए, पार्टी के भीतर ही भयंकर संघर्ष। लेकिन काँग्रेस अपनी रक्षा के लिए अस्पृश्यों को आंदोलन की अनुमति नहीं दे सकती।

काँग्रेस में शामिल होने वाले अस्पृश्यों पर काँग्रेस ने यह कड़ी पाबंदी लगा दी है कि वे अस्पृश्यों का ऐसा कोई स्वतंत्र आंदोलन नहीं चला सकते, जिसकी अनुमति उच्च कमान ने न दी हो। नतीजा यह है कि जिन प्रांतों में अस्पृश्य काँग्रेस में शामिल हो गए है, वहां अस्पृश्यों का आंदोलन वस्तुतः ठप्प हो गया है।

अस्पृश्यों को विधान-मंडल में बोलने और काम करने की आजादी होनी ही चाहिए, यदि उन्हें अपनी शिकायतों को व्यक्त करना है और राजनीतिक कार्यवाही से अपनी पीडाओं को दूर करना है। लेकिन अस्पृश्यों के जो प्रतिनिधि काँग्रेस में शामिल हो गए है, उन्होंने बोलने और काम करने की इस आजादी को गंवा दिया है। अपनी इच्छा के अनुसार न वे वोट दे सकते है और न ही बोल सकते है। न वे प्रश्न कर सकते है और न ही वे कोई संकल्प या विधेयक प्रस्तुत कर सकते है। वे पूर्णतया काँग्रेस कार्यकारिणी के नियंत्रण में रहते है। उन्हें केवल उतनी ही स्वतंत्रता मिलती है, जीतनी कि काँग्रेस कार्यकारिणी उन्हें देना चाहे। नतीजा यह है कि भले ही अस्पृश्यों की विपदाए दिनों-दिन बढती ही जा रही हो, पर विधान-मंडल के अस्पृश्य सदस्य उनके बारे में एक सवाल तक नहीं उठा सकते। उनकी दशा इतनी दयनीय हो गई कि काँग्रेस पार्टी कभी-कभी तो उनसे ऐसे विधेयक के खिलाफ वोट देने की अपेक्षा करती है, जो विधान-मंडल के अस्पृश्य सदस्यों की राय में अस्पृश्यों के लिए हितकर हो। अस्पृश्यों के प्रतिनिधि अस्पृश्यों के हितों के रखवाले समझे जाते है। लेकिन काँग्रेस में शामिल हो जाने के कारण उनकी स्थिति मुख पर पट्टी बंधे कुत्तो जैसी हो गई है। काटना तो दूर की बात है, वे भौक भी नहीं सकते। इन अस्पृश्य सदस्यों ने बोलने और काम करने की जो आजादी गंवा दी है, उसका केवल एक ही कारण है कि वे काँग्रेस में शामिल हो गए है और काँग्रेस के अनुशासन के फंदे में फंस गए है।

काँग्रेस में शामिल हो जाने से अस्पृश्यों को तीसरा नुकसान यह हुआ है कि वे अस्पृश्यों को कोई वास्तविक लाभ नहीं पहुंचा सके है। इसके दो कारण है। एक तो यह कि काँग्रेस कोई आमूल परिवर्तनवादी पार्टी नहीं है। कोई क्रांतिकारी पार्टी आमूल परिवर्तनवादी पार्टी भी है या नहीं, यह निश्चय ही उन सामाजिक तथा भावनात्मक वास्तविकताओं पर निर्भर करता है, जो क्रांति की प्रेरणा देती है। यह सच है कि काँग्रेस ने जनता-जनार्दन का भारी समर्थन प्राप्त किया, लेकिन ऐसा उन्होंने सभी भारतीयों में व्याप्त अंग्रेज-विरोधी भावना को उकसा कर किया। यह भी सच है कि ये भावनाएं भूखे और आजादी से वंचित लोगों की भावनाएं थी। लेकिन उनकी भावनाओं का सामाजिक रूप से उन्नत तथा धनवान वर्गों की भावनाओं से विरोध था। और यह उन्नत वर्ग काँग्रेस में सदा ही शासक वर्ग रहा है। यही कारण है कि काँग्रेस केवल क्रांतिकारी संस्था रही है, आमूल परिवर्तनवादी पार्टी नहीं। जो भी सावधानी से काँग्रेसी सरकारों के कारनामों पर विचार करेगा, वह इस सत्य को देख सकता है। जब से उन्होंने सत्ता संभाली है, तब से उनकी उपलब्धि बस यही है कि वे सस्ती चीजों का फुटकर संग्रह कर सके है। अंग्रेजो से भी कही अधिक तत्परता से उन्होंने श्रमिकों को गोलियों से भूना है और उच्च न्यायालयों द्वारा दंडित अपराधियों को रिहा किया है। रिहाई का केवल यही आधार है कि उन्हें रिहा करने का अधिकार है। मुझे आश्चर्य है कि काँग्रेस ने इतनी जल्दी यह दिखा दिया है कि वे तो इंग्लैंड के टोरियो (अनुदारवादियों) के प्रतिरूप ही है। काँग्रेस के शासक वर्ग की क्रांति का, यानी अंग्रेज को खदेड़ने का समूचा जोश ठंडा पड़ गया है। अब जब उन्हें जनता के शोषण का मौक़ा मिल गया है तो वे भरपूर शोषण के लिए सत्ता और अधिकार से चिपके रहना चाहते है। वे नहीं चाहते कि साम्राज्य-विरोध का कोई विचार उनके काम में खलल डाले।

सामाजिक तथा आर्थिक पुनर्निर्माण के आमूल परिवर्तनवादी कार्यक्रम के बिना अस्पृश्य कभी अपनी दशा में सुधार नहीं कर सकते। चुकी काँग्रेस आमूल परिवर्तनवादी पार्टी नहीं है, अत: उस पर विश्वास नहीं किया जा सकता कि वह ऐसा कोई कार्यक्रम हाथ में लेगी। अस्पृश्यों के ऐसी पार्टी में शामिल होना बेकार और बेमानी है। काँग्रेस उनके लिए कुछ भी नहीं करेगी। उल्टे वह पहले की भांति उनका दुरुपयोग करेगी।

काँग्रेस में शामिल होने से अस्पृश्यों को ऐसे नुकसान हुए है। वे केवल नुकसान ही नहीं है। मैं तो उन्हें घोर दुष्परिणाम कहता हूँ। समूची सामाजिक गतिविधि ठप्प हो गई है। समूचे राजनीतिक अधिकार छिन गए है। वस्तुतः उन्हें जंजीरों से जकड दिया गया है।

लेकिन निश्चय ही यह प्रश्न पूछा जाएगा कि यदि काँग्रेस शामिल होने के ऐसे दुष्परिणाम है, तो ये अस्पृश्य उसमे शामिल क्यों हुए? काँग्रेस के विरोध में उन्होंने स्वतंत्र रूप से चुनाव क्यों नहीं लड़े? जिन कुछ अस्पृश्यों ने काँग्रेस के टिकट पर चुनाव लड़ा, वे केवल स्वार्थजीवी लोग थे और कुछ बनने की चाह रखते थे। विधान-मंडल में इसलिए जाना चाहते थे कि जब लाभ के पद बांटे जाएं, तो उनका भी नंबर आ जाए। उन्हें इसकी परवाह नहीं थी कि किसके समर्थन से वे वहां पहुंचे। काँग्रेस सबसे बडी पार्टी थी और उसका टिकट विधान-मंडल में पहुंचाने का सर्वाधिक निश्चित उपाय था। अत: इन स्वार्थजीवियों को लगा कि काँग्रेस में शामिल होना चुनाव में सफल होने का सबसे आसान तरीका था। वे अवसर नहीं खोना चाहते थे। इससे उनका प्रयोजन तो स्पष्ट हो जाता है, पर इससे यह स्पष्ट नहीं होता कि किस कारण से विवश होकर वे काँग्रेस में शामिल हुए। मुझे यकीन है कि वे स्वार्थजीवी भी काँग्रेस में शामिल न होते, यदि वे काँग्रेस के सहारे के बिना चुनाव में सफल हो सकते। वे काँग्रेस में ही शामिल हुए, क्योंकि उन्होंने देखा कि स्वतंत्र मार्ग असंभव था। वे काँग्रेस में शामिल होने पर विवश क्यों हुए? उत्तर है कि यह सब अनिष्ट संयुक्त निर्वाचन-क्षेत्र प्रणाली के कारण हुआ, जो पूना समझौते की उपज थी।

यदि अल्पसंख्यकों और बहुसंख्यकों के लिए संयुक्त निर्वाचन-क्षेत्र हो, तो निश्चय ही अल्पसंख्यकों का अनिष्ट होगा। अल्पसंख्यकों द्वारा खड़ा किया उम्मीदवार फिर भी सफल  नहीं हो सकता, यदि समूचे अल्पसंख्यक एकजुट होकर उसका समर्थन भी करें। यदि अल्पसंख्यकों के लिए सीट आरक्षित कर दी जाती है तो उससे केवल यह सुरक्षा मिलती है कि अल्पसंख्यकों का उम्मीदवार निर्वाचित हो जाएगा। लेकिन उससे यह गारंटी नहीं मिलती कि चुनाव जीतने वाला अल्पसंख्यकों का उम्मीदवार उनका चहेता उम्मीदवार होगा, यदि चुनाव संयुक्त निर्वाचन-क्षेत्र प्रणाली से होगा। भले ही किन्ही अल्पसंख्यकों के लिए सीट आरक्षित कर दी जाए, पर बहुमत सदा ही अपने मर्जी के किसी अल्पसंख्यक को चुन सकता है और उसे अल्पसंख्यकों के उम्मीदवार के खिलाफ आरक्षित सीट के लिए खड़ा कर सकता है और अपनी फालतू मतदान- शक्ति के बल पर अपने मनोनीत उम्मीदवार को जिता सकता है। नतीजा यह होता है कि आरक्षित सीट के लिए चुना गया अल्पसंख्यकों का प्रतिनिधि अल्पसंख्यकों का पक्षधर न होकर वास्तव में बहुमत का गुलाम हो जाता है।

- डॉ. बी. आर. अम्बेडकर
बाबासाहेब डॉ. आम्बेडकर, सम्पूर्ण वाङ्गमय, खंड-10 (पृष्ठ 263 -267)

निंदा कराल की गौरव कराल ?

 समजा एका ग्रंथात दोन कायदे आहेत. 

१) घरातले उरले-सुरले, टाकाऊ धान्य, अन्न शुद्र आणि अतिशूद्रांना द्यावे. 

२) शुद्र जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नसतील तर त्याचा शिरच्छेद करावा. 

आता शूद्रांना मदत करावी असे सांगितले आहे म्हणून तुम्ही त्या ग्रंथाचा गौरव कराल की शुद्र कोणाच्या म्हणण्याप्रमाणे वागत नसतील तर त्याचा शिरच्छेद करावा अशा क्रूर शिक्षा असणा-या ग्रंथाची निंदा कराल? 

सहाजिकच निंदा करणे हीच माणुसकी ठरेल. कारण त्या ग्रंथात चांगल्याच्या तुलनेत वाईट एवढे अफाट आहे की त्या चांगल्याला सुद्धा काहीही अर्थ राहत नाही. 

मनुस्मृतिमधील कायदे वरील प्रकारचे आहेत. वाईट अफाट तर चांगले अत्यल्प. म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन केले. तरीही काही जण या ग्रंथातील अफाट वाईटाकडे दुर्लक्ष करीत या ग्रंथाचा गौरव का करीत असतील? दोन कारणे असू शकतात. एकतर नीच विचारसरणी असेल किंवा शेकडो वर्षापासून जातीच्या नावावर शोषण करण्याची जी सवय असेल त्यामुळे आलेली मानसिक विकृती असेल?

स्वतंत्र मतदारसंघ आणि संयुक्त राखीव मतदारसंघ

मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, आंग्लो-इंडियन यांना पूर्वीपासून स्वतंत्र मतदारसंघ होते परंतु १९३२ मध्ये गोलमेज परिषदेतील डॉ. आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे अस्पृश्यांना पहिल्यांदा स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते. यांचा अर्थ केंद्रीय आणि प्रांतीय विधानमंडळात अस्पृश्यांचे जे प्रतिनिधि निवडून जातील त्यांना फ़क्त अस्पृश्य मतदारच मत देऊ शकत होते. म्हणजेच जोनेता अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी जिवापाड मेहनत करेल त्यांनाच अस्पृश्य मतदार  आपले मत देणार होते.

