मंगळवार, २० जुलै, २०२१

डॉ. आंबेडकरांचे निवडक विचार - १

कांग्रेस आणि गांधी कोणाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत हा प्रश्न त्यांना विचारणे आवश्यक आहे. कारण देश गुलामच राहिला तरी चालेल पण पददलित वर्गाला मात्र सवर्ण हिंदू किंवा ब्राम्हणांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ द्यावयाचे नाही ही कांग्रेस आणि गांधीची नीती होती. पददलितांना मुक्ती हवीच असेल तर त्यांनी खुशाल धर्मांतर करावे, पण हिंदुधर्मात राहावयाचे असेल तर मात्र त्यांना सवर्ण हिंदूंचे गुलाम म्हणूनच राहावे लागेल, हेच कांग्रेस आणि गांधी यांचे धोरण होते. 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

काय अस्पृश्य काँग्रेसला जाऊन मिळालेत? ही बाब स्वीकारणे मलातरी स्वप्नातही शक्य नव्हते. कारण ज्या गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांच्या राजकीय अधिकाराच्या मागणीला पदोपदी आणि शेवटच्या क्षणापर्यंत विरोध केला, ते सर्व विसरून अस्पृश्य सामुदायिकरित्या काँग्रेसला जाऊन मिळाले असतील, यावर विश्वास ठेवणे मलातरी शक्यच नव्हते. कदाचित काही विश्वासघातकी मंडळी, काँग्रेसने फेकलेल्या सोन्याच्या तुकड्याच्या प्रलोभनाला बळीही पडले असतील. त्यासाठी त्यांनी अस्पृश्य समाजाचा विश्वासघातही केला असेल. पण अस्पृश्य सामुदायिकरित्या काँग्रेसला जाऊन मिळालेत यावर माझा विश्वास बसणे कदापिही शक्य नव्हते. म्हणूनच १९३७ च्या निवडणूक निकालाचे अध्ययन व विश्लेषण करण्याचा मी निर्णय घेतला आहे. 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अस्पृश्यांची वाईट स्थिती कायदे वाईट आहेत म्हणून नाही तर ती प्रशासनाच्या आक्रमक दृष्टिकोनामुळे वाईट आहे. प्रशासनावर हिंदूंचे प्रभुत्व असून ते अस्पृश्यांविरुद्ध आपले परंपरागत पूर्वग्रहही प्रशासनात आणतात. म्हणून अस्पृश्यांना पोलिस कधीही न्याय आणि न्याय व्यवस्था संरक्षण देऊ शकत नाही. किंवा वैधानिक कायद्यांचे लाभही त्यांना मिळू शकणार नाहीत. जोपर्यंत सर्व सार्वजनिक सेवा सवर्ण हिंदूंच्या प्रभुत्वाखाली राहतील व सवर्ण हिंदूच या सेवात कार्यरत राहतील तोपर्यंत अस्पृश्यांची स्थिति अशीच राहणार आहे. या सार्वजनिक सेवा अस्पृश्यांप्रती कमी दुराग्रही आणि अधिक उत्तरदायी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सार्वजनिक सेवांच्या उच्च पातळीवर प्रशासनात अस्पृश्यांनाही स्थान असावे. 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हिंदुओं के बारे में महत्वपूर्ण तथ्य यह है कि हिन्दू होने से पूर्व वे किसी जाती के सदस्य है। जातियां इतनी एकांतिक तथा अलग-अलग है कि हिन्दू गैर-हिन्दू के प्रति मुख्यतः हिन्दुपन की भावना से व्यवहार करेगा। लेकिन वह दूसरी जाति के प्रति मुख्यतः जाति भावना के आधार पर व्यवहार करेगा।
- डॉ. बी. आर. अम्बेडकर
(साउथबरो कमेटी के समक्ष दिया गया साक्ष्य)

