सोमवार, २५ एप्रिल, २०२२

तो समाज जो हिंदूंनी बनविला

या लेखात डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्मातील वर्ण आणि जात व्यवस्थेवर अगदी समर्पक प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते हिंदू धर्मातील जातीव्यवस्था ही अनेक वर्गात विभाजित आहे. पहिला वर्ग त्या व्यवस्थेचा आहे ज्याला चातुर्वर्ण्य म्हणून संबोधिले जाते. चातुर्वण्य या प्राचीन व्यवस्थेमध्ये प्रथम तीन वर्ण ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यांना एका वर्गात तर चौथा वर्ण शुद्र यांना दुस-या वर्गात ठेवून त्यांच्यात अंतर दाखविले गेला आहे. प्रथम तीन वर्णाला द्विज वर्ग मानले गेले आहे. परंतु शुद्राला द्विज वर्गातील मानण्यात आलेले नाही. विभाजित करण्याचा आधार हा ठेवला गेला आहे की प्रथम तीन वर्णाला यज्ञोपवित धारण करण्याचा आणि वेदांचे अध्ययन करण्याचा अधिकार आहे. शुद्राला हा अधिकार नाही. या विभाजनामुळे जातींचे दोन वर्गात विभाजन झाले आहे. याच विभाजनामुळे काही जातींना उच्च जाती आणि काही जातींना कनिष्ठ जाती म्हटल्या जाते.

या खाली सुद्धा एक वर्ग आहे जो वरील चार वर्णाच्या खाली आहे. हा वर्ग चार वर्ण अर्थात पहिल्या तीन अर्थात ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य या उच्च जाती आणि चतुर्थ वर्ण शुद्र अर्थात कनिष्ठ जातींच्या नंतरचा वर्ग आहे. हा वर्ग आपल्यापेक्षा वरच्या जातींना उच्च मानतो. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने तीन वर्णांना उच्च म्हटले आहे त्याचप्रमाणे या व्यवस्थेने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या जातींचे सुद्धा विभाजन केले आहे. त्यांच्याजवळ त्यासाठी एक शब्द होता, जे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या आत आहेत भलेही त्या उच्च जाती किंवा कनिष्ठ जाती, ब्राम्हण असतील किंवा शुद्र, त्यांना सवर्ण म्हटले गेले म्हणजेच त्यांना वर्णाचा शिक्का बसला. जे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या बाहेर होते त्यांना अवर्ण म्हटले गेले म्हणजेच त्यांच्यावर वर्णाचा शिक्का लागलेला नव्हता.

हे अवर्ण हिंदू कोण आहेत, हिंदू समाजात त्यांचे काय स्थान आहे, सवर्ण हिंदूंसोबत त्यांचे संबंध कसे आहेत याकडे आतापर्यंत फारसे लक्ष कुणी दिलेले नाही.

अवर्ण हिंदूंचे तीन भाग आहेत. १) आदिम जाती २) गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती आणि ३) अस्पृश्य जाती.

सवर्ण जाती आणि अवर्ण जातीत असलेले विभाजन एकसारखे नाही. सवर्ण जाती आणि दोन अवर्ण जाती म्हणजेच आदिम जाती आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती यांच्यात जसे संबंध आहे, त्यापेक्षा सवर्ण जाती आणि तीसरी अंतिम अवर्ण जाती म्हणजेच अस्पृश्य यांच्यासोबत असलेल्या संबंधापेक्षा वेगळे आहेत. सवर्ण जाती आणि प्रथम दोन अवर्ण जातीतील विभाजन जात-भाई म्हणजेच मित्रांसारखे आहेत. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण किंवा सम्मानजनक संपर्क संभव आहे. परंतु सवर्ण जाती आणि अस्पृश्य जाती यांच्यातील विभाजन विजातीय आणि विरोधी समुहातील विभाजन आहे. जिथे सम्मानजनक अटींच्या आधारावर मैत्रीपूर्ण संपर्काची कुठलीही संभावना नाही.

या विभाजनाचा आधार तसाच आहे जसा द्विज जाती आणि शुद्र जातीमधील आहे. सवर्णांमधील शुद्र जाती आणि अवर्णांमधील आदिम जाती आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती यामधील अंतर अतिशय नगण्य आहे. हे अंतर स्पष्ट करण्यासाठी हिंदूंनी नविन शब्द निर्माण केले आहे. ते शूद्रांचे दोन वर्ण मानतात. १) सुसंस्कृत शुद्र आणि २) शुद्र. शूद्रांच्या प्राचीन वर्गाला त्यांनी सुसंस्कृत शुद्र आणि आदिम जातीसहित हिंदू सभ्यतेला मानलेल्या जातींना शुद्र हा शब्द वापरला. हे विभाजन केवळ यासाठी केले आहे की कोणते शुद्र द्विज जातीसोबत सहजीवन जगण्यास जास्त उपयुक्त आणि कोणते कमी उपयुक्त आहेत.

