गुरुवार, २४ मे, २०१८

बौद्ध धर्मातील अनेक तत्वे हिंदू धर्माने आत्मसात केली

६ जून १९५० रोजी वाय. एम. बी. ए . कोलंबोद्वारा आयोजित 'विश्व बौद्ध भातृत्व संमेलनात ' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण.

ज्या परिस्थितिने बौद्ध धर्माला जन्म दिला ती आपण समजून घेतली तरच आपणाला बौद्ध धर्माचे वास्तविक महत्व कळू शकेल. भारताचा धर्म नेहमीसाठी हिंदू धर्म होता, हे मत मला मान्य नाही. हिंदू धर्म तर सर्वात शेवटी विचारांची उत्क्रांती होत असताना उदयास आला. वैदिक धर्माच्या प्रचारानंतर भारतात तीन वेळा धार्मिक परिवर्तन घडून आले आहे. वैदिक धर्माचे रूपांतर ब्राम्हण धर्मामध्ये झाले आणि ब्राम्हण धर्माचे रूपांतर हिंदू धर्मामध्ये झाले. बौद्ध धर्माचा समाजाचे विविध वर्णामध्ये  विभाजन होण्यास विरोध होता. या चातुर्वर्ण्याची सुरुवात ब्राम्हण धर्माने केली होती. फ्रान्सकारिता फ्रान्सची राज्यक्रांती जेवढी महत्वाची आहे तितकाच् मानव जातिसाठी बौद्ध धर्माचा उदयही महत्वाचा आहे.

वैदिक शिकवणीनुसार आचरण करणे सोपे आहे. वैदिक लोक मुख्यता यज्ञपुजक होते. वैदिक आर्याची जवळजवळ तेहत्तीस कोटी आराध्य देवते होती असे सांगण्यात येते. ते आपल्या या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करीत असत. या देवतांच्या पुजेसाठी गोळा करण्यात येणारी सामग्री अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असणे आवश्यक होते. कृषि युगातील या आर्याना गो-धन हे सर्वश्रेष्ठ धन वाटत होते. म्हणून ते आपल्या देवतांची पूजा गाईचा यज्ञात बळी देऊनच करीत असत. यामुळे वैदिक धर्म हा हिंसेला प्रोत्साहन देणारा ठरला होता. यज्ञामध्ये असंख्य पशूंचा बळी देण्यात येत होता आणि जे पशु यज्ञात बळी देण्यात येत असत त्यांना स्वर्गप्राप्ती होते अशी याजकांची श्रद्धा होती. "वैदिक हिंसा, हिंसा न भवति" अर्थात वैदिक यज्ञात झालेली हिंसा हिंसा नव्हे.

यज्ञामध्ये सर्रास प्राणिहत्येचा प्रचार होत असल्यामुळे ज्या ज्या प्राण्याचे मांस खाण्यास योग्य होते अश्या   बक-या, मेंढ्या, गाई यासारख्या प्राण्यांचा बहुधा यज्ञात बळी देण्यात येत असे. यज्ञाचा प्रचार वाढल्यामुळे पुरोहिताचे महत्व वाढले आणि ब्राम्हणवादाचा उदय झाला. या ब्राम्हणवादाने समाजाचे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र अश्या चार वर्णामध्ये विभाजन केले. चार वर्णाची स्थापना करुन समाजात विषमता निर्माण करणे ब्राम्हणवादाचा मुख्य हेतु होता. कारण त्याशिवाय ब्राम्हणांचे प्रभुत्व स्थापन करणे संभावनिय नव्हते. आपल्या श्रेष्ठतवाच्या प्रस्थापनेसाठी ब्राम्हणांनी काही मंत्रांची रचना केली आणि त्या मंत्रांद्वारे ते ब्राम्हणांची उत्पत्ती ब्रम्हाच्या मुखातून, क्षत्रियांची बाहुतून, वैश्याची मांडयातून व शूद्रांची उत्पत्ती ब्रम्हाच्या पायातून झाली, असा प्रचार करु लागले. यामुळे ब्राम्हण सर्व वर्णाचे गुरु व सर्वश्रेष्ठ आहेत, असे त्यांचे सांगणे होते. परंतु भगवान बुद्धानी याचे खंडन केले. ते म्हणतात, जशी सर्व माणसे उत्पन्न होतात तसेच ब्राम्हण होतात.ब्राम्हणांच्या स्त्रीया ऋतुमती होतात. गर्भवती होतात. नऊ मासपर्यंत गर्भपोषण करतात. प्रसूत होतात. मुलाला स्तनपान करतात. असेच सर्वत्र दिसून येते. अश्या स्थितीत ब्राम्हण ब्रम्हाच्या मुखातून निघाले व शुद्र त्याच्या पायातून निघाले, असे ते म्हणू तरी कसे शकतात? जन्माने कोणीही शुद्र वा ब्राम्हण होत नाही. तर माणूस करणीमुळे ब्राम्हण किंवा शुद्र ठरतो.

यापुढे भगवंत म्हणाले "जटा, दाढ़ी, गोत्र किंवा जन्मामुळे कोणीही ब्राम्हण होत नाही. जो सत्यानुसार व धर्मानुसार आचरण करतो, जो काया-वाचा-मनाने कोणतेही पाप करीत नाही, जो काम-क्रोधरहित आहे, जो व्रती, शीलवान, अनुत्सुक, दांत आणि जितेन्द्रिय आहे, जो तृष्णारहित व संशयरहित आहे, जो राग-द्वेष मदविहीन आहे, जो शोकरहित, निर्मल व शुद्ध आहे, ज्याने भवचक्रात लोटण्यास कारणीभूत होणा-या मोहाचा त्याग केला आहे, ज्याने रती व अरतीचा त्याग केलेला असून त्यामुळे जो शांतचित्त आहे, जो गंभीर, प्रज्ञावंत, मेधावी, मार्ग-अमार्गाचा ज्ञाता आहे आणि जो सर्वोत्तम अशा निर्वाणाचा अधिकारी आहे त्यालाच मी ब्राम्हण म्हणू शकतो.

तुम्ही विचार करा की जो धर्म मानव जातीच्या कल्याणासाठी साह्यकारी होऊ शकतो, ज्यात मनुष्याच्या मुक्तीचे द्वार खुले आहे, आणि ज्यात मानवामानवात भेदभाव नसून समता आहे तो धर्म, धर्म या संज्ञेस पात्र ठरू शकतो. ज्या धर्माचे मूलतत्व मानवामानवात भेद निर्माण करणे हेच आहे तो धर्म 'सदधम्म' म्हणण्याच्या लायकीचा नाही. ब्राम्हण धर्माने मानव समाजात भेदाच्या द-या निर्माण केल्या. त्याने स्त्रियांच्या व शूद्रांच्या बाबतीत अत्यंत घृणास्पद व्यवहार करण्याची शिकवण दिली. भगवान बुद्धाच्या धर्माचा प्रधान हेतु मानवीं समता हा आहे. आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासुन प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करण्याचे किंवा अस्वीकार करण्याचे स्वातंत्र्य या धर्मात आहे. हिंसेचा उच्छेद आणि अहिंसेचे प्रस्थापन हे त्याचे एक प्रमुख अंग आहे. कोणत्याही प्राण्याची एखाद्या देवतेच्या नावावर हिंसा करणे किंवा त्याचा बळी देणे आणि पुन्हा निर्लज्जपणे असे प्रतिपादन करणे की 'त्याला स्वर्ग मिळाला' असे बौद्ध धर्माने सांगितले नाही.