परंतु सवर्ण हे अस्पृश्यांच्या बाबतीत कितीही कळवळा दाखवित असले तरी तो फ़क्त वरवरचा देखावा असतो हे गांधीजींनी आपल्या वागणुकीने दाखवून दिले. डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ सोडावेत म्हणून गांधीजींनी आयुष्यातले प्रथम आणि शेवटचे आमरण उपोषण केले. याला कोणी गांधीजींची अहिंसा म्हणत असले तरी ही एकप्रकारे हिंसाच होती. कारण मी चूक असलो तरी माझे म्हणणे तुम्ही मान्य करावे नाहीतर मी माझ्या जीवाचे काही बरेवाईट करेन आणि माझ्या जीवाला काही झाल्यास माझे समर्थक अस्पृश्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करतील अशाप्रकारची ही अप्रत्यक्ष धमकीच होती. शेवटी काही तडजोड करुन डॉ. आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघ सोडून द्यावे लागले. ही तडजोड म्हणजे संयुक्त मतदारसंघात राखीव जागा ही होती. यामध्ये प्राथमिक आणि संयुक्त असे दोन वेळा अस्पृश्य उमेदवारास निवडणुकीत मत द्यावे लागत होते. प्राथमिक निवडणुकीत फ़क्त अस्पृश्य मतदारच अस्पृश्य उमेदवाराला मत देऊ शकत होते तर संयुक्त निवडणुकीत अस्पृश्य आणि सवर्ण असे दोन्ही मतदार अस्पृश्य उमेदवारास मत देऊ शकत होते.  प्राथमिक निवडणुकित फ़क्त अस्पृश्य त्यांच्या मताने चार उमेदवारांची निवड करीत असत. सहाजिकच प्रथम पसंतीच्या क्रमांकाचा उमेदवार अस्पृश्यांचा सर्वात जास्त आवडता उमेदवार असे. त्या तुलनेत दूसरा कमी आवडता, तीसरा त्यापेक्षा कमी आणि चौथा त्यापेक्षा कमी. प्राथमिक निवडणुकीत अस्पृश्यांची पहिली पसंती डॉ. आंबेडकरांच्या पक्षाने उभ्या केलेल्या अस्पृश्य उमेदवाराला असायची. कारण हे नेते अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारे खरे नेते असायचे. याउलट काँग्रेसतर्फे जे अस्पृश्य उमेदवार उभे रहायचे ते तिस-या किंवा चौथ्या क्रमांकावर असत.
याचा अर्थ तिस-या किंवा चौथ्या क्रमांकावर असणा-या काँग्रेसच्या अस्पृश्य उमेदवारास अस्पृश्य लोक काँग्रेसला विकला गेलेला किंवा काँग्रेसचा दलाल समजत असत. परंतु ज्यावेळेस संयुक्त मतदारसंघात अस्पृश्यांच्या प्राथमिक निवडणुकीद्वारे निवडलेले चार उमेदवार उभे राहत तेव्हा त्या उमेदवारांना अस्पृश्यांसोबतच ब्राम्हण, ब्राम्हणेत्तर सवर्ण हिंदू सर्वच मत देऊ शकत. अस्पृश्यांची लोकसंख्या कमी याउलट सवर्ण हिंदू बहुसंख्य असल्यामुळे सवर्ण हिंदू प्राथमिक निवडणुकीत अस्पृश्यांनी प्रथम पसंतीने निवडलेल्या अस्पृश्य उमेदवारास मत न देता जो नेता काँग्रेसच्या सवर्ण ब्राम्हण बनियास विकला गेला असेल अशा अस्पृश्य उमेदवारास आपल्या बहुसंख्य मताद्वारे निवडून आणत. १९३२ च्या पुणे कराराचा गर्भित अर्थ हा होता की, काँग्रेस पक्षाने अस्पृश्य उमेदवार निवडणुकीत राखीव जागेवर उभे करु नये. परंतु पुढे काँग्रेसने हा करार पाळला नाही. त्यामुळे १९४६ मध्ये पुणे करार रद्द करावा अशी डॉ. आंबेडकारांनी मागणी केली होती.

अस्पृश्यांना राखीव जागा फ़क्त अस्पृश्य उमेदवार निवडून जावा यासाठी नव्हत्या तर त्यांच्या उन्नतीसाठी काम करणारे त्यांचे खरे नेते निवडून जावेत यासाठी होत्या. ज्या देशात पराकोटिचा जातीयवाद आहे तिथे अल्पसंख्य अस्पृश्यांचे उमेदवार राखीव जागेवरुन त्यांचे खरे नेते म्हणून निवडून जाऊ शकतात काय?

प्राथमिक निवडणुकीची पद्धत बंद झाली असली तरी अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव जागेची ही पद्धत आजही सुरु आहे. जेंव्हा की डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या हयातितच याला विरोध केला होता. कारण काँग्रेसतर्फे निवडून जाणारे उमेदवार अस्पृश्यांच्या कोणत्याही फायद्याचे नव्हते. डॉ. आंबेडकरांनी काँग्रेसच्या या अस्पृश्य उमेदवारास Tools (हत्यार) हा शब्द वापरलेला आहे. हे अस्पृश्य उमेदवार म्हणजे सवर्ण ब्राम्हण बनियांच्या हातातले अस्पृश्यांच्या पक्षाविरुद्ध वापरावयाचे हत्यार होते. आजही तेच सुरु आहे.

मग अस्पृश्यांचा कळवळा दाखविणा-या गांधींच्या या वागणुकीने कोणाचा फ़ायदा झाला?

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

अनुसूचित जाती, जमातींना त्यांच्यावर होणा-या अत्याचाराच्या बाबतीत न्याय का मिळत नाही?

ज्यांच्या एका आदेशाने तपासाची दिशा बदलू शकते अशा सीबीआय पासून वेगवेगळ्या तपास संस्थांतील अधिकाराची पदे सवर्ण उच्चवर्णियांच्या हातात आहेत. सर्वोच्च न्यायालयातील ३३ पैकी २८ न्यायाधीश सवर्ण आहेत. दुसरीकडे अट्रोसिटीच्या प्रकरणातले ९६% आरोपी निर्दोष सुटतात म्हणून अट्रोसिटीच्या केसेस खोट्या असतात अशी सवर्णांकडून ओरड केली जाते. अनुसूचित जाती, जमातीवर होणा-या अत्याचाराच्या बाबतीत त्यांनी मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलने केल्याशिवाय त्यांना न्याय मिळणे तर सोडा त्याची साधी दखल सुद्धा घेतली जात नाही. 

अनुसूचित जाती, जमातींना त्यांच्यावर होणा-या अत्याचाराच्या बाबतीत न्याय का मिळत नाही यासाठी कोण आणि कुठली परिस्थिती जबाबदार आहे याविषयी डॉ. आंबेडकरांचे मत खालील प्रमाणे आहे. 

"तीसरी अड़चन जो अस्पृश्यों की असहाय स्थिति को बिकट बनाती है, वह यह है कि अस्पृश्यों के लिए यह संभव नहीं कि वे पुलिस से सुरक्षा और अदालतों से न्याय प्राप्त कर सकें। पुलिस के लोग सवर्ण हिंदुओं के वर्गों से भरती किए जाते है। मजिस्ट्रेटों के पद पर भी सवर्ण हिंदुओं के लोग होते है। पुलिस और मजिस्ट्रेटों के वर्ग से सवर्ण हिंदुओं का नाता सगे-संबंधी जैसा है। अस्पृश्यों के प्रति वे भी सवर्ण हिंदुओं की भांति भावनाओं और पूर्वाग्रहों से ग्रस्त रहते है। यदि कोई अस्पृश्य किसी पुलिस अधिकारी के पास सवर्ण हिंदू के खिलाफ शिकायत दर्ज करने जाता है तो सुरक्षा के स्थान पर उसे ढेर सारी गालियां सुननी पडती है। या तो उसे शिकायत दर्ज किए बिना ही भगा दिया जाता है या रिपोर्ट ऐसी झूठी दर्ज की जाती है कि उसमे स्पृश्य हमलावरों को बच निकलने का मार्ग मिल जाता है। यदि वह मजिस्ट्रेट की अदालत में अपराधियों के खिलाफ मुकदमा दायर करता है तो उस पर क्या कार्रवाई होगी, यह पहले ही मालुम हो जाता है। किसी अस्पृश्य को कोई हिंदू गवाही देने के लिए नहीं मिलेगा, क्योंकि गांव में पहले ही षडयंत्र रच दिया जाता है कि कोई भी अस्पृश्य की हिमायत नहीं करेगा, चाहे सच कुछ भी क्यों न हो। यदि वह गवाह के रूप में अस्पृश्यों को पेश करता है तो मजिस्ट्रेट उनकी गवाही स्वीकार नहीं करेगा, क्योंकि वह आसानी से कह देगा कि वह तो उसी का हितैषी है, इसलिए उसे स्वतंत्र गवाह नहीं कहा जा सकता। यदि वे स्वतंत्र गवाह है भी तो मजिस्ट्रेट के सामने एक आसान-सा तरिका यह कह देना है कि उसे अस्पृश्य के पक्ष में गवाह सच्चा नहीं प्रतीत होता। वह निडर होकर ऐसा फैसला सुना देगा, क्योंकि वह भली-भांति जानता है कि उसके ऊपर कोई अदालत उसके इस फैसले को नहीं बदलेगी, क्योंकि यह एक स्थापित नियम है कि अपील सुनने वाली अदालत मजिस्ट्रेट के फैसले में दखल न दे, जो गवाहियों पर आधारित है और जिनकी उसने जांच की है। दुर्भाग्य यह है कि पुलिस कर्मचारी तथा मजिस्ट्रेट भ्रष्ट होने की अपेक्षा अधिक पक्षपातपूर्ण होते है। हिंदुओं के प्रति उनके इस पक्षपातपूर्ण और अस्पृश्यों के प्रति विरोधपूर्ण रवैये के कारण ही अस्पृश्यों को न्याय और सुरक्षा नहीं मिल पाती। पुलिस तथा मजिस्ट्रेट को अपनी प्रेरणाओं, अपने हितों और संस्कारों के कारण अस्पृश्यों की भावनाओं के साथ सहानुभुति नहीं होती। इसके फलस्वरूप वे लोग अस्पृश्यों की आकांक्षाओं के प्रति खुलकर विरोधी और विद्वेषपूर्ण हो जाते है। 

इसका सबसे अधिक बुरा पक्ष यह है कि यह सब अन्याय और अत्याचार कानून की सीमाओं के अंदर किया जा सकता है। पुलिस अपनी शक्ति और अपने अधिकार का दुरुपयोग कर सकती है। पुलिस अधिकारी ऐसी बात को दर्ज कर सकता है जो कही ही नहीं गई या ऐसी बात को दर्ज कर, जो कही गई बात से नितांत भिन्न हो, जान-बुझकर अपने रिकार्ड तोड़-मरोड़ सकता है। वह उस पक्ष को गवाहों के नाम-पते आदि बता सकता है, जिसमे उसका स्वार्थ होता है। वह किसी को गिरफ्तार करने से इंकार कर सकता है। वह किसी मामले को ख़त्म करने के लिए कुछ भी कर सकता है। वह यह सब काम पकड़े जाने के डर के बिना कर सकता है। मजिस्ट्रेट ने उसे अपने विवेक का इस्तेमाल करने के लिए पूरी तरह छूट दे रखी है। किसी भी मामले का निर्णय गवाहों पर निर्भर करता है, जो गवाही दे सकते है। लेकिन मुकदमे का निर्णय इस बात पर निर्भर करता है कि क्या गवाहियां विश्वसनीय है या नहीं। यह मजिस्ट्रेट पर निर्भर करता है कि वह किस पर विश्वास और किस पर अविश्वास करता है। वह किसी भी पक्ष पर विश्वास करने के लिए पूर्ण स्वतंत्र है। ऐसे बहुत से मामले है, जिनमे मजिस्ट्रेट ने अपने विवेक का इस्तेमाल अस्पृश्यों के हितों के खिलाफ किया है। अस्पृश्यों की गवाहियां चाहे कितनी भी सच्ची क्यों न हो, मजिस्ट्रेट सभी मामलों में एक ही बात कह देता है, 'मुझे गवाहों पर विश्वास नहीं है'। कौन-सी सजा सुनाई जाए, यह भी मजिस्ट्रेट का विवेकाधिकार है। अगर उचित न्याय नहीं हुआ है तो उचित न्याय पाने का रास्ता अपील होती है। मजिस्ट्रेट द्वारा यह कह दिया जाता है कि इस मामले में दिए गए निर्णय के खिलाफ अपील नहीं हों सकती।" 


बाबासाहेब डॉ. अम्बेडकर, सम्पूर्ण वाङमय खंड-10 (पृष्ठ 177-180) 

मी या परिस्थितीसाठी अप्रत्यक्षरित्या मा. गांधींना जबाबदार धरतो. कारण त्यांनी उपोषणाद्वारे ब्लैकमेल करुन पुणे करार घडवून आणला नसता तर आज अनुसूचित जाती, जमातीचे १३१ खरे नेते निर्णय प्रक्रियेत असते आणि त्यांनी सवर्ण उच्चवर्णियांच्या हातात मोक्याच्या जागा जाऊ देण्यास नक्कीच विरोध केला असता.

हिंदू ऐसा बर्बर व्यवहार क्यों करता है?

'आता कुठाय जातीवाद' असे विचारणारे जातीयवादी विचारसरणीचे लोक तुम्हाला कुठे ना कुठे मिळतीलच. म्हणूनच डॉ. आंबेडकरांचे या जातीयवादी लोकांबद्दलचे मत आणि त्याखाली अलीकडील एका बातमीची लिंक दिली आहे. त्यामुळे आता कुठेही असे होत नाही असे विचारण्याची सोय राहत नाही. 

"अस्पृश्य यदि साफ़ वस्त्र पहनता है तो उस पर अत्याचार क्यों किया जाए? हिंदू को उससे क्या आघात पहुंच सकता है? अस्पृश्य के साथ क्यों छेड-छाड की जाए, यदि वह अपने घर पर खपरैल की छत डालता है? हिंदू का उससे क्या बिगड़ता है? अस्पृश्य को क्यों पीड़ा पहुंचाई जाए, यदि वह अपने बच्चों को स्कूल भेजना चाहता है? उससे हिंदू की क्या हानि होती है? अस्पृश्य को क्यों विवश किया जाए कि वह मृत पशुओं को उठाए, सड़ा-गला मांस खाए और घर-घर जाकर अपने भोजन के लिए गिड़गिड़ाए? हिंदुओं को क्या घाटा होता है, यदि वह इन कामों को न करें? हिंदू को क्यों आपत्ति करनी चाहिए, यदि अस्पृश्य अपना धर्म बदलना चाहता है? उसके धर्म-परिवर्तन से हिंदू क्यों नाराज हों और बौखलाएं? हिंदू स्वयं को क्यों अपमानित अनुभव करें, यदि अस्पृश्य अपना सुंदर एवं सम्माननीय नामकरण करता है? किसी अस्पृश्य का उत्तम नाम हिंदू पर प्रतिकूल प्रभाव कैसे डाल सकता है? हिंदू को क्यों आपत्ति करनी चाहिए, यदि कोई अस्पृश्य अपने घर का द्वार मुख्य सड़क की ओर खोलता है? उससे उसका क्या बनता-बिगड़ता है? हिंदू को क्यों आपत्ति करनी चाहिए, यदि किन्ही निश्चित दिवसों पर उसके कानों तक किसी अस्पृश्य की आवाज पहुंचती है? उससे वह बहरा तो नहीं हो सकता। हिंदू को क्यों अप्रसन्नता व्यक्त करनी चाहिए, यदि कोई अस्पृश्य कोई काम करता है, प्राधिकार वाला कोई पद प्राप्त कर लेता है, भूमि खरीद लेता है, व्यापार करता है, आर्थिक रूप से स्वतंत्र हो जाता है और उसकी गिनती खाते-पीते लोगों में होने लगती है? सभी हिंदू, चाहे सरकारी हो या गैर-सरकारी, मिलकर अस्पृश्यों का दमन क्यों करते है? सभी जातियां, चाहे वे आपस में लड़ती-झगड़ती रहें, हिंदू धर्म की आड़ में एकजुट होकर क्यों साजिश करती है और अस्पृश्यों को असहाय स्थिति में रखती है। 

निश्चय ही यह सब परी लोक की कथा-सी लगती है। लेकिन सबसे मजेदार बात यह है कि ये सब कारनामे वे हिंदू करते है, जो सामान्यतः भीरु होते है, यहां तक कि उन्हें कायर भी कहा जाता है। लेकिन जब हिंदू जैसे अति विनम्र लोग बेशर्मी और निर्ममता से आगजनी, लूटमार और हिंसा का सहारा लेकर पुरुषों, महिलाओं और बच्चों पर अत्याचार करने लगते है, तो यह विश्वास करना पड़ता है कि निश्चय ही कोई ऐसा बाध्यकारी कारण होगा, जो अस्पृश्यों के इस विद्रोह को देखने पर हिंदुओं को पागल बना देता है और वे ऐसी अराजकता पर उतारु हो जाते है। 

निश्चय ही ऐसे विचित्र और अमानवीय व्यवहार का कोई स्पष्टीकरण तो होना चाहिए। वह क्या है? 

यदि आप किसी हिंदू से पूछेंगे कि वह ऐसा बर्बर व्यवहार क्यों करता है, क्यों वह घोर अपमान अनुभव करता है जब अस्पृश्य स्वच्छ और सम्मानजनक जीवन जीने का प्रयास करते है, तो उसका उत्तर सीधा-सा होगा। वह कहेगा, 'अस्पृश्यों के जिस प्रयास को आप सुधार कहते है, वह सुधार नहीं है। वह हमारे धर्म का घोर अपमान है।' यदि आप उससे फिर पूछेंगे कि इस धर्म की व्यवस्था कहा है तो पुनः उसका उत्तर एकदम सीधा-सा, 'हमारा धर्म हमारे शात्रों में है।' - डॉ. बी. आर. अम्बेडकर बाबासाहेब डॉ. अम्बेडकर, संपूर्ण वाङ्गमय, खंड-10 (पृष्ठ 181-182) 

माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे

माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे. अधिकाराच्या व माऱ्याच्या जागी आमची माणसे हक्काने आली पाहिजे. गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघासाठी मी भांडलो. स्पृश्यांनी निवडलेली माणसे आम्हाला प्रतिनिधी नकोत म्हणून मी आग्रह धरला. अखेर मी विजयी झालो व स्वतंत्र मतदारसंघ मिळविला. पण गांधींना पोटदुखी उठली. अस्पृश्यांना स्वाभिमानाचे हक्क जे मिळाले ते दुष्टपणाने हिरावून घेण्यासाठी त्यांनी आमरण अन्नसत्याग्रह केला व आपले हक्क हिरावून घेतले. त्यामुळे आपल्याला फारच कमी हक्क मिळाले. आपले सरकारी अधिकारी पाहिजेत, मंत्री पाहिजेत, मध्यवर्ती सरकारातही मंत्री पाहिजेत. असे असता ७ प्रांतात काँग्रेस मंत्रिमंडळे झाली, पण गांधींचा दृष्टिकोन बदलला नाही किंवा त्यांच्या हृदयात पालटही झाला नाही. परवा गांधींनी मद्रासचा दौरा काढला. तेथे अस्पृश्यांची व तुमची एवढी तेढ का असा एकाने प्रश्न केला. तेव्हा सरळ व स्पष्ट उत्तर न देता गांधींनी काहीतरी उडवाउडवीचे उत्तर दिले व इंग्रजांनी यांना अधिकाराची चटक लावली असे उद्गार काढले. मराठे, मुसलमान, तसेच ख्रिश्चन, ॲंग्लो इंडियनांना नोकऱ्या देतात त्याबद्दल गांधींचे काही म्हणणे नाही. फक्त अस्पृश्यांना दिल्या की त्यांच्या पोटात दुखते असा अनुभव आहे.  

- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. 

दि. १५ फेब्रुवारी १९४६, दहिवडी, सातारा. 

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

तालिबान

अफगानिस्तानात सध्या जे घडत आहे त्यावरून पुढील काळात तिथे काय घडू शकते याची एक कल्पना. 
(टिप - ही फ़क्त कल्पना आहे. कुणाला कुठल्याही बाबतीत काही साम्य वाटल्यास तो योगायोग समजावा.) 

हा समूह तिथल्या मूळ नागरिकांवर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार या सर्व सुविधांवर बंधने घालून, गुलाम करुन त्यांना नरकीय हलाखीचे जीवन जगण्यास भाग पाडेल. पुढील काळात कदाचित पौराणीक धर्मग्रंथ लिहिले जातील ज्यात तालिबानी प्रमुख नेत्यांना वेगवेगळ्या देवांच्या अवताराच्या रुपात प्रदर्शित केले जाईल आणि पराभूत विरोधकांना, गुलामांना दैत्य, दानव, राक्षस या रुपात सादर केले जाईल. या देवांच्या नावावर अनेक चमत्कारीक दंतकथा लिहिल्या जातील. शिक्षणावर बंदी असल्यामुळे शिक्षणाच्या नावावर हेच शिकवून जनतेला अंधश्रद्ध बनविले जाईल. त्यामुळे काही काळानंतर सर्वसामान्य लोकांना तेच खरे आहे असेही वाटेल. पुढे जे लोक हे चुकीचे आहे असे समजविण्याचा प्रयत्न करतील त्यांना धर्मद्रोही ठरविले जाईल. विरोध करणा-यास धार्मिक कायद्यानुसार जीभ छाटने, कानात तप्त शिसे ओतने, शिरच्छेद करणे अशा शिक्षा दिल्या जातील. 

पुढील काळात कदाचित तालिबान्यांचेच पाच सहा राजकीय पक्ष तयार केले जातील. त्यापैकी कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी सत्ता मुख्यता तालिबान्यांच्याच हातात राहील. याची काळजी घेतली जाईल. 

पोलिस, न्यायव्यवस्था, वेगवेगळ्या तपास संस्था, उद्योग, देशाची संपत्ती मोजक्या तालिबान्यांच्या हातात एकवटली जाईल. तालिबान्यांनी कितीही खून, दंगे, भ्रष्टाचार, बँकांची लूट, काळा पैसा जमा केला तरीही त्यांना कुठलीही शिक्षा होणार नाही किंवा अतिशय नाममात्र शिक्षा होईल. वेगवेगळ्या तपास संस्थांमध्ये उघड़ आणि छुप्या तालिबान समर्थक विचारसरणीच्या लोकांच्या नेमणुका केल्या जाईल. मग हे अधिकारी तालिबान्यांनी केलेल्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून तपासाची दिशा बदलतील. आणि तालिबान्यांचा विरोध करणा-या प्रत्येक निरपराधांना खोटे आरोप, खोटे पुरावे, खोटया साक्षीदारांचा वापर करुन त्यांना खोट्या गुह्यात अडकविले जाईल. 

विरोधकांनी पक्षपात होतोय अशी ओरड करु नये म्हणून तिथल्या न्यायव्यवस्थेला शंभरातून एखाद्या प्रकरणात विरोधकांच्या बाजूने निर्णय द्यावा लागेल. बाकी नव्व्यान्नव प्रकरणात तालिबान्यांना शिक्षा होणार नाही याची काळजी तिथली न्यायव्यवस्था घेईल. पूर्ण मीडिया सुद्धा तातीबान्यांचाच राहील. त्यामुळे मिडियाच्या माध्यमातून मोहीम उघडून तालिबान विरोधकांना रात्रंदिवस देशद्रोही, आतंकवादी, नक्षलवादी वगैरे ठरविले जाईल. 

तपास संस्था आणि न्यायव्यवस्था पक्षपाती आहे, तालिबान समर्थक आहे अशी कुणी ओरड केली की मग तालिबानी भक्त म्हणतील, "अच्छा! तर तुमच्या बाजूने निर्णय दिला तर निष्पक्ष आणि आमच्या बाजूने निर्णय झाला तर पक्षपाती." 

तालिबानी नेत्यांची मूलं विदेशात जाऊन उच्चशिक्षण घेतील. तिथून परत आल्यानंतर शासन प्रशासनात प्रमुख पदांवर त्यांच्या नियुक्त्या केल्या जातील. शिक्षण, रोजगार इत्यादी प्रत्येक ठिकाणी प्रमुख जागी तालिबानीच भरले जातील. गुलाम, अशिक्षित जनता मात्र मोर्चे, दंगे, धार्मिक यात्रा यात गुंग राहील. अनेक वर्ष मागणी केल्यानंतर कदाचित कागदावर का होईना काही गुलामांना शिक्षण आणि रोजगारात आरक्षण दिले जाईल ज्याचा फ़ायदा त्यांच्यापैकी १% लोकांना सुद्धा होणार नाही. काही वर्षानंतर तालिबानी आणि त्यांचे चाटुकार म्हणतील, "एवढ्या वर्ष आरक्षण देऊनही यांचं पोट भरत नाही." काही म्हणतील यांच्या नेत्याने फ़क्त १० वर्षासाठी आरक्षण मागितले होते म्हणून आता बंद करा. गुलामांच्या मुलांनी तालिबान्यांची बरोबरी करु नये, त्यांना शिक्षण आणि आपला विकास यावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करता येऊ नये म्हणून त्यांच्यावर नेहमी अत्याचार केले जातील. अशातच त्या अत्याचारापासून त्यांचा बचाव करण्यासाठी एखादा स्पेशल कायदा तयार केला जाईल. परंतु बहुसंख्य पोलिस, तपास अधिकारी, न्यायाधीश तालिबानीच असल्यामुळे त्या कायद्याद्वारे अपवाद वगळता एकाही तालिबान्यांना शिक्षा होणार नाही. मग तालिबान समर्थक आणि मीडियाद्वारे अत्याचाराचे आरोप हे खोटे असतात असा प्रचार केला जाईल. आता हा कायदा रद्द करा अशी मागणी केली जाईल. 

पुढे काही तालिबान्यांमधुनच काही तालिबानी अत्याचारावर एक शब्दही न बोलता पर्यावरण संवर्धन, नदी बचाओ, भाषा विकास, अंधश्रद्धा निर्मूलन, गरीबांची सेवा अशा कामात स्वतःला वाहून घेतील. तालिबानी मीडिया हिरो म्हणून त्यांना प्रोजेक्ट करेल. त्यांच्यावर चित्रपट, सीरियल्स निघतील. 

आणखी ब-याच गोष्टींची कल्पना करता येते. जसे विरोधकांनी शिक्षण, रोजगार, आरोग्य, याकडे लक्ष देऊ नये, तालिबान्यांचा काळा पैसा, भ्रष्टाचार, लुटलेल्या बँका याकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून एखाद्या धार्मिक स्थळाचा वाद, त्यावरून राजकारण, विरोधकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी देशभक्तीच्या नावाने वेगवेगळ्या संघटना, मंदबुद्धी भक्तांना खोटा इतिहास आणि फेक पोष्ट कॉपी पेस्ट करता याव्यात म्हणून आयटी सेल वगैरे वगैरे. 

परंतु आतापुरते एवढेच.

ब्राम्हणांत वोल्टेअर निर्माण होऊ शकत नाही

दाभोळकरांच्या विषयावरून काही आंबेडकरी विद्वानांचे म्हणणे आहे की 'तुम्ही दाभोळकर, रवीशकुमार यांच्या भूमिकेबद्दल शंका का घेता, ते आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत, अशाने आंबेडकरी समाज एकटा पडेल वगैरे वगैरे. 

आता हाच न्याय जर डॉ. आंबेडकरांना लावला तर आपल्या महत्वाच्या कामातून वेळात वेळ काढून काँग्रेस आणि गांधींचे पितळ उघडं पाडणारं 'कॉंग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रति काय' केले?' हा ग्रंथ लिहून त्यांनी चुकच केली म्हणावे लागेल. मुळात ब्राम्हणवादी भूमिका काय घेतात हे महत्वाचे आहे. देशात जातीचा प्रश्न महत्वाचा असतांना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुनही काहीजण पर्यावरण, समाजसेवा, साहित्य हे काम करुन मोठे होऊ शकतात. परंतु याने जातीयवादामुळे ज्या समाजाला संधी नाकारल्या जातात, अत्याचार होतात त्यांना काय फ़ायदा होतो. प्रकाश आमटे जंगलात राहून आदिवासींसाठी काम करतात, त्यांच्यासाठी दवाखाने, शाळा चालवितात. परंतु हे काम तर सरकारचे आहे. सरकार हे काम का करीत नाही आणि प्रकाश आमटे सरकारला याचा जाब का विचारत नाही? तरीही प्रकाश आमटे अतिशय सेवाभावी, त्यागी, महान व्यक्ती ठरतात. त्यांच्यावर चित्रपट वगैरे निघतात. मीडिया त्यांना हिरो ठरवितो. झारखंड, छत्तीसगढ़ मध्ये आदिवासींच्या जमिनी हिसकाविण्यासाठी अनेक फेक इनकाउंटर झाले, त्यांची ह्त्याकांडे झाली, २०-३० वर्षानंतर ते फेक इनकाउंटर होते हे मानवाधिकार आयोग सांगतो तेंव्हा ही गोष्ट लक्षात येते यावर प्रकाश आमटे कधी बोलले, कधी न्यायालयात गेले, कधी सरकारला जाब विचारला? देशातल्या तपास संस्था ज्या कोणत्याही निर्दोष व्यक्तीला गुन्हेगार आणि गुन्हेगाराला निर्दोष ठरवू शकतात त्या तपास संस्थात सर्वोच्च पदावर किती आदिवासी अधिकारी आहेत हा प्रश्न प्रकाश आमटेने कधी विचारला? 

ब्राम्हण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असले तरीही असे प्रश्न विचारत नाहीत. मग हे प्रश्न कोण विचारणार? आम्ही विचारले तर आम्ही ब्राम्हणांच्या भूमिकेवर शंका घेणारे आणि जातीयवादी. असे करु तर आम्ही एकटे पडू. 

एकटे पडण्याच्या भितीपायी कधीपर्यंत याकडे दुर्लक्ष करायचं?

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

.... तर आर एस एस चा कधीचाच बंदोबस्त झाला असता

ही जर-तर ची गोष्ट आहे म्हणून कोणी हसलं किंवा विकृत म्हटलं तरी मला काही फरक पडणार. कारण त्यामुळे खाली लिहिलेलं जे सत्य आहे ते बदलणार नाही.

डॉ. आंबेडकरांनी ब्राम्हण, ब्राम्हणेत्तर आणि अस्पृश्य अशी जातीय उतरंड विषद केली आहे. ब्राम्हण अल्पसंख्य धार्मिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक सर्व सत्तेवर ताबा असलेले आणि अस्पृश्यांचे विरोधक. ब्राम्हणेत्तर बहुसंख्य, ज्यांच्यावर अस्पृश्यांएवढे बंधने नाहीत, ब्राम्हणांपेक्षा खालच्या स्थानावर परंतु अस्पृश्यांपेक्षा स्वतःला उच्च समजणारे आणि म्हणून अस्पृश्यांचे ते सुद्धा विरोधक. अस्पृश्य अल्पसंख्य. बहुसंख्य ब्राम्हण, ब्राम्हणेत्तरांकडून प्रत्येक बाबतीत नागवले गेलेले. या जातीय उतरंडीत प्रत्येक जात आपल्यापेक्षा वरच्या जातीचा जेवढा राग करीत नाही त्यापेक्षा जास्त खालच्या जातीचा द्वेष करतो. डॉ. आंबेडकर नाही तर अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधित्व मी करतो असे म्हणणा-या गांधींना ही परिस्थिती माहीत नव्हती असे म्हणता येत नाही. या परिस्थितीत अस्पृश्यांच्या हिताची काळजी घेणारा खरा नेता निवडून येण्यासाठी अस्पृश्यांचे स्वतंत्र मतदार संघ आवश्यक होते. कारण अस्पृश्य अल्पसंख्य असल्यामुळे स्वतःच्या मतांवर निवडून येऊ शकत नव्हते. आणि बहुसंख्य ब्राम्हण, ब्राम्हणेत्तर अस्पृश्यांच्या हिताची काळजी घेणा-या नेत्याला मत सुद्धा देणार नव्हते. ह्या परिस्थितीची पूर्ण कल्पना असल्यामुळे डॉ. आंबेडकर आणि ब्रिटिशांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघासाठी गांधींचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु गांधी तयार झाले नाही. तरीही ब्रिटिशांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला आणि त्याविरोधात गांधीनी प्रथम आणि अंतिम आमरण उपोषणाद्वारे ब्लैकमेल करुन डॉ. आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघ सोडावयास भाग पाडले. गांधींना अस्पृश्यांच्या हिताची काळजी घेणारे खरे नेते नको होते तर ब्राम्हण-बनिया सवर्ण उच्चजातीच्या मतानुसार चालणारे अस्पृश्य नेते हवे होते जे त्यांना संयुक्त मतदार संघात आरक्षित जागेवरुन निवडता आले. 

आजही बहुसंख्य ब्राम्हण-ब्राम्हणेत्तर अनुसूचित जाती,जमातीमधून तोच नेता निवडतात जो त्यांच्या मतानुसार चालतो. अनुसूचित जाती, जमातीच्या १३१ खासदारांपैकी कोण त्यांच्या वर्गाचे खरे प्रतिनिधित्व करतो? सगळे होयबा आहेत. 

मग स्वतंत्र मतदारसंघ असते तर अनुसूचित जाती, जमातीचे खरे नेते, आर एस एस चे खरे विरोधक १३१ प्रतिनिधि निवडून आले असते. गांधींच्या हट्टामुळे ते शक्य झाले नाही. आज छुपे संघी आणि उघड़ संघी आलटून पालटून सत्तेत येत आहेत. छुपे संघी फ़क्त दाखविण्यापुरती आर एस एस वर बंदी घालण्याची नौटंकी करु शकतात. त्याशिवाय काही नाही. 

आणि यासाठी गांधींशिवाय जबाबादर कोण?

बुधवार, २१ जुलै, २०२१

जो तो उठला सुटला पंढरी-पैठण-आळंदीला जातो

जो तो उठला सुटला पंढरी-पैठण-आळंदीला जातो. मला आपणास हे विचारावयाचे आहे की पंढरी-पैठण-आळंदीला जाऊन आपण काय मिळविले आहे? पंढरीला जाऊन कोणाचे भले झाले आहे काय? किंवा   आळंदीला जाऊन कोणाचा उद्धार झाला आहे काय? तुम्ही एकनाथाला फार मोठे मानता. त्याने काय केले? एक भागवत ग्रंथ लिहिला पण त्याची कथा मी आज तुम्हाला सांगतो. तो मेला त्यावेळी त्याची प्रेतयात्रा एका रस्त्याने जात होती. त्याच रस्त्याने एक सासुरवाशीण एक महार सोबतीला घेऊन सासरी जावयास निघाली होती. तिने ते एकनाथाचे मढे पाहिले. हा मला अपशकून झाला असे ती महारास बोलली. हे तिचे बोलणे एकनाथाच्या मढयाने ऐकले तेव्हा एकनाथ तिरडीवर उठून बसला आणि त्या सासुरवाशीणीस बोलला "मी आज मरत नाही. कारण तुला अपशकून होत आहे" असे म्हणून तो परत घरी गेला. नंतर पुढे एकनाथ व त्याची बायको यांनी नदीत जीव दिला. त्यांनी जीव का दिला याचा अद्याप शोध लागला नाही. आता तुम्हीच सांगा, कोणाचे तरी मढे जिवंत झाल्याचे तुम्ही ऐकले किंवा पाहिले आहे काय?

दुसरे ज्ञानेश्वराने तरी काय केले? त्याने भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे सार काय? तर जग हे ब्रम्हमय आहे. सर्व जगच जर ब्रम्ह आहे तर मग महार मांगातही ब्रम्ह असावयास पाहिजे. मग ज्ञानेश्वर महार मांगात का राहिला नाही? ब्राम्हणाने आपणास परत घ्यावे म्हणून त्याने प्रयत्न का केला? ब्राम्हणाने त्याला वाळीत टाकल्यानंतर त्याने त्यांना सांगावयास पाहिजे होते की, तुम्ही जरी मला जातीत घेतले नाही तरी हरकत नाही. मी महार-मांगात जाऊन राहीन कारण जग हे ब्रम्हमय आहे. असे ज्ञानेश्वराने का सांगितले नाही? ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी चातुर्वर्ण्याचे हिरीरीने समर्थन केले. सर्वसाधारण जनतेला भुलविण्यासाठी हे सर्व थोतांड रचलेले आहे आणि या थोतांडाला तुम्ही सर्व भुललेले आहात. आजचे युग हे विचाराचे युग आहे. कोणीही कसलेही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कारण यापुढे तुम्हाला जगात वागताना विचार करुनच वागले पाहिले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३

अमेरिकरतील श्वेत आणि भारतातील सवर्ण यांची आरक्षणाबाबत भूमिका

अमेरिकेतील श्वेत (गोरे) लोक निगों या समुहाला आपल्या बरोबरीत आणण्याकरिता जे करु शकले ते भारतातले सवर्ण अनुसूचित जाती, जमातीच्या बाबत का करु शकले नाहीत?

भारतात एससी, एसटी करीता आरक्षण (रिझर्वेशन) आहे तसेच अमेरिकेत नीग्रोंकरीता सकारात्मक निति (अफर्मेटिव्ह पॉलिसी) आहे. सहाजिकच अमेरिकेतील श्वेत लोकांचे नीग्रोंबाबतचे धोरण सकारात्मक असल्यामुळे आज नीग्रो अमेरिकेतील सर्व क्षेत्रात श्वेत लोकांच्या जवळपास पोहचले आहे. आणि महत्वाचे म्हणजे अमेरिकेतील श्वेत लोकांना आम्ही हे करुन दाखविले याचा सार्थ अभिमान सुद्धा आहे.

याउलट भारतात एससी, एसटी करीता आरक्षण आहे परंतु हे धोरण राबविणा-या सवर्णांचे धोरण मात्र सकारात्मक नाही. तुम्हाला कोल्हा आणि करकोचा ही गोष्ट माहीत असेलच. त्यात जसा एक दिवस कोल्हा करकोचाला खीर खाण्यास आमंत्रण देतो. करकोचा तिथे जाऊन बघतो तर एका सपाट ताटात कोल्ह्याने करकोचाला खीर दिलेली असते. कोल्हा म्हणतो, 'करकोचराव पोटभर खा. तेवढं संपवा आणखी देतो.' करकोचाच्या पोटात किती खीर जाते आणि तो कसा उपाशी राहतो ही गोष्ट पुढे सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही.

सवर्णांनी एससी, एसटीला दिलेलं आरक्षण म्हणजे कोल्ह्यने करकोचाला दिलेली खीर आहे. कधी नॉट अव्हेलेबल नॉट सूटेबल, कधी रोष्टर, कधी एकल पद, कधी जाहिरतीत घोळ, कधी तीन वर्षे एससी, एसटी ची जागा न भरणे व शेवटी ती मग ओपन मधून भरणे. आणि शेवटचा उपाय म्हणजे खाजगीकरण.

भारतात एससी, एसटी च्या पोष्ट भराव्या लागू नये म्हणून सवर्ण सत्ताधा-यांकडून अशी षडयंत्रे करण्यात येतात. जर स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनच प्रत्येक विभागात एससी, एसटी चे किती पदे भरावयास पाहीजे होती आणि भरलीत याचा डेटा काढला तर करकोचाला जेवढं मिळालं तेवढच एससी आणि एसटी ला मिळालयं हे दिसून येईल.

एवढे षडयंत्र करूनही सवर्णांना त्याची लाज वाटतेय असे मुळीच नाही उलट सत्तर वर्षापासून खात आहेत पण यांचं पोट काही भरतच नाही, हे बोल आहेतच. आणि महत्वाचे म्हणजे आपल्या देशात एससी एसटी ची उन्नती होत असेल तर सवर्णांच्या पोटात दुखतयं हे सुद्धा खरं आहे

मंगळवार, २० जुलै, २०२१

डॉ. आंबेडकरांचे निवडक विचार - १

कांग्रेस आणि गांधी कोणाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत हा प्रश्न त्यांना विचारणे आवश्यक आहे. कारण देश गुलामच राहिला तरी चालेल पण पददलित वर्गाला मात्र सवर्ण हिंदू किंवा ब्राम्हणांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ द्यावयाचे नाही ही कांग्रेस आणि गांधीची नीती होती. पददलितांना मुक्ती हवीच असेल तर त्यांनी खुशाल धर्मांतर करावे, पण हिंदुधर्मात राहावयाचे असेल तर मात्र त्यांना सवर्ण हिंदूंचे गुलाम म्हणूनच राहावे लागेल, हेच कांग्रेस आणि गांधी यांचे धोरण होते. 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

काय अस्पृश्य काँग्रेसला जाऊन मिळालेत? ही बाब स्वीकारणे मलातरी स्वप्नातही शक्य नव्हते. कारण ज्या गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांच्या राजकीय अधिकाराच्या मागणीला पदोपदी आणि शेवटच्या क्षणापर्यंत विरोध केला, ते सर्व विसरून अस्पृश्य सामुदायिकरित्या काँग्रेसला जाऊन मिळाले असतील, यावर विश्वास ठेवणे मलातरी शक्यच नव्हते. कदाचित काही विश्वासघातकी मंडळी, काँग्रेसने फेकलेल्या सोन्याच्या तुकड्याच्या प्रलोभनाला बळीही पडले असतील. त्यासाठी त्यांनी अस्पृश्य समाजाचा विश्वासघातही केला असेल. पण अस्पृश्य सामुदायिकरित्या काँग्रेसला जाऊन मिळालेत यावर माझा विश्वास बसणे कदापिही शक्य नव्हते. म्हणूनच १९३७ च्या निवडणूक निकालाचे अध्ययन व विश्लेषण करण्याचा मी निर्णय घेतला आहे. 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अस्पृश्यांची वाईट स्थिती कायदे वाईट आहेत म्हणून नाही तर ती प्रशासनाच्या आक्रमक दृष्टिकोनामुळे वाईट आहे. प्रशासनावर हिंदूंचे प्रभुत्व असून ते अस्पृश्यांविरुद्ध आपले परंपरागत पूर्वग्रहही प्रशासनात आणतात. म्हणून अस्पृश्यांना पोलिस कधीही न्याय आणि न्याय व्यवस्था संरक्षण देऊ शकत नाही. किंवा वैधानिक कायद्यांचे लाभही त्यांना मिळू शकणार नाहीत. जोपर्यंत सर्व सार्वजनिक सेवा सवर्ण हिंदूंच्या प्रभुत्वाखाली राहतील व सवर्ण हिंदूच या सेवात कार्यरत राहतील तोपर्यंत अस्पृश्यांची स्थिति अशीच राहणार आहे. या सार्वजनिक सेवा अस्पृश्यांप्रती कमी दुराग्रही आणि अधिक उत्तरदायी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सार्वजनिक सेवांच्या उच्च पातळीवर प्रशासनात अस्पृश्यांनाही स्थान असावे. 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हिंदुओं के बारे में महत्वपूर्ण तथ्य यह है कि हिन्दू होने से पूर्व वे किसी जाती के सदस्य है। जातियां इतनी एकांतिक तथा अलग-अलग है कि हिन्दू गैर-हिन्दू के प्रति मुख्यतः हिन्दुपन की भावना से व्यवहार करेगा। लेकिन वह दूसरी जाति के प्रति मुख्यतः जाति भावना के आधार पर व्यवहार करेगा।
- डॉ. बी. आर. अम्बेडकर
(साउथबरो कमेटी के समक्ष दिया गया साक्ष्य)

एकदा श्री गांधींनी काँग्रेसच्या सदस्यत्वाच्या अटी बदलण्याचा प्रयत्न केला. सदस्यत्वासाठी वर्षाला चार आने देण्याच्या अटीच्या ऐवजी, श्री गांधींना दोन अटी हव्या होत्या: १) अस्पृश्यता नष्ट करणे आणि २) सूत कातणे. काँग्रेसवाले सूत कातण्याची अट मान्य करायला तयार होते, पण अस्पृश्यता निर्मूलनाची अट मान्य करायला ते तयार नव्हते. काँग्रेसवाल्यांनी श्री. गांधी यांना सांगितले की जर त्यांनी अस्पृश्यता-निवारण यावर आग्रह धरला तर सर्व काँग्रेस समित्या बंद कराव्या लागतील. हा विरोध इतका जोरदार होता की श्री. गांधींना त्यांचा प्रस्ताव मागे घ्यावा लागला. अशा परिस्थितीतही, जेव्हा श्री. गांधींनी गोलमेज परिषदेपूर्वी आग्रह धरला की काँग्रेसने अस्पृश्यता निर्मूलनाची शपथ घेतली होती आणि अस्पृश्यांना कोणत्याही संकोचशिवाय हिंदूंच्या दयेवर सोडले जाऊ शकते, त्यावरून हे दर्शवते की श्री गांधी हे आहेत. सत्याच्या बाबतीत कंजूषि करुन त्याला खोट्याच्या टोकावर नेऊ शकतो.
- डॉ आंबेडकर
बाबासाहेब डॉ आंबेडकर, संपूर्ण वाङ्गमय, खंड -10, (पृष्ठ 234-235)

१९११ च्या जनगणनेनुसार त्यावेळेस अस्पृश्यांची लोकसंख्या पाच कोटी होती. १९३२ पर्यंत हे पाच कोटी अस्पृश्य कसे जीवन जगतात यांच्याशी सवर्ण हिंदूंचे काहीही देणेघेणे नव्हते. परंतु १९३२ नंतर मात्र अस्पृश्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही ही भूमिका त्यांनी घेतली. ह्या भूमिकेमागे सवर्णांची वृत्ती कशी काम करत होती हे समजून घेणे महत्वाचे आहे.

१९३२ पर्यंत अस्पृश्यांची लोकसंख्या राजकीयदृष्टया महत्वाची नव्हती. सामाजिक दृष्टया ते हिंदू समाजाच्या बाहेर होते, कारण हिंदू समाज चार वर्ण, अर्थात ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्रांनाच मान्यता देत होता. फ़क्त राजकीय प्रयोजनासाठीच अस्पृश्यांना हिंदू समाजाचे अंग मानले जात होते. विधान मंडळातील प्रतिनिधित्वासाठी अस्पृश्यांच्या संख्येला महत्त्व नव्हते. कारण १९३२ पर्यंत राजकीय प्रश्न फ़क्त विधान मंडळामध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जागा वाटपाचा प्रश्न हाच होता. हिंदूना मिळणा-या जागा स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यात वाटपाचा हा प्रश्न नव्हता. कारण संपूर्ण जागा स्पृश्यांनाच मिळत होत्या. यामुळे अस्पृश्यांची लोकसंख्या किती आहे याची हिंदूंना पर्वा नव्हती. परंतु १९३२ पर्यंत या परिस्थितीत बदल झाला. आता जागा वाटपाचा प्रश्न फ़क्त हिंदू आणि मुस्लिमांमधील जागा वाटपाचा प्रश्न राहिला नाही. आता अस्पृश्य हा दावा करु लागले की जागा वाटप फ़क्त हिंदू आणि मुस्लिमांमध्ये न होता हिंदूंना जो हिस्सा मिळत आहे त्यातून अस्पृश्यांना वेगळा हिस्सा देण्यात यावा. अस्पृश्यांचा हा दावा ब्रिटिश सरकारने मान्य केला. त्याचप्रमाणे त्यांचा सदस्य गोलमेज परिषदेत त्यांचे प्रतिनिधित्व करेल हे सुद्धा मान्य केले. एवढेच नाही तर गोलमेज परिषदेतील अल्पसंख्यांक उप-समितीने हे सुद्धा मान्य केले की नविन संविधानानुसार सर्व विधान मंडळात अस्पृश्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाईल. याप्रमाणे अस्पृश्यांच्या लोकसंख्येला आता महत्त्व प्राप्त झाले. आता अस्पृश्यांची लोकसंख्या जेवढी कमी असेल, राजकीय प्रतिनिधित्वाचा तेवढा मोठा हिस्सा स्पृश्य हिंदूंना प्राप्त होईल. यावरून हे स्पष्ट होते की जे हिंदू १९३२ पूर्वी अस्पृश्यांची लोकसंख्या किती आहे यावर कुठलेही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नव्हते ते हिंदू १९३२ नंतर मात्र अस्पृश्यांचे अस्तित्वच का नाकारु लागले.
संदर्भ - करोडो की आबादी को नकारने का प्रयास
(बाबासाहेब डॉ. अम्बेडकर, संपूर्ण वाङ्गमय खंड-10)

ब्राम्हण शास्त्रकारांनी शूद्रांवर लादलेली अपात्रतादर्शक बंधने व त्या बंधनांचा भंग केला तर त्याबद्दल सांगितलेल्या शिक्षा