निश्चितच अवर्ण जातीतील या समुहात विभाजन आहे. आदिम जाती आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती यांमध्ये विभाजन आहे किंवा नाही याबाबतीत शंका आहे. कदाचित हे अंतर अतिशय नगण्य आहे. परंतु यात कुठलीही शंका नाही की आदिम जाती व गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती आणि अस्पृश्य जाती यांच्यात स्पष्ट आणि मोठा वर्ग-भेद आहे. अवर्ण जातीतील प्रथम दोन जातींची स्पष्ट धारणा आहे की त्या उच्च जाती आहेत आणि अस्पृश्य जाती या कनिष्ठ जाती आहेत.

द्विज जाती आणि शुद्र जाती यामध्ये खरं तर विभाजन नाहीच. जे विभाजन आहे तो केवळ एक पडदा आहे. शुद्र जाती आणि प्रथम दोन अवर्ण जातीत विभाजन आहे परंतु ते सुद्धा अतिशय क्षीण आहे. हे विभाजन पार करता येऊ शकते. परंतु हे तीन वर्ग आणि अस्पृश्य यांच्यातील विभाजनच वास्तविक विभाजन आहे आणि याला दूर केले जाऊ शकत नाही. ते काटेरी कुंपणासारखे आहे आणि त्याचा स्पष्ट उद्देश दूर ठेवणे असा आहे. द्विज आणि शुद्र जातींमधील विभाजन दूर केल्या जाऊ शकते. म्हणजेच ते एकत्र येऊ शकतात. त्याचप्रमाणे दूसरे विभाजन सुद्धा दूर होऊ शकते. म्हणजेच द्विज, शुद्र, आदिम आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती एक समूह बनवू शकतात आणि एकत्र राहु शकतात. परंतु तीसरे विभाजन कधीही दूर केले जाऊ शकत नाही. कारण जातींचे हे तीन वर्ग एका मुद्द्यावर सहमत आहेत की ते अस्पृश्यांसोबत एक होऊ शकत नाही. ही फार मोठी बाधा आहे जी अस्पृश्यांना बाकीच्यांपासून वेगळे करते आणि अलग-थलग राहण्यासाठी त्यांना विवश करते.

आदिम आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती कालांतराने हिंदू समाजाचे सदस्य बनू शकता. सध्या ते हिंदू समाजासोबत जुळलेले आहेत, नंतर ते हिंदू समाजाचे अंग बनू शकतात. परंतु अस्पृश्यांची स्थिति वेगळी।आहे. त्यांना अलग-थलगच राहावे लागेल, ते हिंदू समाजाचा अंग बनू शकत नाही. हिंदू आणि अस्पृश्य यांच्यातील संबंध कसे आहेत याची व्याख्या मुंबई मध्ये एका संमेलनात सनातनी हिंदूंचे नेते ऐनापुरे शास्त्री यांनी केली आहे. त्यांनी म्हटले की, हिंदू आणि अस्पृश्यांतील संबंध असे आहेत जसे मनुष्याचा त्याच्या पायातील जोड्यांशी असतो. मनुष्य जोड़े घालतात या दृष्टीने ते मनुष्यासोबत आहेत आणि असे म्हटले जाऊ शकते की ते मनुष्याचे आहेत. परंतु ते त्याच्या शरीराचे अंग नाही. 

सभ्यता या घोर असभ्यता - २

हिंदू धर्म की कुछ रूढ़ियां जो देश के अलग-अलग भागों में फैली हुई थी. जिनको इतिहास का ज्ञान नहीं उनको पता भी नहीं होगा. आप सोच सकते है उन्होंने कितनी तकलीफे उठाई होगी. डॉ. अम्बेडकर उनके बारे में कहते है : "अस्पृश्य उन्हें कहा जाता है, जो केवल शारीरिक स्पर्श से भ्रष्ट करते है. लेकिन ऐसे लोग भी है, जो तब भ्रष्ट करते है, जब वे निश्चित दुरी पर न रहकर पास आ जाते है. इन्हें सामीप्यवर्जित कहा जाता है. उनसे भी खराब स्थिति में वे लोग है, जिनको देखने मात्र से भ्रष्ट होने का पाप लग जाता है. ये दृष्टिवर्जित कहलाते है. नयाडी लोग सामीप्यवर्जित लोगों की श्रेणी में आते है. उनके बारे में कहा जाता है कि 'वे कुक्कुरभक्षी होते है और हिंदुओं में सबसे अधम जाति के है. भीख मांगने में वे सबसे ज्यादा हठी लोग है. वे किसी भी व्यक्ति का, चाहे वह पैदल चले, सवारी करे, नौका यात्रा करे, मीलों तक पीछा करेंगे और उससे दूर-दूर रहकर उसके पिछे-पिछे चलते जाएंगे. यदि उन्हें कोई चीज दी जाती है तो उसे भूमि पर ही रखना होगा और जब उसे देने वाला व्यक्ति पर्याप्त दुरी पर पहुंच जाएगा, तभी प्राप्त करने वाला व्यक्ति सहमता हुआ आगे बढ़ता है और उसे उठाता है.