बौद्ध धर्माच्या उदयापूर्वी एखादा शुद्र राजा होऊ शकेल ही कल्पनाही करता येण्यासारखी नव्हती. परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ञाना हे माहीत आहे की बौद्धधर्माच्या प्रादुर्भावानंतर शुद्रानाही सिंहासनासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली आणि देशात सामाजिक समतेची स्थिति निर्माण झाली. गणतंत्रीय राज्यपद्धती ही बौद्ध कळाचीच देणगी आहे. भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर इ. स. २७४ पर्यंत बौद्धधर्माची स्थिति कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत. तथापि अशोकाच्या काळात बौद्धधर्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंद्रगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध स्थापित केले होते. बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्यकला, चित्रकला, मूर्तिकला इत्यादि नानाप्रकारच्या कलांचा विकास झाला. बौद्ध काळात साहित्य आणि तत्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशातील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता.

प्रश्न असा निर्माण होतो की, जो धर्म इतका श्रेष्ठ होता व ज्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा झाला? या प्रश्नांची उत्तरे अनेक असली तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो. अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता. यामुळे मी त्याला दोष देत आहे. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत बौद्धधर्माशिवाय अशा अनेक धर्माना प्रचाराची मुभा देऊन ठेवली होती की जे बौद्ध धर्माचे कट्टर दुष्मन होते. यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणा-या अधर्माना आपली शक्ति वाढविण्याची पुरेपूर संघी प्राप्त झाली व हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय, असे मला वाटते.

बौद्ध ग्रंथावरुन असे दिसून येते की, भगवान बुद्धाच्या श्रमण शिष्यामध्ये जवळ जवळ शेकडा ६० ब्राम्हण होते. ब्राम्हण लोक भगवान बुद्धाशी वादविवाद करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत व वादविवादात निरुत्तर झाल्यामुळे प्रभावित होऊन सहर्ष त्यांच्या धर्माची दीक्षा घेऊन भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा बाळगीत असत. या श्रमण शिष्यामुळे भगवान बुद्धाचा व त्यांच्या धर्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. परंतु बौद्ध धर्मात जातिभेद नसल्यामुळे क्रमशः जेव्हा खालच्या जातीतिल लोक बुद्धाला शरणागत होऊन सिद्ध भिक्षु बनू लागले व धनिकांद्वारा व राजांद्वारा त्यांची पूजा व सत्कार होऊ लागला तेव्हा ही गोष्ट ब्राम्हणाना सहन झाली नाही व ते बौद्ध धर्माचा उच्छेद करण्याच्या मार्गाला लागले.

भारतात प्राचीन काळापासून ज्याप्रमाणे ग्राम-देवता, वन-देवी, नद-नदी-देवी इत्यादी देवता होत्या व त्यांची पूजा होत होती, त्याप्रमानेच कुलदेवताही होत्या. राजेलोक व धनिकांच्या कुलदेवतांची पूजा बहुधा ब्राम्हणांद्वारे होत असे. त्यामुळे राजमहालामध्ये कुलदेवतेच्या पुजेसाठी जाणारे ब्राम्हण राणीच्या मध्यस्थीने राज्य शासनावर आपला प्रभाव चालवित असत. या प्रभावाचा उपयोग करून त्यांच्या निरंतर वर्चस्वाला बाधक होणा-या बौद्ध धर्माची पाळेमुळे खणुन काढण्याचा ते प्रयत्न करीत. सम्राट अशोकाच्या काळात या कुलदेवतापूजेची निंदा करण्यात आली. अशोक म्हणतो : "मी बौद्ध धर्माच्या मार्गाचे अनुसरण करीत असल्यामुळे मला दुस-या कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्याची गरज नाही." आणि त्याने आपल्या प्रशासनाधिका-यांना आदेश देऊन कुलदेवतांच्या मूर्ति काढून टाकल्या. हा ब्राम्हणांवर फार मोठा प्रहार होता. कारण यामुळे त्यांच्या उपजीविकेला व धूर्त प्रचाराला फार मोठा धक्का बसला आणि ते त्याचा बदला घेण्यास सिद्ध झाले. ब्राम्हण पुरोहितांची पूर्वी अशी धारणा होती की सर्व राजेलोक मेल्यानंतर नरकात जातात. कारण राज्य शासन चालविताना त्यांना पुष्कळशी पापकृत्ये करावी लागतात. यामुळे तशी संधी प्राप्त झाली तरीही ब्राम्हण लोक राज्यकारभार आपल्या शिरावर घेण्यास तयार नव्हते. मात्र राजसिंहासनावर बसण्यास ते तयार नसले तरी मंत्री किंवा पुरोहित म्हणून राजाला सल्ला देण्याचे कार्य करीत असत. त्याचप्रमाणे कायदे कानून तयार करीत होते. परंतु कुलदेवतेची पूजा बंद झाल्यामुळे त्यांची जेव्हा खुप हानी झाली तेव्हा राज्य शासन न चालविण्याच्या आपल्या सिद्धांताचा त्याग करुन ते राज्यावर व सिंहासनावर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नाला लागले. अशात-हेच्या अगणित घटना भारतीय वांगमयात सापडतात. काही ठिकाणी असेही आढळून येते की जेथे स्वतःच्या बळावर राज्य करणे अशक्य होते, तेथे त्यांना धार्जीणे असलेल्या क्षत्रियाना हाताशी धरून किंवा त्यांना समोर करुन म्हणजे त्याला आपल्या हातातील बाहुले बनवून राज्यकारभार ते करीत असत. अशाप्रकारे पुन्हा ब्राम्हणवादाने जोर पकडल्यामुळे बौद्ध धर्मावर आघात झाला आणि भारतातून त्याचा लोप होण्यास तो कारणीभूत ठरला.

ब्राम्हणी शासनाधिकाराची एक फार मोठी घटना मौर्य साम्राज्याचे परिवर्तन घडून येण्यामध्ये दिसून येते. भारतीय इतिहासकारानी या महान घटनेला महत्व दिले नाही. ही फार दुःखाची गोष्ट आहे. अंतिम मौर्य सम्राट महाराज बृहदथाचा सेनापती पुष्यमित्र नावाचा एक ब्राम्हण होता. याचा गुरु पतंजली हा होय. पतंजलीने योग विद्या बौद्धांपासूनच मिळविली होती. परंतु नंतर हा बौद्धांचा शत्रु बनला. याच्या सल्ल्यानुसार सेनापती शृंगवंशिय पुष्यामित्राने बृहद्रथाला ठार मारले व मौर्यवंशाच्या बदलीत आपल्या शृंगवंशाच्या नावाने ब्राम्हणी राज्य चालविले.
या ब्राम्हणी राज्याने बौद्ध धर्माला अपरिमित नुकसान पोहचविले. ब्राम्हणी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी करण्यात आलेल्या कृत्यातील हे सर्वात दारुण कृत्य असून बौद्ध धर्माचा भारतातून लोप होण्यास कारणीभूत ठरलेली ही फार मोठी ऐतिहासिक घटना होय.

भारतातून बौद्ध धर्माचा लोप होण्यास विदेशी आक्रमणेही कारणीभूत ठरली, असे मानण्यात येते. परंतु यूनानी लोकांच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माला झड़ पोहचली नाही. याउलट त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी द्रव्य सहाय्य केल्याचेही पुरावे इतिहासात आढळतात. गुप्तकाळात भारतावर हुणांची आक्रमणे झाली परंतु गुप्त राजांकडून पराभूत झाल्यामुळे ते भारतातच स्थायिक झाले. यांच्याकडूनही बौद्ध धर्माला झड़ पोहचली नाही. याउलट पेशावर येथील शक राजा कनिष्क याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्याने तक्षशिला येथे एक विशाल बौद्ध विश्वविद्यालय उघडले होते आणि बौद्धांची चौथी धर्म-संगीती भरविली होती. या धर्मसंगीतीतच महायान मार्गाचा उदय झाला व बौद्ध साहित्य सुधारित संस्कृतमध्ये लिहिल्या जाऊ लागले. विदेशी आक्रमकांपैकी मुसलमानांद्वारा बौद्ध धर्माला अधिक झड़ पोहोचली. मुसलमान लोक प्रतिमा व मुर्तीचे विरोधी होते. त्यांनी बुद्धांच्या मूर्तिंची तोड़फोड़ केली व भिक्षुना ठार मारले. त्यांनी नालंदाच्या विशाल बौद्ध विश्वविद्यालयाला सैनिकी किल्ला समजून व चिवरधारी भिक्षुना सैनिक समजून त्यांचा संहार केला. जे भिक्षु त्या भीषण रक्तपातातून वाचले ते नेपाल, तिबेट, चीन इत्यादि देशात पळून गेले.

नालंदा येथील विशाल ग्रंथालयात ताड़पत्र व भोजपत्रावर लिहिलेले सुमारे दोन लाख ग्रंथ होते; व त्यात हजारो वर्षाचे ज्ञान साठविलेले होते. त्यांना बख्तियार खिलजीने आग लावून दिली आणि तेथे शिकत असलेल्या सहा हजार विद्यार्थ्यांपैकी काहींना ठार मारले व काहींना जबरदस्तीने मुसलमान करुन सोडले. मुसलमानी आक्रमक जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांनी बौद्धाना ठार तरी मारले किंवा मुसलमान तरी बनविले आणि बौद्ध मूर्तिंची तोड़फोड़ केली, ग्रंथालये जाळली व विहार नष्ट केले. माझे काही हिंदू मित्र मला विचारतात की मुसलमान आक्रमकानी हिंदू मूर्ती हिंदू मंदिरांचीही नासधुस केली आहे ना? यावर माझे उत्तर असे की, जितकी बौद्ध धर्माची नासधुस त्यांनी केली तितकी हिंदू धर्माची केली नाही. याचे कारण असे की, बहुधा सर्वच ब्राम्हण गृहस्थ होते आणि ते आपल्या परिवारासह आपल्या घरीच राहत असल्यामुळे त्यांना ओळखण्याची वेगळी अशी खूण नव्हती. परंतु बौद्ध भिक्षु मात्र कुटुंबविरहित, चिवरधारी आणि विहारात राहत असत आणि त्यांना सहज ओळखता येत होते. त्यामुळे हिंदुंची प्रसिद्द मंदिरे जरी मुसलमानांनी फोडली असली तरी त्यांच्या धर्मगुरुना व पुरोहिताना हानी पोहचली नाही.
कोणताही धर्म जिवंत राहण्यासाठी त्यातील धर्मगुरु व पुरोहित कायम राहणे आवश्यक असते. बौद्ध धर्माचा लोप होण्याचे विशेष कारण म्हणजे बौद्धभिक्षुचा अभाव निर्माण झाला होता. बौद्ध भिक्षुची कोणतीही जात नव्हती. कोणीही व्यक्ति बौद्ध धर्माला शरण जाऊन उपासक श्रामनेर, भिक्षु किंवा स्थविर-महास्थविर होऊ शकत होता. भिक्षु लोक समाजापासून दूर विहारात राहत असत. ब्राम्हणवादामध्ये ही बाब नव्हती. तेथे केवळ ब्राम्हणांच्या घरी जन्म होण्यामुळेच नविन ब्राम्हण्य निर्माण होत असे. या कारणांमुळे हिंदुंची विशेष हानी झाली नाही. नंतरच्या काळात मागासवर्गीय लोकांना भिक्षु बनवून बौद्धांची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु चांगल्यप्रकारे शिक्षित नसल्यामुळे हे भिक्षु ब्राम्हणांच्या युक्तिवादाला उत्तर देऊ शकले नाहीत व त्यामुळे त्यांची हार झाली.

दरम्यानच्या काळात शैव योग्यानी शैव धर्माचा व ब्राम्हणांनी वैष्णव धर्माचा प्रचार केला. वैष्णव आणि शैवामध्ये जोरदार संघर्ष झाला. शेवटी ब्राम्हणांनी शैवाना 'रूद्र' बनवून आपणामध्ये सामील करुन घेतले व शैव आणि वैष्णव यांचे ऐक्य झाले. सध्याच्या काळात हिंदू धर्म पुष्कळच परिवर्तित झाला आहे. पूर्वी तो हिंसेची शिकवण देत होता परंतु आता तो अहिंसेची शिकवण देतो. बौद्ध धर्मातील अनेक तत्वे हिंदू धर्माने आत्मसात केली. प्रतिमा, चैत्य, विहार आणि भिक्षु इत्यादि दृष्टीने आज भारताला बौद्ध धर्म नसला तरी तात्विक रूपाने अजूनही तो भारतभर पसरलेला आहे.
संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पेज नं. २०६,२०७,२०८,२०९,२१०,२११,२१२  

राम की पहेली

उनके व्यक्तिगत जीवन के बारे में हम दो घटनाओ का उल्लेख करेंगे। एक बाली से संबंधित है और दूसरी उनकी पत्नी सीता से। सर्वप्रथम हम बाली को लें।
 
बाली और सुग्रीव दो भाई थे। वे वानर जाती से संबंध रखते थे और एक राज-परिवार से थे। उनका अपना राज था जिसकी राजधानी किष्किंधा थी। जब बाली राजा था तो उसका मायावी नामक राक्षस से युद्ध छिडा हुआ था। द्वंदयुद्ध मे मायावी अपनी जान बचाकर भागा और एक गहरी खोह में घुस गया। बाली ने सुग्रीव से कहा की वह गुफा के भीतर जा रहा है, वह बाहर गुफा के मुंह पर प्रतीक्षा करे। कुछ देर बाद गुफा से रक्त की धारा फूटी। सुग्रीव ने अनुमान लगाया की बाली मायावी के हाथो मारा गया। किष्किंधा आकर उसने स्वयं को राजा घोषित कर दिया और हनुमान को अपना मंत्री बना लिया।
 
वास्तव में बाली मरा नहीं था बल्कि बाली ने मायावी को मार गिराया था। बाली गुफा से बाहर आया और देखा तो सुग्रीव वहा नहीं था। वह किष्किंधा आया तो यह देखकर चकित रह गया की सुग्रीव राजा बना बैठा है। स्वाभाविक था की इस दगाबाजी को देखकर बाली आगबबूला हो उठता, क्योंकि इसका कारण भी स्पष्ट था। सुग्रीव को अटकल पर ही निर्भर नहीं करना था। उसे देखना था की बाली मृत है या जीवित। दूसरे बाली का एक पुत्र था अंगद। वह बाली का वैध उत्तराधिकारी था। उसे राजा बनाया जाना चाहिए था। सुग्रीव ने कुछ नहीं किया। यह विद्रोह का स्पष्ट मामला था। बाली ने सुग्रीव को खदेड़ दिया और गद्दी पर बैठ गया। दोनों भाई जानी दुश्मन बन गए।
 
यह घटना तभी घटी थी, जब रावण ने सीता का हरण किया था। राम और लक्ष्मण उनकी खोज कर रहे थे। सुग्रीव और हनुमान किसी मित्र की तलाश में थे, जो उन्हें बाली से राज्य वापस दिला सके। दोनों पक्षों में संयोगवश भेंट हो गई। जब दोनों ने एक-दूसरे की कठिनाईयों को सूना तो उनके बिच एक समझौता हुआ। यह सहमति हुई की राम बाली का वध करने और सुग्रीव को किष्किंधा-राज दिलवाने में मदद करे। यह भी सहमति हुई की सुग्रीव और हनुमान राम को सीता वापस दिलाने में सहायता करेंगे। बाली वध की योजना को कार्यरूप देने के लिए सुग्रीव अपने गले में माला पहन ले, जिससे द्वंदयुद्ध के समय सरलता से पहचाना जा सके। राम किसी वृक्ष की आड़ में छिप जाए और वहा से तीर चलाकर बाली का काम तमाम कर दे। तद्नुसार द्वंद आयोजित किया गया। जब युद्ध हो रहा था तो सुग्रीव के गले में माला थी। वृक्ष के पीछे छिपे राम ने निशाना साधा। सुग्रीव किष्किंधा का राजा बन गया। बाली की हत्या राम के चरित्र पर बहुत बड़ा धब्बा है। यह एक ऐसा अपराध था, जो एकतरफा था क्योंकि बाली का राम से कोई विवाद नहीं था। यह कायरता भी थी क्योंकि बाली निहत्था था। यह एक पूर्वनियोजित और सुविचारित हत्या थी।
 
अब यह देखे की उन्होंने अपनी ही पत्नी सीता के साथ क्या व्यवहार किया। जब सुग्रीव और हनुमान ने सेना एकत्र कर ली तो राम ने लंका पर आक्रमण कर दिया। यहा भी राम ने वही चाल चली जो बाली और सुग्रीव के बिच चली थी। उन्होंने इस शर्त पर रावण के भाई विभीषण से सहायता ली की रावण और उसके पुत्रो को मार विभीषण को राज दे दिया जाएगा। राम ने रावण और पुत्र इंद्रजीत का वध कर दिया। युद्ध समाप्ति पश्चात विभीषण का राज्याभिषेक कराया गया। तब उन्होंने हनुमान को सीता के पास भेजा और सूचित कराया की वे, लक्ष्मण और सुग्रीव सकुशल है और उन्होंने रावण का संहार कर दिया है।
 
रावण पर विजय प्राप्त करने के उपरांत उन्हें सीधे सीता के पास जाना चाहिए था। उन्होंने ऐसा नहीं किया। उन्हें राजतिलक की ज्यादा चिंता है, सीता की नहीं। यहा तक की राजतिलक के पश्चात भी वे स्वयं न जाकर हनुमान को भेजते है। और वह संदेश क्या देते है? वे हनुमान को सीता को लाने के लिए नहीं कहते। वह सिर्फ यह खबर भेजते हैं की वे स्वस्थ और प्रसन्न है। यह सीता है जो हनुमान से राम से मिलने की बात कहती है। राम सीता से मिलने गए ही नहीं जो उनकी पत्नी थी, जिसका रावण ने अपहरण कर लिया था और उसे दस माह कैद में रखा था। सीता उनके पास लाई गई। जब सीता राम से मिली तो राम ने क्या कहा? इस बात पर कोई यकीन नहीं करेगा की आदमी में साधारण मानवीय दया भी न हो। जो दुख में घिरी अपनी पत्नी से कठोर वचन बोलेगा जैसे की राम ने बोले जब वह लंका में उससे मिले। वाल्मीकि साधिकार रामायण में कहते है; जैसा की राम ने कहा: (युद्धकाण्ड सर्ग 115, श्लोक 1.23)
 
"मैंने अपने शत्रु, तुम्हारे अपहर्ता को युद्ध में परास्त कर तुम्हे इनाम के तौर पर पाया है। मुझे मेरा सम्मान मिल गया और दुश्मनो को हरा दिया है। मुझे परिश्रम का फल मिल गया है तथा लोगों ने मेरी सैनिक शक्ति देखी।
मैं अपनी अपकीर्ति मिटाने आया था। मैंने तुम्हारे लिए यह कष्ट थोड़े ही उठाया है।"
 
राम के सीता के प्रति किए गए इस व्यवहार से बड़ी क्या कोई और भी कठोरता हो सकती है? वे यही नहीं रुके। उन्होंहे आगे कहा:
 
"मुझे तुम्हारे चरित्र पर संदेह है। रावण ने तुम्हारा शीलभंग किया होगा। मुझे तुम्हे देखते ही उबाल आ रहा है। मैं तुम्हे स्वतंत्र करता हूँ। जहा मन करे जाओ। हे जनक सुता! मुझे तुमसे कोई लेना-देना नही। मैंने तुम्हे जीता, इसका मुझे संतोष है। यही मेरा लक्ष था। मैं यह नहीं सोच सकता की तुम जैसी सुन्दर नारी से रावण ने आनन्द नहीं लूटा होगा।"
 