१) कथक संहिता आणि मैत्रयाणी संहिता - "अग्निहोमासाठी ज्या गाईच्या दुधाचा उपयोग करावयाचा आहे, ते दूध शुद्राला मिळू देऊ नये." 
२) शतपथ ब्राम्हण, मैत्रयाणी संहिता आणि पंचवीस ब्राम्हण - "यज्ञ करीत असता शूद्रांशी बोलू नये आणि यज्ञाच्या वेळी शुद्राने उपस्थित होऊ नये." 
३) शतपथ ब्राम्हण आणि कथक संहिता - "सोमरस पिण्याच्या वेळी शुद्राला जवळ येऊ देऊ नये. सोमरस पिऊ देऊ नये." 
४) ऐतरेय ब्राम्हण आणि पंचवीस ब्राम्हण - "शुद्र हा दुस-यांचा नोकर आहे. (आणि नोकराच्या कामाशिवाय त्याला कोणतेही काम करता येणार नाही)" 
५) आपस्तंब धर्मसूत्र - शुद्र व जातिबहिष्कृत माणूस या दोघांना स्मशान भूमिप्रमाणे समजावे. 
वेदाभ्यासी विद्यार्थी आणि शुद्र वा स्त्री यांची सहज नजरभेट झाली तरी त्या विद्यार्थ्याने वेदघोष बंद केले पाहिजेत. अस्वच्छ ब्राम्हण किंवा इतर द्विज जातीतील अस्वच्छ माणूस यांनी अन्नाला स्पर्श केला तर ते अन्न अस्वच्छ होते, पण ते खाण्यास अयोग्य होत नाही. परंतु अस्वच्छ शुद्राने काहीही आणलेले असो - मग त्याला त्याचा स्पर्श झालेला असो वा नसो - ते कदापिही खाऊ नये. 
एखाद्याला शुद्राचा स्पर्श झाला तर त्याने जेवण घेऊ नये. 
६) विष्णुस्मृती - शूद्रांनी द्विज जातीतील मृत मनुष्याला, मग तो मृत मनुष्य जरी त्या शुद्राचा बाप असला तरी, उचलून स्मशानात नेऊ नये. 
७) वसिष्ठ धर्मसूत्र - सुतार, परीट,कुलाल, हेर आणि पायताणे शिवणारा चांभार यांनी दिलेले अन्न खाऊ नये. त्याचप्रमाणे, शुद्राने दिलेले अन्न खाऊ नये. दृष्ट शुद्रवंश ही स्मशानभुमी होय हे उघड़ आहे. म्हणून शूद्रांच्या सानिध्यात वेदघोष कधीही करु नये. 
काहीजण विद्याभ्यास करुन व काही घोर तपस्या करुन दान स्वीकारण्यास योग्य झाले. परंतु ज्याच्या पोटात शुद्राने दिलेले अन्न गेलेले नाही, असा ब्राम्हण दान स्वीकारण्यास सर्वांपेक्षा योग्य होय. शुद्राने दिलेले अन्न पोटात असता जर ब्राम्हण मेला तर पुढच्या जन्मात तो एखाद्या गावातील डुक्कर म्हणून जन्मेल; किंवा ज्या शुद्राचे अन्न त्याच्या पोटात होते त्या शुद्राच्या कुटुंबात तो ब्राम्हण पुढील जन्म घेईल. कारण शूद्रांचे अन्न खाल्ल्यामुळे त्या अन्नाची सत्वे ब्राम्हणाच्या रक्तमांसात मिसळलेली असतील, अशा स्थितीत त्याने वेदमंत्रांचा घोष दररोज केला किंवा त्याने दररोज अग्नीची पूजा केली किंवा परमेश्वराची प्रार्थना केली, तरी तो स्वर्गाच्या मार्गाला जाऊ शकणार नाही. 
परंतु, जर ब्राम्हण शुद्राचे अन्न खाल्ल्यानंतर सजातीय पत्नीबरोबर रममाण झाला व त्यापासून त्याला मुलगे झाले तर ते मुलगे शुद्र जातीचे मानण्यात येतील; व अशा त-हेच्या ब्राम्हणाला स्वर्गप्राप्ती होणार नाही. 
८) मनुस्मृति - शुद्रांचे राज्य किंवा अधार्मिक लोकांनी चालविलेले राज्य, अथवा धर्मलंड लोकांनी हल्ला करुन घेतलेले राज्य किंवा हलक्या कुळात जन्मलेल्या लोकांनी काबिज केलेले राज्य यात ब्राम्हणाने वास्तव्य करु नये. जो ब्राम्हण शूद्रांसाठी यज्ञकर्म करतो त्याला श्राद्धविधिसाठी आमंत्रण देऊ नये. श्राद्धाच्या जेवणापासून जे काही फायदे होणार असतील ते अशा ब्राम्हणांच्या उपस्थितिमुळे नष्ट होतील. शुद्राचे प्रेत गावाच्या दक्षिण वेशीतून स्मशानाकडे न्यावे; परंतु द्विजांची प्रेते अनुक्रमे पश्चिम, उत्तर व पूर्व वेशीतून स्मशानाकडे न्यावीत. 
९) आपस्तंब धर्मसूत्र - उजवा हात पुढे करुन व तो कानांच्या समांतर रेषेत धरून ब्राम्हणाने नमस्कार करावा. उजवा हात छातीच्या पुढे आडवा धरून क्षत्रियाने नमस्कार करावा. उजवा हात कमरेच्या समांतर रेषेत करुन वैश्याने नमस्कार करावा. दोन्ही हात जोडून व खाली लववून व पुढे करुन शुद्राने नमस्कार करावा. 
ब्राम्हणाच्या घरी शुद्र पाहुणा म्हणून आला तर पहिल्यांदा त्या शुद्र पाहुण्याला काहीतरी काम करावयास लावावे व त्यानंतर वाटल्यास जेवण द्यावे. शुद्राकडून काही काम करुन न घेता त्याला जर ब्राम्हणाने जेवण दिले तर ब्राम्हणाने त्या शुद्राचा आदरसत्कार केला असे होईल. 
अथवा ब्राम्हणाच्या घरात जे चाकर असतील त्यांनी राजकोठारातून तांदूळ आणावेत व त्या शुद्र पाहुण्याला पक्वान्न घालून त्याचे आदरातिथ्य करावे. 
१०) विष्णुस्मृती - आपल्या घरी एखाद्या शुद्राचा जो आदरसत्कार करील किंवा जो देवासाठी तयार केलेले हवनपदार्थ अथवा श्राद्धाचे अन्न एखाद्या धार्मिक तपस्व्याला देईल त्याला १०० पण दंड भरावा लागेल. 
११) मनुस्मृति - ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यांना संपत्ती, नातेवाईक, वयोमान, धर्मपंथ व ज्ञान या पाच कारणांनी समाजात आदर मिळतो. शेवटचे कारण हे अत्यंत महत्वाचे आहे. परंतु एखाद्या शुद्राजवळ संपत्ती व ज्ञान याचे केवढेही भांडार असले तरी तो केवळ त्या कारणामुळे आदरास पात्र ठरत नाही. शुद्र आपल्या वयोमानाने मात्र आदरास पात्र होतो; मात्र तो जेव्हा १०० वर्षाचा होतो तेव्हाच, त्यापूर्वी नाही. ब्राम्हणाच्या घरात जर क्षत्रिय, वैश्य अगर शुद्र राहिला तर त्या ब्राम्हणाचा तो पाहुणा किंवा मित्र किंवा नातेवाईक अथवा गुरु म्हणून होत नाही. (म्हणजे फ़क्त ब्राम्हण दुस-या ब्राम्हणाच्या घरात पाहुणा होतो. दुस-या कोणाला पाहुणा होता येत नाही.)
ब्राम्हणाच्या घरचे जेवण आटोपल्यावर त्या घरात जर एखादा क्षत्रिय पाहुणा म्हणून आला तर सदर ब्राम्हणाने त्याला त्याने मागितले तर अन्न द्यावे. 
जर वैश्य अगर शुद्र ब्राम्हणाच्या घरी पाहुणा म्हणून आला तर त्या ब्राम्हणाने पाहुण्याला आपल्या नोकरांच्या हस्ते अन्न द्यावे व गोड बोलावे. 
१२) एखाद्याने क्षत्रियाला ठार मारले तर त्याने पापक्षालनार्थ ब्राम्हणास एक हजार गाई द्याव्यात. 
 एखाद्याने वैश्याला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ ब्राम्हणाला शंभर गाई दान द्याव्यात. 
एखाद्याने जर शुद्राला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ ब्राम्हणाला दहा गाई द्याव्यात. 
१३) गौतम धर्मसूत्र - क्षत्रियाने ब्राम्हणाला शिवीगाळ केली तर त्या क्षत्रियाला शंभर पणांचा दंड करावा. 
क्षत्रियाने ब्राम्हणाला मारहाण केली तर त्याला दोनशे पणांचा दंड करावा. 
वैश्याने ब्राम्हणाला शिवीगाळ केली तर त्या वैश्याला दीडशे पणांचा दंड करावा. 
परंतु ब्राम्हणाने क्षत्रियाला शिवीगाळ केली तर ब्राम्हणाला पन्नास पणांचा दंड करावा. 
ब्राम्हणाने वैश्याला शिवीगाळ केली तर ब्राम्हणाला पंचवीस पणांचा दंड करावा. 
ब्राम्हणाने शुद्राला शिवीगाळ केली तर त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करु नये. 
१३) बृहस्पती धर्मसूत्र - ब्राम्हणाने क्षत्रियाला शिवीगाळ केली तर त्या ब्राम्हणाला पन्नास पणांचा दंड करावा; त्याने जर वैश्याला शिवीगाळ केली तर त्याला पंचवीस पणांचा दंड करावा; अणि त्याने शुद्राला शिवीगाळ केली तर त्याला साडेबारा पणांची शिक्षा करावी. 
जो शुद्र आपल्या धर्मानुसार वर्तन करतो त्याला जर ब्राम्हणाने शिवीगाळ केली तरच या बाबतीत सांगितलेली शिक्षा ब्राम्हणाला देता येते. पण जर तो शुद्र शुद्धाचरणी नसेल तर अशा शुद्राला ब्राम्हणाने शिवीगाळ केली तर तो ब्राम्हणाचा गुन्हा होत नाही. 
१४) मनुस्मृति - क्षत्रियाने ब्राम्हणाला शिवीगाळ केली तर क्षत्रियाला शंभर पणांचा दंड केला पाहिजे. वैश्याने ब्राम्हणाला शिवीगाळ केली तर वैश्याला अडीचशे पणांचा दंड करावा. परंतु शुद्राने ब्राम्हणाला शिवीगाळ केली तर शुद्राला देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे. 
ब्राम्हणाने क्षत्रियाचा अपमान केला तर ब्राम्हणाला पन्नास पणांचा दंड करावा. ब्राम्हणाने वैष्याचा अपमान केला तर ब्राम्हणाला पंचवीस पणांचा दंड करावा. ब्राम्हणाने शुद्राचा अपमान केला तर त्याला बारा पणांचा दंड करावा. ब्राम्हणाने ब्राम्हणाला ठार मारले तर त्याचे सर्व तप:सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे. ब्राम्हणाने क्षत्रियाला ठार मारले तर त्याचे एक चतुर्थांश तप:सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे. ब्राम्हणाने वैश्याला ठार मारले तर त्याचे एक अष्टमांश तप:सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे. ब्राम्हणाने शुद्राला ठार मारले तर, तो जर शुद्धाचरणी असेल तर त्या ब्राम्हणाचे एक सोलांश तप:सामर्थ्य नष्ट झाले असे समजावे. 
परंतु जर ब्राम्हणाने क्षत्रियाला अनैछीकपणे ठार केले तर पापक्षालनार्थ त्या ब्राम्हणाने एक हजार गाई व बैल यांचे दान (वाटल्यास) करावे. 
१५) विष्णुस्मृती - खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाचा जर अपमान करील अगर त्याला इजा करील तर यासाठी खालच्या जातीचा माणूस आपल्या ज्या अवयवाचा उपयोग करील ते अवयव राजाने तोडून टाकले पाहिजेत. जर खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाबरोबर समानतेच्या भावनेने बसला तर त्याच्या ढुंगणावर डाग देऊन त्याला हद्दपार करावे. 
खालच्या जातीचा माणूस जर वरच्या जातीच्या माणसाच्या अंगावर थुंकला तर खालच्या जातीच्या माणसाचे दोन्ही ओठ कापून टाकावेत. 
खालच्या जातीचा माणूस जर वरच्या जातीच्या माणसाकडे घाण वारा सोडेल तर त्याचे कुल्ले कापून टाकावेत. 
जर त्याने शिवीगाळ (वरच्या जातीच्या माणासाबद्दल) केली तर त्याची जीभ छाटून काढावी. 
नीच जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाला त्याच्या कर्तव्याबद्दल उपदेश करु लागला तर राजाने त्या नीच जातीतील माणसाच्या तोंडात कढत तेल ओतण्याची शिक्षा द्यावी. 
वरिष्ठ वर्गातील एखाद्या मनुष्याच्या नावाचा किंवा जातीचा एखाद्या शुद्राने चेष्टेने उल्लेख केला तर तापवून लालबुंद झालेली लोखंडाची सळई त्या शुद्राच्या तोंडात दहा अंगुळे कोंबावी. 
१६) जो शुद्र धार्मिक तत्वांची शिकवण दुस-याला देईल किंवा वेदमंत्रांचा उच्चार करील, अथवा एखाद्या ब्राम्हणाचा अपमान करील त्याची जीभ कापून टाकली पाहिजे. 
१७) गौतम धर्मसूत्र - एखादा शुद्र जर स्वेच्छेने वेदमंत्रांचा घोष ऐकत राहिला तर कथिल व लाख यांचे तापविलेले रस त्याच्या कानात ओतावे. तो जर वेद वाचू लागला तर त्याची जीभ छाटून टाकावी. वेद जर त्याला मुखोद्गगत झाले असतील तर त्याला माधोमध उभे चिरून टाकावे. 
१८) मनुस्मृति - जो पैसे घेऊन विद्या शिकवितो, त्याचप्रमाणे जो पैसे देऊन शिकतो, जो शुद्र शिक्षकाचा पेशा करतो व जो शुद्रापासून शिकतो, अशा माणसाला देव पितृ यांच्या सन्मानार्थ जे विधि करतात त्या विधिला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देऊ नये. 
शुद्राला कोणी सल्लामसलत देऊ नये किंवा त्याला देवाला वाहून उरलेले अन्न अथवा लोणीही देऊ नये. 
शुद्राला कायदेकानून कोणी शिकवू नये किंवा त्याला धार्मिक विधि करण्याबद्दलची माहिती कोणी देऊ नये. ही आज्ञा जो पाळणार नाही तो त्या शुद्राबरोबर असमव्रत्त नावाच्या नरकाच्या घोर अंधारात खितपत पडेल. 
१९) मनुस्मृति - मनात कोणत्याही प्रकारचा किंतु न आणता ब्राम्हणाने शुद्राच्या वस्तु आपल्या ताब्यात घ्याव्यात. कारण स्वतःची चिजवस्तू शुद्राला असते. तो गुलाम आहे व त्याची जी काही चिजवस्तू असेल तिच्यावर त्याचा हक्क नसतो, तर त्याच्या धन्याचा असतो. 
शुद्र धनसंचय करण्यास समर्थ असला तरी त्याने संपत्ती कमवू नये. कारण शुद्राजवळ असलेली संपत्ती पाहिल्याबरोबर ब्राम्हणाच्या चित्ताला वेदना होतात. 
२०) मनुस्मृतिचा राजाला उपदेश - स्वतःच्या जन्माच्या आधारे जो आपल्याला ब्राम्हण म्हणवून घेतो किंवा जो स्वतःला कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता ब्राम्हण म्हणवून घेतो, तो राजाची इच्छा असेल तर, कायदेकानूनची घोषणा करील. शुद्राला असली घोषणा करण्याचा कधीही अधिकार नसतो. 
शुद्र न्यायनिवाडा करीत असता राजा जर नुसता पाहात राहील तर दलदल चिखलात गाय जशी बुडते तसे त्या राजाचे राज्य दुर्दैवाच्या खाईत बूडन जाईल. 
ज्या राज्यात शूद्रांचा प्रामुख्याने भरणा आहे आणि ज्यात धर्मलंड लोकांचा बुजबूजाट झालेला आहे व ज्यात द्विज वर्णाचा एकही माणूस नाही, असले राज्य दुष्काळ आणि निरनिराळ्या रोगांच्या साथी यांच्या ताडाख्यांनी समूळ नष्ट होईल. 
२१) आपस्तंभ धर्मसूत्र - पवित्र धार्मिक आदेश पाळण्याच्या बुद्धीने जे घोर तपश्चरणे करतात, ब्राम्हणांचे पाय घुवून जे शुद्र आपले जीवन घालवितात आणि जे आंधळे, मुके, बहिरे आणि व्याधिग्रस्त आहेत अशा लोकांना सरकारी कर माफ़ असावा. त्रैवर्णिकांची सेवाचाकरी करणे हे शास्त्राने विहित केलेले आहे. शुद्र जसजशी उच्च जातीतील माणसांची सेवाचाकरी करील तसतशी त्याला उच्च दर्जाची पुण्याई लाभेल. 
त्रैवर्णिकातील एखाद्या माणसाने शुद्र जातीच्या स्त्रिशी व्यभिचार केला तर त्याला हद्दपार करावे. 
एखाद्या शुद्राने त्रैवर्णिक स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला देहांताची शिक्षा केली पाहिजे. 
२२) गौतम धर्मसूत्र - एखाद्या शुद्राने आर्य स्त्रीशी जर जबरी संभोग केला असेल तर त्याचे लिंग तोडून टाकावे आणि त्याची मालमत्ता जप्त करावी. 
ज्या आर्य स्त्रीबरोबर शुद्राने जबरी संभोग केला असेल, तिला जर कोणी पालक असेल तर त्या शुद्राला प्रथम उपरनिर्दिष्ट शिक्षा द्यावी व त्यानंतर त्याला ठार मारावे. 
२३) मनुस्मृति - एखाद्या शुद्राने सर्वात वरिष्ठ जी जात आहे त्याच जातीतील मुलीच्या (ब्राम्हण मुलीच्या) प्रेमाची याचना केली तर त्याला देहांताची शिक्षा द्यावी. 
२४) वसिष्ठ धर्मसूत्र - वाईट वासना करणे, मत्सर करणे, असत्य बोलणे, ब्राम्हणांबद्दल वाईट रितीने बोलणे, पाठीमागे निंदा करणे आणि क्रौर्य ही शूद्रांची लक्षणे होत. 
२५) विष्णूस्मृति - ब्राम्हणाच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते मंगलकारक असावे; क्षत्रियाच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते अधिकारदर्शक असावे; वैश्याच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते संपत्तीदर्शक असावे आणि शुद्राच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते तिरस्कारदर्शक असावे. 
२६) गौतम धर्मसूत्र - फ़क्त एकदाच जिच्यामध्ये मनुष्याचा जन्म होतो अशा चवथ्या जातीत शुद्राचा जन्म होतो. तो वरिष्ठ जातीची सेवाचाकरी करतो. सेवाचाकरीचा मोबादला जो वरिष्ठ जातीकडून मिळेल त्यावर त्याने गुजराण करावी. वरिष्ठ जातीतील लोकांनी वापरून टाकलेले जोड़े त्याने घालावेत. वरिष्ठ जातीतील लोकांनी खाऊन जे अन्न शिल्लक राहिले असेल तेच अन्न त्याने खावे. 
दृष्ट बुद्धीने शिव्या देऊन त्रैवर्णिक जातीतील लोकांची जाणूनबुजून हेटाळणी करणे किंवा दृष्ट बुद्धीने त्यांना हाणमार करणे, असे वर्तन जे शुद्र करतात त्यांचे अवयव (सदर वर्तन करतांना वापरलेले अवयव) छाटून टाकावेत.
द्विज जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर समानतेच्या भावनेने बसणे, झोपणे, संभाषण करणे किंवा रास्त्याने चालणे, असले वर्तन जो शुद्र करतो त्याला ठार मारावे. 
२७) मनुस्मृति - एखाद्या शुद्राला, मग तो शुद्र गुलाम म्हणून विकत घेतलेला असो वा नसो, एखाद्या ब्राम्हणाने गुलामाचे काम करावयास भाग पाडले तर त्या ब्राम्हणाला कोणतीही शिक्षा करु नये. कारण ब्राम्हणांची सेवा करण्यासाठीच स्वयंभू परमेश्वराने शुद्राला जन्माला घातले आहे. 
धन्याने शुद्राला स्वतःच्या नोकरीतून मोकळे केले असले तरी तो शुद्र आपल्या गुलामगिरीतुन मुक्त होऊ शकत नाही. कारण गुलामगिरी ही त्याच्या जन्माची सोबतीण आहे. मग त्याच्यापासून तिला कोण मुक्त करु शकेल?
नावलौकिक कमावलेले, वेदांचा अर्थबोध जाणणारे आणि कुटुंबवाले जे ब्राम्हण आहेत त्यांची आज्ञा पाळणे हेच शूद्रांचे श्रेष्ठतम कर्तव्यकर्म होय. हे कर्तव्यकर्म करण्यानेच शुद्र आपल्या कल्याणाची तरतूद करुन ठेवतो. 
जो शुद्र वरिष्ठ जातीतील लोकांची आज्ञा पालन करील आणि ब्राम्हणांशी सदैव नम्रतेने वागेल तो पुढील जन्मी उच्च जातीत जन्म घेईल. 
ज्या शुद्राला जीवनाचे संगोपन आणि स्वर्ग प्राप्ती याची इच्छा असेल त्याने ब्राम्हणाची चाकरी करावी. कारण तो चाकरी करतांना त्याच्या कडून "ब्राम्हण" हा शब्द वेळोवेळी उच्चारला जाईल आणि त्यामुळे त्या शुद्राला जे काही कर्तव्य करावयाचे आहे त्याची पूर्ति झाली असे होईल. 
ब्राम्हणाची सेवा करणे हाच शुद्राचा उत्तमोत्तम धंदा होय. कारण त्याव्यतिरिक्त त्याने दूसरा धंदा केला तर त्यामुळे त्याचा काही फ़ायदा होणार नाही. 
घरात शिल्लक राहिलेले अन्न, जूने कपडे, कुजके धान्य आणि जूनी लाकड़ी आसने ही ब्राम्हणांनी आपल्या शुद्र नोकरास द्यावीत. 
ब्राम्हणाचे मंगलसूचक, क्षत्रियाचे सत्तासुचक, वैश्याचे संपत्तीसूचक आणि शुद्राचे तिरस्कारदर्शक असे प्रत्येकाचे नाव असावे. 
द्विज जातीत जन्मलेल्या माणसाची अत्यंत घाणेरडया शब्दांनी जो विटंबना करतो त्याची जीभ कापून टाकावी कारण विटंबना करणारा कनिष्ठ जातीचा समजला पाहिजे. 
 जर तो द्विज जातीचा उल्लेख अत्यंत अपमानकारक रीतीने करीत असला तर तापवून लाल केलेली लोखंडाची दहा बोटे लांबीची सळी त्याच्या तोंडात खुपसावी. 
जो माणूस अहंकाराच्या भरात पुरोहिताला त्याच्या कर्तव्य कर्माबद्दल जर काही सूचना देऊ लागला तर राजाने अशा माणसाच्या कानात व तोंडात कड़क तापविलेले तेल ओतवावे. 
जर एखादा माणूस आपल्या अवयवाने वरिष्ठ जातीतील माणसाला दुखापत करील तर त्या माणसाचा तो अवयव कापून टाकावा हा मनुचा दंडक आहे. 
जर तो माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर हात अगर काठी उगारील तर त्याचा हाट छाटून टाकावा आणि रागाने तो जर वरिष्ठ जातीतील माणसाला लाथेने मारील तर त्या माणसाचे दोन्ही पाय छाटून टाकावेत. 
कनिष्ठ जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर बसला तर त्याच्या ढुंगणावर डाग देऊन त्याला हद्दपार करावे, किंवा राजाने त्याचे ढुंगण कापवावे. 
कनिष्ठ जातीतील माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर जर मगरुरपणाने थुंकला तर राजाने त्याचे दोन्ही ओठ कापावेत. त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसावर लघवी केली तर त्याच्या शिस्नाचा पुढचा भाग कापवावा, आणि वरिष्ठ जातीच्या माणसाकडे घाण वारा सोडला तर त्याचे गुदद्वार कापवावे. 
कनिष्ठ जातीतील माणसाने जर वरिष्ठ जातीच्या माणसाचे केस पकडून धरले तर राजाने काही विचार न करता त्याचे दोन्ही हात कापवावेत; जर त्याने वरिष्ठ जातीच्या माणसाचे पाय, दाढ़ी, मान किंवा अंडकोष पकडले तर त्याचे दोन्ही हात कापवावेत. 
२८) नारद स्मृति - शुद्र जातीत जन्मलेल्या लोकांनी द्विज जातीत जन्मलेल्या आर्य लोकांविरुद्ध जर खोटे आरोप केले तर सरकारी अधिका-यांनी त्या शुद्र लोकांच्या जीभा माधोमध चिराव्यात आणि त्यांना खोडयात बसवावे.
एखाद्या शुद्राने द्विज जातीतील माणसाचा जर घाणेरडया शब्दांनी अपमान केला तर त्याची जीभ छाटून टाकावी. कारण तो जन्मत:च कनिष्ठ दर्जाचा आहे. 
जर एखादा शुद्र वरिष्ठ जातीतील लोकांची नावे किंवा जाती यांचा उल्लेख तिरस्कारदर्शक शब्दांनी केला तर तापवून लालबुंद केलेली दशांगुले लांबीची लोखंडाची कांब त्याच्या तोंडात कोंबावी. 
जर तो ब्राम्हणांना त्यांच्या कर्तव्यकर्माबद्दल आढ़यतेने धड़े शिकवू लागला तर राजाने कड़क तापविलेले तेल त्याच्या तोंडात व कानात ओतवावे. 
आपल्या ज्या अवयवाने शुद्र ब्राम्हणाला त्रास देईल त्याचा तो अवयव कापून टाकावा. 
जो शुद्र वरिष्ठ जातीतील माणसाबरोबर त्याच आसनावर बसतो त्याच्या ढुंगणावर डाग द्यावेत व त्याला हद्दपार करावे किंवा राजाने त्याचे ढुंगण कापवावे. 
जो शुद्र अहंकाराच्या भरात वरिष्ठ जातीतील माणसाच्या अंगावर थुंकतो त्याचे दोन्ही ओठ राजाने कापवावेत. त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसाकडे घाण वारा सोडला तर त्याचे कुल्ले कापवावेत. 

वर सांगितलेल्या प्रकारचे कायदेकानून शूद्रांच्या विरुद्ध ब्राम्हणांनी तयार केले होते. त्याचा सारांश खालील प्रमाणे देता येईल. 
१) सामाजिक रचनेत शूद्रांचा शेवटचा दर्जा ठरविण्यात आला. 
२) शुद्र हा घाणेरडा असल्यामुळे त्याला दिसेल किंवा ऐकू जाईल अशा रितीने कोणतेही पवित्र कार्य करु नये. 
३) इतर जातीतील लोकांना ज्या आदराने वागविण्यात येते तसला आदर शुद्राबद्दल दाखवू नये. 
४) शुद्राचे प्राण म्हणजे क:पदार्थ. शुद्राला कोणीही ठार मारावे. त्याबद्दल त्याला कोणीही नुकसानभरपाई मागणार नाही. नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर ती इतकी अल्पशी असावी की ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यांना ठार मारल्यानंतर जी नुकसान भरपाई घेण्यात येते तिच्या पासंगालाही ती पुरणार नाही. 
५) शुद्राने ज्ञान संपादन करु नये. त्याला शिक्षण देणे हे पाप आहे. तसेच तो गुन्हा होतो. 
६) शुद्राने स्थावरजंगम मालमत्ता जमवू नये. ब्राम्हणाला इच्छा होईल तेव्हा तो शुद्राची मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकतो. 
७) शुद्र कोणत्याही दर्जाचा अधिकारी होऊ शकत नाही. 
८) वरिष्ठ वर्गातील लोकांची सेवाचाकरी करणे हेच शुद्राचे कर्तव्यकर्म आहे व त्यामुळेच त्याला मोक्ष मिळतो. 
९) वरिष्ठ जातीतील लोकांनी शूद्रांशी मिश्रविवाह करु नये. तथापि शुद्र स्त्रीला रखेली म्हणून ठेवण्याची मुभा आहे. परंतु शुद्राने वरिष्ठ जातीतील स्त्रीच्या अंगाचा स्पर्श केला तर तो घोर शिक्षेस पात्र होतो. 
१०) शुद्र गुलामगिरीत जन्मतो व त्याला मरेपर्यंत गुलामगिरीतच ठेवले पाहिजे.

धर्मांतरीत बौद्धांबद्दल २०११ च्या जनगणनेतील निष्कर्ष

८७% बौद्ध हे इतर धर्मातून, मुख्यता हिंदू धर्मातील जातीय जुलुमाला कंटाळून धर्मांतरीत झालेले बौद्ध आहेत.
बौद्धांचा साक्षरता दर राष्ट्रीय साक्षरता दरापेक्षा जास्त असून तो ८१.२९% आहे, तर राष्ट्रीय साक्षरता दर सरासरी ७२.९८% आहे. हिंदुंचा साक्षरता दर ७३.२७% आहे तर अनुसूचित जातीचा (एससी) साक्षरता दर कमी असून तो ६६.०७% एवढा आहे. 
बौद्ध स्त्रियांमधील साक्षरता दर ७४.०४% असून एकूण लोकसंख्येचा सरासरी साक्षरता दर ६४.६३% आहे. 
बौद्धांमध्ये लिंग अनुपात प्रति १००० पुरुषामागे ९६५ स्त्रिया एवढा आहे. बौद्धांव्यतिरिक्त अनुसूचित जाती (एससी) मधील ९४५ आहे. तर राष्ट्रीय लिंग अनुपात ९४३ आहे. बौद्धांचा कल हा कमी अपत्ये जन्माला घालण्याचा आहे.
दलितांपेक्षा बौद्धांचा शिक्षणाकड़े कल जास्त आहे किंवा असेही म्हणता येईल की शिक्षित दलितांचे बौद्ध धम्माकडे वळण्याचे प्रमाण जास्त आहे. 
४३% बौद्ध शहरात राहतात तर एकूण लोकसंख्येचे हेच सरासरी प्रमाण ३१% आहे. 
इतर अनुसूचित जातीचे (एससी) राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील योगदान ४०.८७% आहे. तर बौद्धांचे अर्थव्यवस्थेतील योगदान जास्त असून ते ४३.१५% एवढे आहे. 
👇👇👇 
https://www.indiaspend.com/conversion-to-buddhism-has-brought-literacy-gender-equality-and-well-being-to-dalits-18224/

ब्राम्हणांचे ख़ास हक्क, अधिकार व सवलती

समाजात आपला दर्जा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि समाजात अपणासाठी ख़ास हक्क, अधिकार व सवलतीही राखून ठेवलेल्या आहेत असे ब्राम्हणांचे म्हणणे होते. श्रेष्ठ दर्जा, ख़ास हक्क, अधिकार व सवलती यांच्यासंबंधी जेव्हा ब्राम्हण तंटे उपस्थित करीत असत तेव्हा तेव्हा त्यांचे वर्तन इतरांना अत्यंत त्रासदायक आणि असह्य होऊ लागले.

ब्राम्हणांचा श्रेष्ठ दर्जा, ख़ास हक्क, अधिकार आणि सवलती दर्शविणारी यादी खाली दिली आहे. यादीतील सारांशरूप माहिती काणे यांचे धर्मशास्त्र भाग २ (१) पान १३८-१५३ या पुस्तकात दिलेल्या जंत्रीवरुन तयार केलेली आहे. 

१) ब्राम्हण माणूस ब्राम्हण जातीत जन्मला केवळ एवढ्याच कारणासाठी सर्वानी त्या ब्राम्हणाला सर्व वर्गाचा गुरु मानले पाहिजे. 
२) सर्व वर्गाची कर्तव्यकर्मे कोणती, त्या वर्गाने कसे राहावे व वागावे आणि त्यांच्या उपजीविकेची साधने कोणती असावीत हे सर्व ठरविण्याचा ख़ास हक्क ब्राम्हणाचा आहे. ब्राम्हण जसा उपदेश करतील त्याप्रमाणे वागणे हे सर्व वर्गाचे कर्तव्यकर्म आहे. ब्राम्हण जशी सल्लामसलत देतील त्याप्रमाणे राज्यकारभाराचा गाड़ा राजाने चालविला पाहिजे. 
३) राजाचे वर्चस्व ब्राम्हणांवर चालू शकत नाही. ब्राम्हण लोक वगळून बाकीच्या सर्व लोकांवर राजाचे वर्चस्व चालू शकते. 
४) अ) फटके मारण्याची शिक्षा ब) हातापायात बेडया घालणे क) दंड करणे ड) हद्दपार करणे इ) निंदा करणे आणि फ) त्याग करणे या शिक्षा ब्राम्हणांना माफ़ आहेत. 
५) जो ब्राम्हण श्रोत्रिय वेदामध्ये पारंगत आहे त्याला कर माफ़ आहेत. 
६) ब्राम्हणाला भूमीत जो पैसा सापडेल त्या सर्व पैशावर त्याचा मालकी हक्क ठरतो. असला पैसा राजाला सापडला तर त्याने त्यातील अर्धा हिस्सा ब्राम्हणांला द्यावा. 
७) मालमत्ता राजाकडे देऊ नये. ती मालमत्ता क्षत्रियांमध्ये किंवा ब्राम्हणांमध्ये वाटावी. 
८) रस्त्याने राजा जात असतांना त्याला श्रोत्रिय किंवा ब्राम्हण भेटला तर त्यांना प्रथम वाट द्यावी. 
९) सर्वानी ब्राम्हणांना प्रथम नमस्कार करावा. 
१०) ब्राम्हणाला मारण्याची धमकी देणे किंवा त्याला मारणे किंवा त्याच्या शरीरातून रक्त बाहेर काढणे हे गुन्हे समजले पाहिजेत. 
११) ब्राम्हण व्यक्ती पवित्र आहे. ब्राम्हणाने खून जरी केला असला तरी त्याला फाशीची शिक्षा देऊ नये. 
१२) काही गुह्यांच्या बाबतीत, त्या गुह्यासाठी इतर वर्गातील गुन्हेगारांना जी शिक्षा देतात त्या शिक्षेपेक्षा कमी शिक्षा ब्राम्हणांना दिली पाहिजे. 
१३) ज्या खटल्यात ब्राम्हण पक्षकार नाही त्या खटल्यात राजाने ब्राम्हण साक्षीदार म्हणून बोलावू नये. 
१४) एखाद्या स्त्रीला पूर्वीचे काही ब्राम्हणेत्तर नवरे जरी असले तरी अशा स्त्रीबरोबर जर ब्राम्हणाने लग्न केले तर फ़क्त ब्राम्हण त्या स्त्रीचा नवरा ठरतो. तिचा पुर्विचा क्षत्रिय, वैश्य किंवा शुद्र नवरा हा ब्राम्हणाने तिच्याशी विवाह केल्यानंतर नवरा ठरू शकत नाही. (हा क्रमांक काणे यांनी उल्लेखिलेला नाही. परंतु तो अथर्ववेद ५-१७, ८-९ यामध्ये सापडतो) 

वर सांगितलेले ब्राम्हणांचे ख़ास हक्क व सवलती यांचे विवेचन केल्यानंतर श्री. काणे यांनी आपले विचार खालीलप्रमाणे प्रदर्शित केलेले आहेत. (काणे धर्मशास्त्र, भाग २, पा. १५३-५४)- 

"ब्राम्हणांना जे आणखी सवलती हक्क देण्यात आले होते ते म्हणजे भिक्षा मागण्यासाठी दुस-यांच्या घरात निर्वेधपणे प्रवेश, सर्पण व फुले गोळा करणे, पाणी आणणे आणि यासारखी इतर कामे जर ब्राम्हणांनी केली तर ती कामे चोरीच्या सदरात मानू नयेत. दुस-यांच्या बायकांबरोबर संभाषण करण्याचा ब्राम्हणांना हक्क आहे आणि स्त्रियांशी ब्राम्हण संभाषण करीत असता ब्राम्हणांना कोणी दुस-यांनी मध्येच अडथळा उत्पन्न करु नये. नावेत मोफत बसून नदीपार इतरांच्या अगोदर जाणे हा ब्राम्हणांचा हक्क आहे. ब्राम्हण व्यापारासाठी नावेचा उपयोग करीत असतील तर त्यांना त्या नावेसाठी कर माफ़ असावा. जो ब्राम्हण प्रवासाला चालला आहे व थकला-भागलेला आहे आणि त्याच्याजवळ खाण्यास काही नाही अशा ब्राम्हणाने जर उसाच्या मळ्यातून दोन उस घेतले किंवा शेतात काही कांदे किंवा भुईमुंगांच्या शेंगांच्या डहाळ्या उपटुन घेतल्या तर त्या ब्राम्हणाच्या हातून काही अपराध होत नसतो." 

या सवलती - हककांची संख्या कालमानाने वाढत वाढत गेली. असले सवलती हक्क सच्छिल, स्वाभिमानी असलेल्या कोणत्याही माणसाचे डोके भडकून टाकतील याबद्दल तिळमात्र संशय नाही. 
- शुद्र पूर्वी कोण होते? 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

आज लोकशाहीत सुद्धा ब्राम्हण आणि तत्सम सवर्ण उच्चजातीला मिळणारे विशेष अधिकार आणि सवलती कायम आहेत फ़क्त काळानुसार त्यात बदल झाले असे वाटत नाही का?