मद्रास प्रेसिडेंसी के तिन्नेवल्ली जिले में दृष्टिवर्जित लोगों का ऐसा वर्ग है, जिसे पुराडा वन्ना कहते है. उनके बारे में कहा जाता है कि दिन में उन्हें बाहर आने की अनुमति नहीं, क्योंकि उन पर दृष्टी पड़ने से ही आदमी भ्रष्ट हो जाता है. ये अभागे लोग निशाचरों जैसा जीवन जीने के लिए विवश है. वे अंधेरे में अपनी मांद से बाहर निकलते है और पौ फटने से पूर्व ही लकडबग्गे, बिज्जू की भांति अपने-अपने घरों की और लौट पड़ते है.

सामीप्यवर्जितो तथा दृष्टिवर्जितो की क्या कठिनाइयाँ होगी? वे अपना जीवन कैसे काटते होंगे? यदि उनका दर्शन या उनका सामीप्य भी सहन नहीं किया जाता तो वे क्या रोजगार कभी पा सकते है? भीख मांगने और कुत्ते का मांस खाने के अलावा वे कर भी क्या सकते है? निश्चय ही कोई भी सभ्यता इससे अधिक क्रूर नहीं हो सकती.

बंबई प्रेसिडेंसी में द्वारिका नगर में महान हिंदू देवता कृष्ण का विख्यात मंदिर है. वहां का नियम है कि सड़कों पर चलते समय हर अस्पृश्य को अपने हाथों से ताली बजानी होगी और कहना होगा, 'बचो, बचो', ताकि इस बात की घोषणा हो सके कि वह अस्पृश्य है और स्पृश्य सवधान हो जाए."

- डॉ. बी. आर. अम्बेडकर (सभ्यता या घोर असभ्यता) 

सभ्यता या घोर असभ्यता - १

एक तरफ अमरीका के श्वेत लोग है जिन्होंने नीग्रों के प्रति अपने अमानवीय बर्ताव के लिए माफ़ी मांगी. उनके धर्मगुरुओं ने भी माफ़ी मांगी. और दूसरी तरफ भारत के सवर्ण है जो उन्ही के धर्म के अस्पृश्यों (एससी) के प्रति अमानवीय बर्ताव के प्रति माफ़ी मांगना तो दूर उन्हें अपने बर्ताव पर गर्व है. वो मानते ही नहीं की उन्होंने अपने बर्ताव से कुछ करोड़ लोगों की सैकडो पीढ़िया बरबाद की. इसलिए आए दिन वे झूठ लिखते रहते है की उनकी वजह से अस्पृश्यों (एससी) को कुछ भी तकलीफ नहीं हुई. आज के युवको मे से  बहोत से युवको को हिंदू धर्म अस्पृश्यों (एससी) के साथ कैसा बर्ताव किया ये मालुम नहीं है. क्योंकि वो लोग तो बताएंगे नहीं. कितना सताया ये मालुम नहीं है. हिदू धर्म में अस्पृश्यो को क्या क्या करना मना था और उनको कौनसे काम जबरदस्ती से करवायें जाते थे इसके बारे में डॉ. अम्बेडकर लिखते है, "अस्पृश्यों ने हिंदू जाति की संस्कृति को अपनाया है. वे हिंदू जाति के धार्मिक रीति-रिवाजों का पालन करते है. वे हिंदुओं की धार्मिक तथा सामाजिक परंपराओं का आदर करते है. वे हिंदुओं के तीज-त्योहार मनाते है. लेकिन उन्हें उसका कोई लाभ नहीं मिलता. उल्टे उनसे दुराव और अलगाव किया जाता है. क्योंकि हिंदू मानते है कि अस्पृश्यों के स्पर्श से वे भ्रष्ट हो जाते है, अत: उन प्रयोजनों को छोड़कर जो अस्पृश्यों के बिना पुरे नहीं हो सकते, उनके साथ हर प्रकार का सामाजिक व्यवहार निषिद्ध होता है. वे गांव के बीच में नहीं रहते. वे गांव के बाहर रहते है. हर गांव का अपना एक इलाका होता है, जो अस्पृश्य होता है, वह गांव से जुड़ा तो होता है, पर गांव का हिस्सा नहीं होता. शेष हिंदुओं से अलग-थलग उन्हें एक ऐसी आचरण-संहिता से जकड दिया जाता है, जो दासों के लिए ही उपयुक्त होती है. इस संहिता के अनुसार अस्पृश्य ऐसा कुछ नहीं कर सकता, जो उसे जीवन के नियत से ऊपर उठा सके. उसे अपने दर्जे से ऊंचे स्तर के कपडे नहीं पहनने चाहिए और न ही किसी अस्पृश्य महिला को अपने से ऊंचे वर्ग की हिंदू महिलाओं के जेवरों जैसे जेवर पहनने चाहिए. गांव के शेष हिंदुओं के घरों के मुकाबले उसका घर बेहतर या बड़ा नहीं होना चाहिए. निश्चय ही अस्पृश्यों को हिंदू के सामने बैठना नहीं चाहिए और उसका उसे हमेशा पहले अभिवादन करना चाहिए. निश्चय ही अस्पृश्यों को न तो साफ़ वस्त्र पहनने चाहिए और न ही पीतल या तांबे के बर्तनों का इस्तेमाल करना चाहिए. उसे चांदी या सोने के जेवर भी नहीं पहनने चाहिए. जब हिंदू के परिवार में कोई मौत हो जाए तो अस्पृश्य को उस परिवार के रिश्तेदारों को मौत की खबर देने के लिए जाना चाहिए, भले ही वे कितनी दूर क्यों न रहते हों, क्योंकि यह खबर डाक से भेजने पर गांव में हिंदू अपने रिश्तेदारों में अपने को गिरा हुआ अनुभव करने लगता है. यदि हिंदू-घरों की स्त्रियां अपने मायके जाए या वहां से वापस आए तो अस्पृश्य को उनके साथ जाना ही पडेगा. उनकी प्रतिष्ठा का तकाजा है कि उनके नौकर-चाकर होने चाहिए. और केवल अस्पृश्य ही वह एकमात्र उपलब्ध वर्ग है, जिससे यह काम कुछ खर्च किए बिना कराया जा सकता है. हिंदू के घर के हर समारोह में अस्पृश्यों को आकर दासोचित कर्म करना ही चाहिए. अस्पृश्य को न तो जमीन खरीद कर उस पर खेती करनी चाहिए और न ही उसे स्वतंत्र जीवन बिताना चाहिए. अपना पेट भरने के लिए उसे हिंदू-घरों की झूठन पर निर्वाह करना चाहिए और गांव में मरने वाले पशुओं का मांस खाना चाहिए. इस झूठन को इकठ्ठा करने के लिए उसे घर-घर जाना चाहिए. भीख मांगने के लिए उसे शाम के वक्त जाना चाहिए. इसी तरह अस्पृश्य को मरे हुए जानवर को गांव से बाहर ले जाना ही पडेगा. निश्चय ही उसे यह काम अकेले ही करना चाहिए, क्योंकि कोई भी हिंदू इसमे उसका साथ नहीं देगा. अस्पृश्य को ऐसे धंदे नहीं करने चाहिए, जो उसे सवर्ण हिंदुओं के ऊपर सत्ता और अधिकार दे. उसे विनम्र होना चाहिए और उससे अधिक की मांग नहीं करनी चाहिए, जो उसे नियत किया गया है.

- डॉ. बी. आर. अम्बेडकर (सभ्यता या घोर असभ्यता) 

डॉ आंबेडकर और गांधीजीका सामाजिक सुधारो का तरीका

डॉ. अम्बेडकर ने कालाराम मंदिर नासिक में अस्पृश्यों के मंदिर प्रवेश के लिए आंदोलन किया था। उनका सामाजिक सुधारों का तरिका मा. गांधी के सामाजिक सुधारों अलग था।

गुरुवायूर मंदिर अस्पृश्यों के लिए खुला हो इसलिए केल्लप्पन नामक एक सवर्ण ने सत्याग्रह शुरू किया था। उस वक्त मा. गांधी रुढ़िवादियों के साथ एक तरह का समझौता करने के लिए तैयार हो गए थे। वह समझौता इस प्रकार था। मा. गांधी के ही शब्दों में, "दिवस के किसी निश्चित समय में गुरुवायूर मंदिर के कपाट हरिजनों तथा उन अन्य हिंदुओ के लिए खोले जाए जिन्हें हरिजनों के उपस्थिति पर कोई आपत्ति नहीं है और किसी अन्य निश्चित समय में उसे उन लोगों के दर्शनार्थ आरक्षित कर दिया जाए जिन्हें हरिजनों के प्रवेश पर आपत्ति है। इस सुझाव की स्वीकृति में कोई कठिनाई नहीं होनी चाहिए क्योंकि गुरुवायूर में कृतिकाई एकादशी पर्व के अवसर पर हरिजनों को हिंदुओं के साथ-साथ प्रवेश की अनुमति दी जाती है और उसके बाद मंदिर या देवमूर्ति की शुद्धि की जाती है।"

जब पूछा गया कि क्या उनका सुझाव था कि हरिजनों के प्रवेश के बाद प्रतिदिन मंदिर की शुद्धि की जाए तो मा. गांधी ने उत्तर दिया : "व्यक्तिगत रूप से मै किसी भी शुद्धि के पक्ष में नहीं हूं। लेकिन यदि शुद्धि से आपत्ति करने वालों की अंतरात्मा को संतोष मिलता हो तो मै इस मामले में व्यक्तिगत रूप से शुद्धिकरण पर कोई आपत्ति नहीं करूँगा।"

इसपर डॉ. अम्बेडकर कहते है, "मुझे मालुम नहीं कि कोई स्वाभिमानी अस्पृश्य श्री. गांधी के इस दृष्टिकोण को स्वीकार करेगा। इन शर्तों पर तो कुत्तो और बिल्लियों को भी सभी मंदिरो में प्रवेश करने दिया जाता है, जब कि वहां मानव-प्राणी नहीं होते।"

एक अमरीका के श्वेत लोग थे जिन्होंने अश्वेत नीग्रो की मुक्ति के लिए अपने ही श्वेत भाई-बंधुओं से रक्तरंजित लड़ाई की थी। उस में करीब दस लाख श्वेत हुतात्मा हुए। और यहाँ भारत में सामाजिक सुधारों के लिए सवर्णों के साथ रक्तरंजित लड़ाई करना तो दूर, अगर सवर्ण हिंदू सामाजिक सुधार का विरोध करते हैं तो सवर्ण हिंदू के मन को ठेस ना लगे यह ध्यान में रखकर सामाजिक सुधार किया जाता था। यह सवर्णों का कैसा सामाजिक सुधार कार्य था।

अगर डॉ. अम्बेडकर सामाजिक सुधार के बारे में मा. गांधी के विचार अपनाते तो आज क्या स्थिति होती ये आप सोच सकते है। 

रिडल्स इन हिंदुइसम

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  जानेवारी १९५४ मध्ये 'रिडल्स इन हिंदुइसम' हा ग्रंथ लिहीण्यास सुरुवात केली आणि नव्हेंबर १९५५ मध्ये हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्याच्या चांगल्या प्रतीच्या कागदावर चार प्रति टंकलिखित करण्यात आल्या. जेंव्हा त्यांना विचारण्यात आले की चार चार प्रती टंकलिखित करण्याची काय गरज आहे? त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, "बघ! माझ्या या ग्रंथाचे नाव काय आहे, 'रिडल्स इन हिंदुइसम', खरं म्हणजे या ग्रंथाचे नाव हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. माझा स्वतःचा छापखाना तर नाही आणि स्वाभाविकपणे हा ग्रंथ छपाईसाठी कुठल्यातरी हिंदुच्या छापखान्यात जाईल. होऊ शकते या ग्रंथाची पांडुलिपि हरविली जाईल, जाळली किंवा नष्ट केली जाईल आणि अशा रितीने मी कित्येक वर्षे केलेली मेहनत व्यर्थ जाईल. म्हणून किती खर्च येईल याला महत्व नाही. अशावेळेस माझ्याकडे एक जास्तची प्रत जरूर असावयास पाहिजे".

हा ग्रंथ छपाईसाठी पूर्णपणे तयार होता, तरीही त्याची छपाई करण्यापासून थांबवून ठेवण्यात आले होते. कारण बाबासाहेबांची त्यामध्ये दोन चित्र समाविष्ट करण्याची इच्छा होती. एक चित्र डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे होते जे भारताचे राष्ट्रपती होते. जेव्हा ते वाराणसी येथे गेले होते, तेंव्हा त्यांनी तिथे ब्राम्हणांची पूजा करुन त्यांचे पाय धुवून ते पाणी प्राशन केले होते. तर दुसरे चित्र पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित होते. १५ ऑगष्ट १९४७ च्या मध्यरात्री ब्राम्हणांनी एक यज्ञ आयोजित केला होता, जो स्वतंत्र भारताचे प्रथम प्रधानमंत्री एक ब्राम्हण व्यक्ति होत आहे यासाठी आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळेस पंडित नेहरू यांनी ब्राम्हणांनी दिलेला राजदंड धारण केलेला होता आणि त्यांनी दिलेलं गंगाजल प्राशन केलं होतं. त्यापैकी राजेंद्र प्रसाद यांचं चित्र उपलब्ध होतं परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ते चित्र कुठून मिळेल याचा शोध सुरु होता.