एकदा श्री गांधींनी काँग्रेसच्या सदस्यत्वाच्या अटी बदलण्याचा प्रयत्न केला. सदस्यत्वासाठी वर्षाला चार आने देण्याच्या अटीच्या ऐवजी, श्री गांधींना दोन अटी हव्या होत्या: १) अस्पृश्यता नष्ट करणे आणि २) सूत कातणे. काँग्रेसवाले सूत कातण्याची अट मान्य करायला तयार होते, पण अस्पृश्यता निर्मूलनाची अट मान्य करायला ते तयार नव्हते. काँग्रेसवाल्यांनी श्री. गांधी यांना सांगितले की जर त्यांनी अस्पृश्यता-निवारण यावर आग्रह धरला तर सर्व काँग्रेस समित्या बंद कराव्या लागतील. हा विरोध इतका जोरदार होता की श्री. गांधींना त्यांचा प्रस्ताव मागे घ्यावा लागला. अशा परिस्थितीतही, जेव्हा श्री. गांधींनी गोलमेज परिषदेपूर्वी आग्रह धरला की काँग्रेसने अस्पृश्यता निर्मूलनाची शपथ घेतली होती आणि अस्पृश्यांना कोणत्याही संकोचशिवाय हिंदूंच्या दयेवर सोडले जाऊ शकते, त्यावरून हे दर्शवते की श्री गांधी हे आहेत. सत्याच्या बाबतीत कंजूषि करुन त्याला खोट्याच्या टोकावर नेऊ शकतो.
- डॉ आंबेडकर
बाबासाहेब डॉ आंबेडकर, संपूर्ण वाङ्गमय, खंड -10, (पृष्ठ 234-235)

१९११ च्या जनगणनेनुसार त्यावेळेस अस्पृश्यांची लोकसंख्या पाच कोटी होती. १९३२ पर्यंत हे पाच कोटी अस्पृश्य कसे जीवन जगतात यांच्याशी सवर्ण हिंदूंचे काहीही देणेघेणे नव्हते. परंतु १९३२ नंतर मात्र अस्पृश्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही ही भूमिका त्यांनी घेतली. ह्या भूमिकेमागे सवर्णांची वृत्ती कशी काम करत होती हे समजून घेणे महत्वाचे आहे.

१९३२ पर्यंत अस्पृश्यांची लोकसंख्या राजकीयदृष्टया महत्वाची नव्हती. सामाजिक दृष्टया ते हिंदू समाजाच्या बाहेर होते, कारण हिंदू समाज चार वर्ण, अर्थात ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्रांनाच मान्यता देत होता. फ़क्त राजकीय प्रयोजनासाठीच अस्पृश्यांना हिंदू समाजाचे अंग मानले जात होते. विधान मंडळातील प्रतिनिधित्वासाठी अस्पृश्यांच्या संख्येला महत्त्व नव्हते. कारण १९३२ पर्यंत राजकीय प्रश्न फ़क्त विधान मंडळामध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जागा वाटपाचा प्रश्न हाच होता. हिंदूना मिळणा-या जागा स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यात वाटपाचा हा प्रश्न नव्हता. कारण संपूर्ण जागा स्पृश्यांनाच मिळत होत्या. यामुळे अस्पृश्यांची लोकसंख्या किती आहे याची हिंदूंना पर्वा नव्हती. परंतु १९३२ पर्यंत या परिस्थितीत बदल झाला. आता जागा वाटपाचा प्रश्न फ़क्त हिंदू आणि मुस्लिमांमधील जागा वाटपाचा प्रश्न राहिला नाही. आता अस्पृश्य हा दावा करु लागले की जागा वाटप फ़क्त हिंदू आणि मुस्लिमांमध्ये न होता हिंदूंना जो हिस्सा मिळत आहे त्यातून अस्पृश्यांना वेगळा हिस्सा देण्यात यावा. अस्पृश्यांचा हा दावा ब्रिटिश सरकारने मान्य केला. त्याचप्रमाणे त्यांचा सदस्य गोलमेज परिषदेत त्यांचे प्रतिनिधित्व करेल हे सुद्धा मान्य केले. एवढेच नाही तर गोलमेज परिषदेतील अल्पसंख्यांक उप-समितीने हे सुद्धा मान्य केले की नविन संविधानानुसार सर्व विधान मंडळात अस्पृश्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाईल. याप्रमाणे अस्पृश्यांच्या लोकसंख्येला आता महत्त्व प्राप्त झाले. आता अस्पृश्यांची लोकसंख्या जेवढी कमी असेल, राजकीय प्रतिनिधित्वाचा तेवढा मोठा हिस्सा स्पृश्य हिंदूंना प्राप्त होईल. यावरून हे स्पष्ट होते की जे हिंदू १९३२ पूर्वी अस्पृश्यांची लोकसंख्या किती आहे यावर कुठलेही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नव्हते ते हिंदू १९३२ नंतर मात्र अस्पृश्यांचे अस्तित्वच का नाकारु लागले.
संदर्भ - करोडो की आबादी को नकारने का प्रयास
(बाबासाहेब डॉ. अम्बेडकर, संपूर्ण वाङ्गमय खंड-10)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: