आता हाच न्याय जर डॉ. आंबेडकरांना लावला तर आपल्या महत्वाच्या कामातून वेळात वेळ काढून काँग्रेस आणि गांधींचे पितळ उघडं पाडणारं 'कॉंग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रति काय' केले?' हा ग्रंथ लिहून त्यांनी चुकच केली म्हणावे लागेल. मुळात ब्राम्हणवादी भूमिका काय घेतात हे महत्वाचे आहे. देशात जातीचा प्रश्न महत्वाचा असतांना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुनही काहीजण पर्यावरण, समाजसेवा, साहित्य हे काम करुन मोठे होऊ शकतात. परंतु याने जातीयवादामुळे ज्या समाजाला संधी नाकारल्या जातात, अत्याचार होतात त्यांना काय फ़ायदा होतो. प्रकाश आमटे जंगलात राहून आदिवासींसाठी काम करतात, त्यांच्यासाठी दवाखाने, शाळा चालवितात. परंतु हे काम तर सरकारचे आहे. सरकार हे काम का करीत नाही आणि प्रकाश आमटे सरकारला याचा जाब का विचारत नाही? तरीही प्रकाश आमटे अतिशय सेवाभावी, त्यागी, महान व्यक्ती ठरतात. त्यांच्यावर चित्रपट वगैरे निघतात. मीडिया त्यांना हिरो ठरवितो. झारखंड, छत्तीसगढ़ मध्ये आदिवासींच्या जमिनी हिसकाविण्यासाठी अनेक फेक इनकाउंटर झाले, त्यांची ह्त्याकांडे झाली, २०-३० वर्षानंतर ते फेक इनकाउंटर होते हे मानवाधिकार आयोग सांगतो तेंव्हा ही गोष्ट लक्षात येते यावर प्रकाश आमटे कधी बोलले, कधी न्यायालयात गेले, कधी सरकारला जाब विचारला? देशातल्या तपास संस्था ज्या कोणत्याही निर्दोष व्यक्तीला गुन्हेगार आणि गुन्हेगाराला निर्दोष ठरवू शकतात त्या तपास संस्थात सर्वोच्च पदावर किती आदिवासी अधिकारी आहेत हा प्रश्न प्रकाश आमटेने कधी विचारला?
ब्राम्हण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असले तरीही असे प्रश्न विचारत नाहीत. मग हे प्रश्न कोण विचारणार? आम्ही विचारले तर आम्ही ब्राम्हणांच्या भूमिकेवर शंका घेणारे आणि जातीयवादी. असे करु तर आम्ही एकटे पडू.
एकटे पडण्याच्या भितीपायी कधीपर्यंत याकडे दुर्लक्ष करायचं?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.