परंतु आपल्या आयुष्यात बाबासाहेब हा ग्रंथ बघू शकले नाहीत. कारण त्यांच्या ग्रंथाच्या चारही पांडुलिपि एकाचवेळी गायब झाल्यात. यामागे कुणाचा हात होता?

परंतु आनंदाची गोष्ट ही आहे की, त्यांच्या इतर लिखित सामुग्रीच्या माध्यमातून ह्या ग्रंथ पुन्हा लोकांच्या सामोर आला. यासाठी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देणे आवश्यक आहे.
संदर्भ - डॉ. आंबेडकर के अंतिम कुछ वर्ष,

           नानकचंद रत्तू 

हिंदूंच्या जुलूम जबरदस्तीपासून अस्पृश्यांना संरक्षण मिळावे म्हणून काही तरतुदी

१९३५ च्या संविधानात हिंदूंच्या जुलूम जबरदस्तीपासून अस्पृश्यांना संरक्षण मिळावे म्हणून काही तरतुदी असाव्यात यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत एक प्रतिवेदन सादर केले होते. त्यात एक अशी तरतूद सूचविली गेली होती.

अट क्रमांक ५ - नोक-यांत पुरेसे प्रतिनिधित्व

उच्चवर्णीय अधिका-यांच्या हातून पददलित समाजाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांना अपरिमित हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या उच्चवर्णीयांनी सार्वजनिक क्षेत्रातील नोक-यांच्या संबंधात आपला एकाधिकार स्थापन केला आहे. पददलितांविरुद्ध पूर्वग्रह दूषित भावनेने ग्रासलेले हे उच्चवर्णीय अधिकारी समानता, न्याय आणि विवेक या तत्वांना सतत तिलांजली देतात आणि आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतात. ही हानी टाळावयाची असेल तर ही कृती सार्वजनिक क्षेत्रातील नोक-यांबाबत उच्चवर्णीयांची मक्तेदारी समाप्त करुनच हे करता येईल आणि या क्षेत्रातील सेवाभरतीचे नियोजन अशाप्रकारे करावे लागेल की सर्व जाती जमातींना त्यात योग्य व समाधानकारक वाटा मिळेल. या हेतूने संविधानात्मक कायद्याचा भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रात नोकर भरती करतांना सर्व जाती जमातींना योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल अशाप्रकारे ही भरतीची कारवाई करावी. एखाद्या विशिष्ट सेवेत विविध जातीजमातीचे अस्तित्वात असलेले प्रतिनिधित्व विचारात घेऊन वेळोवेळी सेवाभरती समयी जाती जमातींचा प्रधान्यक्रम निर्धारीत केला जावा.

डॉ. आंबेडकरांचा भारताच्या स्वातंत्र्याबाबतचा दृष्टिकोण

साधारणतः डॉ. आंबेडकर जेंव्हा व्हाईसरायच्या मंत्रीमंडळात मजूर मंत्री म्हणून सामील झाले तेव्हा काँग्रेसच्या ब्राम्हणी मीडिया आणि इतर जातीयवादी समर्थकांनी डॉ. आंबेडकरांना ब्रिटिशांचे हस्तक ठरविण्याचा चंग बांधला होता. ब्रिटिशांच्या हातचे बाहुले, देशद्रोही वगैरे ठरवून टाकले होते.

बाबासाहेब व्हाईसरायच्या मंत्रीमंडळात मजूर मंत्री म्हणून सामील व्हायचे काय कारण असेल?

बाबासाहेब जेंव्हा व्हाईसरायच्या मंत्रीमंडळात सामील झाले त्यावेळेस ब्रिटिश सरकरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरु होती. काँग्रेस आणि त्यांचे समर्थक त्यात मोठ्या प्रमाणात सामील होते. अशावेळेस काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला साथ  देण्याऐवजी बाबासाहेब ब्रिटिश व्हाईसरायच्या मंत्रीमंडळात मजूर मंत्री म्हणून सामील झाले याचा काँग्रेसमधील ब्राम्हण-बनिया नेत्यांना राग आलेला होता. बाबासाहेब ब्रिटिशांपासून देशाला स्वातंत्र्य मिळावे याच्या समर्थनार्थ होते. गोलमेज परिषदेपासून अनेक ठिकाणी त्यांनी ते बोलून सुद्धा दाखविले होते. परंतु काँग्रेसमधील ब्राम्हण-बनियांची आणि बाबासाहेबांची स्वातंत्र्याची कल्पना वेगळी होती. काँग्रेसमधील सवर्ण ब्राम्हण-बनिया ज्यांनी शेकडो वर्षे जाती आणि धर्माच्या नावावर अस्पृश्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला होता, गुलामीत ठेवले होते त्यांना स्वातंत्र्यानंतर देशाची सत्ता पूर्णपणे त्याच वर्गाच्या हातात यावी असे वाटत होते. तर बाबासाहेबांचा दृष्टिकोण हा पुरोगामित्वाच्या गोष्टी करत असले तरी मनातून सनातनी, जातीयवादी असलेल्या काँग्रेसी सवर्ण ब्राम्हण-बनियांच्या हातात सत्ता जाऊ नये हा होता. ज्यांनी शेकडो वर्षे अस्पृश्यांना गुलामीत ठेवले अशा सवर्ण ब्राम्हण-बनियांच्या हातात सत्ता जाणे अस्पृश्यांच्या दृष्टीने फार मोठी आपत्ती ठरेल असे डॉ. आंबेडकरांना वाटत होते. त्यासाठी इंग्रज सरकार जोपर्यंत आहे तोपर्यत त्यांच्या मदतीने अस्पृश्य समाजाच्या हितासाठी, संरक्षणासाठी ज्या काही तरतुदी लागू करता येईल त्या लागू करुन घेणे हा बाबासाहेबांचा हेतू होता. त्यावेळेस मजुरांची आणि अस्पृश्यांची स्थिती जवळपास सारखीच होती. त्यामुळे या वर्गाच्या हिताच्या अनेक गोष्टी व्हाईसराच्या मंत्रीमंडळात सामील होऊन करता येण्यासारख्या होत्या.

ईव्हीएम आणि सत्ता

 

यूपी मध्ये भाजपच्या विजयात ईव्हीएम चा हात आहे असा आरोप केला की मोदीचे भक्त विचारतात, 'मग पंजाब मध्ये भाजप ची सत्ता का आली नाही?'

एकेकाळी काँग्रेस सुद्धा विरोधकांना मुख्यत: भाजप समर्थकांना असेच प्रश्न विचारत होती.

काँग्रेस सत्तेत असली काय किंवा भाजप सत्तेत असला काय सत्ता एका विशिष्ट वर्गाच्या हातातच राहणार आहे.

काँग्रेस आजही ईव्हीएम चा विरोध का करत नाही याचं कारण समजलं?

https://m.timesofindia.com/india/evms-have-become-electronic-victory-machines-for-congress-bjp/articleshow/5148417.cms


काश्मीरी पंडितांवरील अत्याचार

काश्मीरी पंडितांवर अत्याचार झालेत हे खरं आहे. परंतु ही एक बाजू झाली. त्याची आणखी एक बाजू आहे आणि ती म्हणजे काश्मीरी पंडितांच्या स्वार्थी वृत्तीची.

१९२५ मध्ये हरी सिंह जेंव्हा काश्मीरचे शासक बनले तेंव्हा १९२७ मध्ये त्यांनी असा एक कायदा केला की काश्मीर बाहेरील कोणीही तेथील जमिनीवर हस्तक्षेप करणार नाही. आपण एक लक्षात ठेवायला पाहीजे की जम्मू, काश्मीर मधील जनसंख्या नेहमी मुस्लिमबहुल तर शासक नेहमी हिंदू राहिला आहे. त्यावेळेस जूनागढ़ नावाचे आणखी एक संस्थान होते, जेथील जनसंख्या हिंदूबहुल तर शासक मुस्लिम होता.

देशाला स्वातंत्र्य मिळत असतांना त्यावेळेस देशात अनेक संस्थाने होती. या संस्थानाच्या विलिनिकरणासाठी जनमतसंग्रह हे एक प्रावधान होते. स्वातंत्र्यानंतर जूनागढ़ संस्थानामध्ये जनमतसंग्रह घेण्यात येऊन तेथील लोकांच्या इच्छेनुसार त्याचे भारतात विलीनीकरण करण्यात आले. त्यामुळे जम्मू, काश्मीर मधील लोकांना सुद्धा वाटत होते की तिथे सुद्धा जनमतसंग्रह घेण्यात येईल. परंतु सरकारला आशंका होती की असे केल्यास काश्मीर आपल्या हातातून निघून जाईल.

काश्मीर खो-यात काश्मीरी पंडितांची जनसंख्या ४ ते ४.५ टक्के तर पूर्ण जम्मू काश्मीर मध्ये काश्मीरी पंडितांची संख्या ३ टक्केपेक्षाही कमी होती. शिख १ टक्क्याच्या जवळपास होते तर बाकी जनसंख्या मुस्लिम होती. परंतु याउलट सरकारी नोक-या आणि तेथील संसाधनांवर काश्मीरी पंडितांचा एकछत्री अंमल होता.

मुद्दा हा होता की तेथील संसाधनांवर मुस्लिमांची नगण्य भागीदारी होती. मुस्लिमांमधील असंतोषाचे मूळ कारण हे होते. काश्मीर विद्रोहाची ठिनगी ईथे पडली. हळूहळू या मुद्द्याला धार्मिकतेचा रंग चढला. १९२९-३० च्या आसपास  शेख अब्दुल्ला सारख्या तरुण नेतृत्वाने मुस्लिम तरुणांचा रोजगार आणि तेथील संसाधनातील भागीदारी याबद्दल आवाज उठविण्यास सुरुवात केली आणि त्यांना लोकांकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालं.

दुसरीकडे काश्मीरी पंडित अल्पसंख्य असले तरीही त्यांचे दिल्लीपर्यंत वर्चस्व आणि एकाधिकार होता. शेख अब्दुल्ला तोपर्यंत ब-याच प्रमाणात धर्मनिरपेक्ष, उदारवादी आणि मुस्लिम लीगचा विरोध करणारे नेता होते. १९४८ ला शेख अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे प्रधानमंत्री बनले आणि त्यांनी स्त्रियांना शिक्षण आणि भूमिहिनांना जमीन ही जी जनतेला आश्वासन दिले होते त्यावर काम करण्यास सुरुवात केली. भूमी सुधार कायद्याच्या अंतर्गत त्यांनी मोठमोठ्या जमीनदारांकडील जमीन घेऊन ती भूमिहीन आणि शेतमजुरांना वाटप केली. याचा सर्वात जास्त लाभ तेथील दलितांना मिळाला. परंतु सुरवातीला याला काश्मीरी पंडित विरोधी आणि नंतर हिंदू विरोधी सांगितल्या गेले. कारण काश्मीरी पंडितांचे वर्चस्व कमी होईल ही भीती त्यामागे होती.

१९४९ मध्ये अयोध्येमधील विवादित जागेवर रामाची मूर्ती ठेवण्यात आली. तेंव्हापासून जे राजकारण सुरु झाले त्याचा परिणाम सुद्धा जम्मू-काश्मीर मधील राजकारणावर झाला.

जानेवारी १९९० मध्ये जेंव्हा कट्टरपंथी मुस्लिमांद्वारे काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडण्यास विवश केले गेले तेंव्हा भाजप समर्थित व्ही पी सिंग यांचे सरकार होते.

ज्या काश्मीरी पंडितांनी जम्मू-काश्मीर सोडले त्यांना आजुबाजूच्या राज्यात अतिशय चांगल्या जागा देण्यात आल्या. त्यांना शिक्षण आणि नोक-यांमध्ये आरक्षण आहे. आतापर्यंतच्या इतर विस्थापितांच्या तुलनेत काश्मीरी पंडितांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात आली. वेळोवेळी त्यांच्यासाठी विशेष पैकेज घोषित करण्यात आले.

या सर्व गोष्टींचा विचार केला तर काश्मीरी पंडितांच्या विस्थापनेसाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. ज्याप्रमाणे कट्टरपंथी जबाबदार आहेत त्याचप्रमाणे आपल्याजवळील संसाधने इतरांना न देने, सर्व संसाधनांवर मोजक्या विशिष्ट लोकांचा ताबा ह्या गोष्टी सुद्धा जबाबदार आहेत. ह्याच गोष्टी एकसंघ भारतासाठी घातक आहेत.

करोडो ची फि भरणारे मेरिटधारी

खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये १ कोटीच्या जवळपास फि भरून बहुतांश कुणाची मूलं एड्मिशन घेतात? ईथे फिजिक्स आणि केमेस्ट्रीमध्ये नीट मध्ये शून्य मार्क्स असलेल्या मुलांना सुद्धा खाजगी कॉलेजमध्ये कोटीच्या जवळपास फि घेऊन प्रवेश दिले जात आहे. यातील सवर्ण किती आणि अनुसूचित जाती, जमातीची किती असतील? खाजगी मेडिकल कॉलेजची १ कोटीच्या जवळपासची फि अनुसूचित जाती, जमातीच्या किती टक्के मुलांना परवडत असेल?

*NEET: Zero marks in physics, chemistry could still get you a MBBS seat*
👇👇👇

https://www.indiatoday.in/education-today/news/story/neet-zero-marks-in-physics-chemistry-could-still-get-you-a-mbbs-seat-1287180-2018-07-16