स्वाभाविक है की सीता उन्हें पतित और क्षुद्र कहती और स्पष्ट रूप से कहती की जब हनुमान आए थे, यदि तभी उन्हें यह संदेश भिजवा दिया गया होता की अपहरण के कारण राम ने उन्हें मन से निकाल दिया है तो वे आत्महत्या कर लेती और उन्हें यह कष्ट नहीं उठाना पड़ता। उन्हें कोई अवसर दिए बिना सीता ने अपनी पवित्रता का प्रमाण दिया। वे अग्नि-परीक्षा में सफल हुई। इससे देवता प्रसन्न हुए और इस परीक्षा के पश्चात उन्होंने सीता को पवित्र घोषित कर दिया। इसके पश्चात ही राम सीता को अयोध्या ले जाने के लिए सहमत हुए। और जब वे उन्हें अयोध्या ले आए तो उन्होंने उनके साथ कैसा व्यवहार किया? वे राजा बन गए और सीता रानी। परन्तु राम तो राजा बने रहे और सीता का यह पद जल्दी ही छीन गया। यह काण्ड राम की सबसे बड़ी अपकीर्ति है। वाल्मीकि रामायण में कहा गया है की राम के राजतिलक के कुछ पश्चात ही सीता गर्भवती हो गई। ऐसा सुनकर की सीता गर्भवती है, दृष्ट प्रवृत्ति के लोगों ने विषवमन किया की ऐसा लगता है की सीता जब लंका में थी तो वे रावण से गर्भवती हुई। उन्होंने राम पर आक्षेप लगाया की वे एक ऐसी स्त्री को पत्नी के रूप में वापस ले आए। इस कानाफूसी को राम की राज्यसभा का विदूषक भद्र महल में लेकर आया। राम स्वाभाविक रूप से ऐसे लांछन को सुनकर स्तंभित रह गए। वे जुगुप्सा से भर उठे। यह स्वाभाविक भी था। प्रश्न यह था की इस अपयश से किस प्रकार मुक्ति पाई जाए? इस कलंक से मुक्ति का उन्हें सरलतम उपाय यह मिला की सीता को त्याग दिया जाए। एक स्त्री को, जो गर्भावस्था में है, न कोई दासी, साधनो के बिना जंगलो में छोड़ देना और वह भी उसे पूर्वसूचना दिए बिना! इसमे कोई संदेह नहीं की सीता को अचानक त्याग देने का विचार ही उनके मन में न आया होगा। विचार उत्पन्न होने और उसके पनपने और कार्यरूप देने की योजना बनाने में कुछ समय अवश्य लगा होगा। जब भद्र ने उन्हें नगर में होने वाली अफवाहों के विषय में बताया तो उन्होंने अपने भाइयों को बुलाया और उन्हें अपनी भावनाए बताई। राम ने कहा "सीता की पवित्रता और सतीत्व लंका में ही प्रमाणित हो चुके थे। देवो ने भी इसका अनुमोदन किया था और उन्हें सीता की सच्चाई, पवित्रता और सतीत्व पर विश्वास है।" इसके बावजूद प्रजा सीता पर लांछन लगाती है और मुझ पर उंगली उठाती है। ऐसा अपमान कोई नहीं सह सकता। सम्मान सबसे बड़ी सम्पत्ति है। देवता और महापुरुष उसे क्षति नहीं पहुचने देते। मैं यह अपमान और अपकर्ष नहीं सह सकता। ऐसी अपकीर्ति से बचने के लिए मैं तुम्हे भी छोड़ सकता हूँ। ऐसा न समझना की मैं सीता को त्यागने में संकोच करूँगा।"
 
इससे पता चलता है की उन्होंने सीता को त्यागने का मन बना लिया था, यह विचार किए बिना की जो वे कर रहे है, वह सही है या गलत। उन्होंने प्रजा के लांछनो से बचने का सरलतम उपाय ही अपनाया। सीता के जीवन का कोई मूल्य नहीं। मूल्य था तो उनकी प्रतिष्ठा का। उन्होंने प्रजा में ऐसी अफवाहे रोकने का कोई प्रयत्न नहीं किया, जो एक राजा के रूप में उनका कर्तव्य था, जो एक स्त्री के पति के रूप में उनका दायीत्व था जिसकी वे परीक्षा ले चुके थे। वे प्रजा की कानाफूसी के आगे झुक गए। हिंदुओ में ऐसे लोगो का अभाव नहीं है, जो यह प्रमाणित करने की चेष्टा करते है की राम एक प्रजातांत्रिक राजा था। किन्तु ऐसे लोग भी पर्याप्त संख्या में है जो उन्हें दब्बू और भीरु मानते है।
 
अपनी प्रतिष्ठा के रक्षा की यह क्रूर योजना उन्होंने अपने भाइयों को तो बता दी किन्तु सीता को नहीं बताई; जिनसे उनका प्रत्यक्ष संबंध था। क्योंकि वही प्रभावित होनी थी तो उन्ही को बताया जाना चाहिए था। परन्तु उन्हें पूर्ण अंधकार में रखा गया। राम सीता से  उस रहस्य को छिपाए रहे, जब तक उस पर पालन न हो गया। सीता के दुर्भाग्य से वह समय भी आया, जब उनकी प्रतीक्षित योजना क्रियान्वित हुई। जो स्त्रीया गर्भवती होती है, उनके मन में छोटी-मोटी ललक हुआ करती है। राम यह जानते थे। इसलिए एक दिन उन्होंने सीता से पूछा की तुम्हारा किसी वस्तु को मन तो नहीं करता है। उन्होंने कहा, 'हाँ' करता है। राम ने पूछा 'वह क्या है।' सीता ने कहा, 'वह गंगा किनारे किसी ऋषि के आश्रम में कंद-मूल खाकर कम से कम एक रात बिताना चाहती है।' राम को और क्या चाहिए था। तपाक से हां भर दी, "निश्चिन्त रहो प्रिय! मेरी कोशिश होगी की तुम्हे कल ही भेज दूँ।" सीता ने इसे सीधे स्वभाव से लिया। परन्तु राम ने क्या किया? उन्होंने सोचा सीता से पिण्ड छुडाने का यह अच्छा अवसर है। उन्होंने अपने भाइयों से कहा की वे सीता के संबंध में बिच में न आए और यदि आते है तो शत्रु समझे जाएंगे। तब उन्होंने लक्ष्मण से कहा, "वह सवेरे ही सीता को गंगा के किनारे जंगल में आश्रम में छोड़ आएं।" लक्ष्मण किंकर्तव्यविमूढ़ थे की सीता को राम का फैसला कैसे बताएं? उनकी मनोदशा को पहचानते हुए राम ने, लक्ष्मण को बताया की सीता ने स्वयं ही इच्छा प्रकट की है की वे कुछ समय आश्रम में गंगा किनारे बिताना चाहती है। इससे लक्ष्मण को थोड़ा ध्येर्य बंधा। यह दुरभिसंधी रात को हुई थी। सवेरे कही लक्ष्मण ने सुमंत से कहा की वह रथ के घोड़े तैयार करें। सुमंत ने लक्ष्मण को बताया की सब तैयार है। तब लक्ष्मण रनिवास में गए और सीता से मिले की वे कुछ दिन आश्रम में बिताना चाहती है। राम ने अपना वायदा निभाते हुए, उनसे ऐसा करने को कहा है। उन्होंने कहा, 'वह रथ खड़ा है चलिए।' सीता राम का आभार मानकर रथ पर चढ़ गई। लक्ष्मण और सीता को बिठाकर सुमंत निर्दिष्ट स्थान की और चल दिए। अंत में वे गंगा के किनारे पहुँच गए, केवटों ने उन्हें पार उतार दिया। लक्ष्मण सीता के चरणो में गिर पड़े और आँखों से गर्म-गर्म आंसू टपकाते हुए कहा - "हे निर्दोष रानी! मेरी करनी पर मुझे क्षमा करो। मुझे आदेश है की मैं तुम्हे यही छोड़ जाऊं क्योंकि लोग आपके कारण राम पर आक्षेप करते है।"
 
राम ने सीता को त्याग दिया और उनके हाल पर जंगल में छुडवा दिया। सीता ने वही जुडवा पुत्रों लव और कुश को जन्म दिया। तीनो वाल्मीकि के यहाँ रहने लगे। वाल्मीकि ने बालको का लालन-पालन किया और उन्हें रामायण की कथा गायन सिखाया, जो उन्होंने स्वयं रची थी। राम के राज्य के पास ही वे बालक 12 वर्ष तक जंगलो में ऋषि के आश्रम में पलते रहे। आदर्श पति और प्रिय पिता ने यह जानने की कभी चेष्टा नहीं की सीता जीवित है या मर ही गई। राम 12 वर्ष पश्चात सीता से अदभुत दशा में मिले। राम ने एक यज्ञ किया और उसमे सभी ऋषियो को भाग लेने के लिए बुलाया। राम ने जान बुझकर वाल्मीकि को, आमंत्रित नही किया। परन्तु वाल्मीकि अपनी ओर से ही सीता के दोनों पुत्रो को, अपने शिष्यों के साथ लेकर यज्ञ में पहुँच गए। जब यज्ञ चल रहा था तो दोनों बालको ने सभा में रामायण का गायन आरम्भ किया। राम बड़े आनंदित हुए और बालको के विषय में पूछा तो बताया गया की वे सीता के पुत्र है। तब उन्हें सीता की याद आई परंतु फिर भी उन्होंने क्या किया? वे सीता के पास नहीं गए। उन्होंने अबोध बालको को बुलाया, जो अपने माता-पिता के पाप के विषय में कुछ नहीं जानते थे। वे तो एक अत्याचार के शिकार थे। उन्होंने वाल्मीकि से कहा की "सीता यदि पवित्र और सती है तो वे सभा में आएं और अपने ऊपर लगाए गए कलंक को धोकर अपना सतीत्व प्रमाणित करें। आखिर, वे लंका में ऐसा कर चुकी है।" ऐसा तो उन्हें जंगल में जाने से पूर्व भी कहा जा सकता था। राम ने कोई वचन भी नहीं दिया की परीक्षा में सफल हो जाने पर वे सीता को फिर रख लेंगे। वाल्मीकि ने सीता को सभा में प्रस्तुत किया। जब पति-पत्नी आमने-सामने थे, वाल्मीकि बोले, "हे दशरथ के पुत्र यह सीता खड़ी है, जिसे तुमने लोगों की कानाफूसी के कारण त्याग दिया था, जिन्हें मैंने अपने आश्रम में पाला है।" राम ने कहा, "मैं जानता हूँ की सीता पवित्र है और यह मेरे पुत्र है। इन्होंने लंका में भी अपनी सतीत्व का प्रमाण दिया है। मैं इन्हें साथ ले आया परन्तु लोगो को अभी संदेह है। सीता वह परीक्षा यहाँ भी दे, जिसे सभी ऋषि और प्रजा भी देख लें।"
 
सीता ने नेत्र भूमि पर गड़ाए। दोनों हाथ जोड़कर प्रण लिया- "यदि मैंने सपने में भी राम को छोड़कर, कभी किसी व्यक्ति का विचार भी किया हो तो धरतीमाता तू फट जा और मुझे अपने में समा ले। यदि मैंने सदा राम को प्यार किया हो, मेरे कार्यो और विचारों में वही बसे हो तो धरतीमाता तू फट जा और मुझे अपने में समा ले।" जब उन्होंने यह प्रतिज्ञा दुहराई तो धरती फट गई। एक स्वर्ण सिंहासन उभरा। वह उस पर विराज गई। आकाश से पुष्पो की वर्षा हुई। सभी देखकर आनन्दविभोर हो गए।
 
इसका अर्थ है की सीता ने राम के पास वापस जाने के बजाय मर जाना बेहतर समझा। जिस राम ने उसके साथ कसाई से अच्छा व्यवहार नहीं किया, यह उस सीता की गति और राम का पाप था।
 
राम को मर्यादा पुरुषोत्तम कहा गया है। क्या इससे यह प्रमाणित होता है।
 
वास्तविकता यह है की राम ने कभी राजपाट किया ही नहीं। वह तो सांकेतिक राजा थे। वाल्मीकि के अनुसार शासन-कार्य भरत देखते थे। राम ने राज-काज और प्रजा की चिंताओं से मुक्ति पा ली थी। राम के राजा बनने के बाद की दिनचर्या का  वाल्मीकि ने बहुत बारीकी से वर्णन किया है। (उत्तरकाण्ड सर्ग 42, श्लोक 27) उसके अनुसार पूरा दिन पूर्वाहन और अपराहन में विभाजित रहता था। सवेरे से मध्यान्ह तक वह पूजा पाठ में व्यस्त रहते थे। अपराहन वे क्रमश: दरबारी विदूषकों और अंत:पुर में व्यतीत करते थे। (उत्तरकाण्ड सर्ग 43, श्लोक 1) जब वे रंग महल से ऊब जाते थे तो विदूषकों की संगती करते थे और जब विदूषकों से ऊब जाते थे, रंगमहल में चले आते थे। वाल्मीकि विस्तार से बताते है की राम रनिवास में कैसे समय बिताते थे? यह रंग महल अशोक वन नामक उपवन में था। वही राम भोजन करते थे। वाल्मीकि के अनुसार उनके भोजन में अनेक स्वादिष्ट व्यंजन होते थे। उसमे मांस, फल और मदिरा सम्मिलित थी। राम, मद्य त्यागी नहीं थे। वे प्रचुर मात्रा में मदिरापान करते थे और सीता को भी मदिरापान में सहभागिनी बनाते थे।(उत्तरकाण्ड सर्ग 42, श्लोक 8) राम के अंत:पुर का जैसा वर्णन वाल्मीकि ने किया है, वह कोई मामूली बात नहीं है। नाच-गाने में अप्सराएं, उरग और किन्नर बालाए सम्मिलित होती थी। अन्य क्षेत्रो से भी सुन्दर नारिया लाई जाती थी। राम सूरा और सुंदरियों के मध्य विराजते थे। वे राम को आनंदित करती और राम उन्हें माला पहनाते। वाल्मीकि ने राम को स्त्रियों के प्रिय पुरुषों का राजकुमार कहा है। यह उनकी एक दिन की जीवनचर्या नहीं थी। यह उनके जीवन की नियमित गति थी।
 
जैसा की पहले कहा जा चूका है, राम ने प्रजा-कार्यों से हाथ खिंच रखा था। वह अन्य भारतीय राजाओं की तरह प्रजा का दुख-दर्द सुनकर निवारण का कोई प्रयास नहीं करते थे। वाल्मीकि के अनुसार मात्र एक अवसर पर उन्होंने व्यक्तिगत रूप से किसी की शिकायत सुनी। किन्तु दुर्भाग्य से वह घटना बहुत दुखांत है। उन्होंने किसी की एक गलती के लिए स्वयं इतना बड़ा अपराध किया, जिसकी इतिहास में मिसाल नहीं है। यह घटना थी- एक शुद्र शम्बूक की हत्या। वाल्मीकि के लिखा है - "राम-राज्य में किसी की अकाल मृत्यु नहीं होती थी। परन्तु किसी ब्राम्हण के पुत्र की अकाल मृत्यु हो गई। दुःखी पिता मृत पुत्र के शव को राज के महल पर ले आया और वह रख दिया और जोर-जोर से विलाप करने लगा और अपने पुत्र की मृत्यु पर राम को भांति-भांति से कोसने लगा। वह कह रहा था की इसके राज्य में यह पापाचार का परिणाम है और यदी राजा अपराधी को दण्ड नहीं देगा तो वह पुत्र उसे नहीं मिलेगा। वह राम के द्वार पर अनशन करेगा और अन्न-जल लिए बिना अपने प्राण त्याग देगा। राम ने नारद और आठ विद्वान ऋषियों की सभा बुलाई। उन्होंने कहा की उनकी प्रजा में से संभवत: कोई शुद्र तपस्या कर रहा है। यह धर्म विरुद्ध है क्योंकि तपस्या करने का अधिकार मात्र द्विजों को है। राम समझ गए की धर्म का उल्लंघन करके वह पाप कर रहा है। उसी के कारण ब्राम्हण का पुत्र मर गया। इसलिए राम ने अपना पुष्पक विमान मंगाया और राज्य के आंतरिक भागों में अपराधी को खोजा। अंत में घने जंगलो में सुदूर दक्षिण में उन्होंने एक व्यक्ति को कठोर तपस्यारत देखा। वे उसके पास गए और उसके यह बताने के बाद की वह शम्बूक नाम का शुद्र है और वह सशरीर स्वर्ग जाने के लिए तपस्या कर रहा है, उन्होंने उसे चेताया तक नहीं, अनधिकृत कार्य न करने के लिए समझाया भी नहीं। बस! बेझिझक उसका सर काट दिया। देखा! उसी समय दूर अयोध्या में ब्राम्हण पुत्र की सांस चलने लगी। जंगल में देवताओं ने पुष्प वर्षा की  कि राजा ने एक शुद्र को आकाश में उनकी नगरी में आने से रोक दिया, जो तपस्या के बल पर वहाँ पहुँच जाता जिसे तपस्या का अधिकार नहीं है। वे राम के सम्मुख प्रकट हुए और उन्हें बधाई दी। जब राम ने ब्राम्हण के पुत्र को जीवित करने का अनुरोध किया तो उन्होंने बताया की वह जीवित हो चूका है। फिर वे चले गए। राम तब पास ही अगस्त्य ऋषि के आश्रम में पहुंचे। उन्होंने शम्बूक को दी गई सजा पर उनकी प्रशंसा की और उन्हें एक ताबीज भेट दिया।" राम राजधानी लौट आए।
 
ऐसे थे राम!
 
- हिंदू धर्म की पहिलियां
डॉ. बी. आर. अम्बेडकर

हिंदुत्ववाद्यांचा सवता सुभा

डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घडून आलेला महाडचा सत्याग्रह हा अस्पृश्यांनी हिंदू म्हणून केलेला होता. त्यावेळी ते बौद्ध नव्हते. आम्हीही हिंदू आहोत. म्हणून आम्हालाही सार्वजनिक तळ्यात पाणी भरण्याचा अधिकार असला पाहिजे. अशी एक साधी माणुसकीची त्यांची मागणी होती, परंतु अखिल भारतातील सर्व हिंदुंचे धर्माच्या नावाखाली संघटना करू इच्छीणारे हे हिंदुत्ववादी संघाचे लोक हा सत्याग्रह लांबुन न्याहाळत होते. या संघवाल्यांपैकी कोणीही या सत्याग्रहात सामिल झाले नाहीत किंवा त्यांनी अस्पृश्यांना मदत केली नाही, उलट अनेक हिंदुत्ववादी सनातनी लोकांनी या सत्याग्रहावर दगडांचा वर्षाव करुन त्यांना रक्तबंबाळ करून सोडले.

त्याचप्रमाणे अस्पृश्यांनी डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केले. परंतु अस्पृश्यांनी हिंदूच राहावे असे म्हणणा-या संघवाल्यांनी त्यांना कोणतीही सहानुभूति दाखविली नाही. हिंदुंची संघटना व्हावी, अस्पृश्यता नष्ट व्हावी. असे सतत भूंकत राहणा-या या हिंदुत्ववाद्यांना मदत करण्यासाठी अस्पृश्यांचे हे सत्याग्रह म्हणजे एक सुवर्ण संधि होती. परंतु ही सारी मंडळी ख-या अर्थाने धर्मसंरक्षक नसून जातसंरक्षक असल्यामुळे हे घडणे शक्य नव्हते.

१९२० सालापर्यंत राष्ट्रीय लढ्यात टिळकांच्या सारख्या ब्राम्हण पुढा-यांचे नेतृत्व होते. टिळक हे हिंदुत्ववादी आणि त्याचप्रमाणे आपल्या ब्राम्हण्यांचा अभिमान बाळगणारे होते. म्हणूनच महाराष्ट्रातील या पिढितील अनेक पुढारी आणि क्रांतिकारक ब्राम्हण होते. या सा-यांनाच पेशव्यांचे म्हणजे स्वजातियांचे राज्य गेल्याचे दुःख होते. परंतु ही जात हुशार असल्यामुळे तसे उघडे बोलून दाखवित नसत. १९१६ साली लखनऊ कराराला टिळकांनी संमती दिली आणि त्यावेळेपासुन मुसलमान समाज वेगळा फेकला गेला, त्यावेळी ख-या अर्थाने फाळणीची बीजे पेरली गेली. कारण या करारानुसार त्यांना स्वतंत्र मतदार संघ मिळाले. पुढे म्हणजे १९२० च्या टिळकांच्या मृत्युनंतर गांधींच्याकडे नेतृत्व आल्यानंतर हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य करण्याचा प्रयत्न गांधीनी केला. म्हणजे टिळकांनी जी जातीयवादाची बीजे पेरली ते निस्तरण्याचे काम गांधीनी केले. आणि मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात समाविष्ट करुन घेण्याच्या या प्रयत्नामुळेच हिंदुत्ववाद्यांच्या गोळीला ते बळी पडले. गांधी-नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्यासाठी १९२० ते १९४७ या काळात प्रचंड आंदोलन झाले. हे देशव्यापी आंदोलन राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठीच होते. परंतु या अतिरेकी हिंदुत्ववाद्यानी या आंदोलनात भाग घेतला नाही. हे संघवाले धर्माभिमानी या राष्ट्रव्यापी चळवळीपासून दुरच राहिले. कारण टिळकांचे हिंदुत्ववादी, ब्राम्हणी परंपरा श्रेष्ठ मानणारे नेतृत्व आता उरले नव्हते. नेतृत्व अब्राम्हण, गुजराथी गांधींच्याकडे गेले ही गोष्ट या संघवाल्यांना फारशी बरी वाटली नाही.
अस्पृश्याता नष्ट व्हावी असा उद्धघोष करीत राहणे हां या लोकांचा एक मतलबाचा, फसवेगिरिचा भाग आहे. हिन्दुत्ववाद सांभाळण्यामध्ये आपोआप जातवारी सांभाळली जाते, हे या हुशार लोकांना चांगले माहीत आहे. आणि जातवारी सांभाळण्यामध्ये ब्राम्हण्य आपोआपच सुरक्षित राहते हे उघडच् आहे. अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणुन या संघवाल्यांनी कसलीही चळवळ किंवा सत्याग्रह केला नाही. प्रा. नरहर कुरुंदकर या संदर्भात लिहितात, 'ख्रिस्ती धर्मियांनी शाळा चालविल्या, दवाखाने काढले, अनाथलये चालविली, अशा भव्य परंपरा चालविल्या. परंतु जनतेची अशी सेवा परंपरा हिंदुत्ववाद्यांना कधीच नव्हती. शंकराचार्याचे मठ संस्कृत पाठशाळाही धड़ चालवु शकले नाही. हिंदू राज्य हे या लोकांचे आदर्श राज्य म्हणून ते नेपाळच्या हिन्दू नरेशाचे कौतुक करतात. परंतु कोल्हापुराचे शाहुराजे, ज्यांनी समाजकार्याचा मोठा आदर्श घालून दिला. ते हिन्दू असूनही, हिन्दू परंपरा पाळणारे असूनही, या हिन्दुत्ववाद्यांनी त्यांचा द्वेष केला.'

हिन्दुत्ववाद्यांनी शाहू महाराजांचा द्वेष केला, कारण ते समाजातील ब्राम्हणी वर्चस्वाविरुद्ध होते, या संघटनेसाठी 'हिन्दुत्ववादाची' बेगडी ढाल पुढे करणा-या संघवाल्यांना शाहूनी केलेला ब्राम्हण्यावरील हल्ला सहन झाला नाही. कारण त्यांचा हिन्दुत्ववादाचा शिंपला आतील ब्राम्हणी वर्चस्वाचा मोती सुरक्षित ठेवण्यासाठी होता, ही गोष्ट स्पष्ट आहे. उद्या नेपाळ च्या नरेशानी सुद्धा ब्राम्हणी वर्चस्वाविरुद्ध बंड पुकारले तर हेच हिन्दुत्ववाले, संघवाले त्याला शिविगाळ करण्यास सुरवात करतील.

हिन्दवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी या लोकांना फार प्रिय. कारण ते म्हणे गोब्राम्हण प्रतिपालक होते. त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक हंबीरराव मोहिते सोडले तर बाकीचे सर्व ब्राम्हण होते. आणि ब्राम्हणी विचारधारेनुसार रामदास हे त्यांचे गुरु होते. या हिन्दुत्ववाद्यांनी शिवाजीला राज्यभिषेकाच्या वेळी शुद्र म्हणून त्यांची हेटाळनी केली. म्हणजे जातीश्रेष्ठत्वाचा ज्या ज्या वेळी प्रश्न उभा राहिला त्या त्या वेळी या लोकांनी धर्म गुंडाळून ठेवला, असा इतिहास आहे. म्हणजे मुसलमानी आक्रमणापासून हिंदुंचे, ब्राम्हणांचे, त्यांच्या सुंदर स्त्रियांचे संरक्षण केले. त्याबद्दल ह्या लोकांनी कधीही कृतज्ञता दाखविली नाही.

ब्राम्हणांची दगलबाजी, विश्वासघात आणि कृतघ्नपना भयानक स्वरूपाचा होता. शिवाजीचा गुरु म्हणून रामदासाला ज्या ब्राम्हण इतिहासकारानी शिवाजीच्या डोक्यावर बसविले व् राजवाड्यांची जातीय दृष्टीची परंपरा चालविली, तो रामदास शिवाजीच्या राज्यभिषेकाच्या वेळी कुठेतरी दडून बसला होता. कारण ब्राम्हण शिवाजीला शुद्र मानत होते. ते रामदासाच्या ब्राम्हणी श्रेष्ठत्वाच्या अहंकाराला पोषकच होते. शिवाजी धर्मसंरक्षक होता. ब्राम्हणांचेही त्याने संरक्षण केले. परंतु जातिश्रेष्ठत्वाचा प्रश्न ज्यावेळी उभा राहिला त्यावेळी धर्म आणि धर्मसंरक्षक या दोहोनाही पायदळी तुडवीणारी ब्राम्हणी परंपरा या रामदासाने तंतोतंत पाळली.

बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या हिन्दुत्ववाद्यांनी आयुष्यभर त्रास दिला. अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध केला. मंदिर प्रवेशाला अप्रत्यक्षपणे विरोध केला. केसरी कंपुने स्व:ता लेख न लिहिता दुस-याचे लेख आंबेडकर विरोधात छापले. हिन्दू म्हणून हिन्दू मंदिरात देवदर्शन घेऊ पाहणा-या अस्पृश्यांना रक्तबंबाळ केले आणि ते बौद्ध झाले, त्यावेळी हे राष्ट्रांतर आहे असे ओरडू लागले. हिंदुत्ववाद्यांच्या या विरोधाला आयुष्यभर तोंड देत देतच आंबेडकरांनी अस्पृश्योंद्धाराची चळवळ चालविली.
संदर्भ - डॉ . आंबेडकरांचे विरोधक
- डॉ. दिनकर हेरलेकर

बुद्धाच्या वेदांवरील हल्ल्यामुळेचशूद्रांचा सेवाधर्म जावून ते राज्यकर्ते झाले

वेद हे इश्वरनिर्मित आहेत, अपौरुष आहेत, त्यांची आज्ञा मानावी, असे सांगण्यात येते. पण त्याला इतिहासात कोठे पुरावा नाही. ब्राम्हणांखेरीज कोणीच वेदाला प्राधान्य दिलेले नाही व आपला धर्मग्रंथ म्हणून कधीच मानलेले नाही. वेदाला प्रमाण मानणे ही ब्राम्हणांनी मागाहून आणलेली पद्धती 'थिअरी' आहे. याचा पुरावा आश्वलायन गृह्य सूत्रातून भरपूर मिळतो. त्यावेळी ब्राम्हणही वेदाला प्रमाण मानित नव्हते, याचा स्पष्ट उल्लेख आहे. सामाजिक मुल्ये निर्माण करण्यापूर्वी जनता पंचायतीचा निर्णय ग्राह्य मानित असत. त्यावेळी वेदाला चौथे किंवा पाचवे स्थान असे. शबर स्वामीनी जनमेजयाची सूत्रे घेऊन त्यावर भाष्य केले आहे. त्यात पूर्वपक्ष व उत्तरपक्ष मांडले आहे. शबर स्वामीनी ब्राम्हण वेद मानित नव्हते, असेच म्हटले असून वेद निर्मिति म्हणजे मुर्खाचे व वेडयांचे कार्य होय असा दावा मांडला आहे. बुद्धानी वेद प्रमाणभूत कधीच मानले नाहीत. वेदप्राणित धर्मास बुद्धधर्माने धक्का दिला. हा बुद्धधर्म शूद्रांचा होता व तो वेदप्रामाण्य कधीच मानीत नव्हता.

मी गीता न वाचता टिका करतो अशी टिका केली जाते. पण ती टिका खोटी आहे. गेली पंधरा वर्षे गीतेचा अभ्यास केल्यावरच माझी मते मांडण्यास मी सुरवात केली.
 
गीतेत विशेष असे काही नाही. तीत प्रामुख्याने तिन गोष्टी सांगितल्या आहेत. मरणे, मारणे, हिंसा करणे पाप आहे काय, वर्णाश्रम धर्माची महती व भक्तीने मोक्ष मिळेल, ह्या त्या तिन गोष्टी होत. गीतेचा अभ्यास करताना निव्वळ गीता पुस्तकावर अवलंबून गीतेचा अर्थ कळणार नाही तर त्या कालीन इतर वांगमयाचाही अभ्यास करुन गीतेचा अर्थ लावला पाहिजे.
 
या देशाचा पुर्विचा इतिहास ध्यानात घेतला म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्षे ब्राम्हणवर्ग व बुद्धधर्म यांचा वाद चालु होता. या वादात जे वाङ्गमय निर्माण झाले ते धार्मिक स्वरूपाचे नसून राजकीय स्वरूपाचे आहे. देशातील सत्ताकेंद्रावर आपली हुकूमत चालावी म्हणुन गीता ग्रंथाचा जन्म झाला.

वेदातील थोडाफार अनुवाद गीता ग्रंथात करण्यात करण्यात आला आहे. परंतु वेदात तरी असे कोणते ज्ञान साठविले आहे? मी वेद किती तरी वेळा वाचले आहेत. त्यात समाजाच्या किंवा मानवाच्या उन्नतीसाठी व नितिमत्तेस पोषक असे काही सांगितलेले नाही. अथर्ववेदात, बायको प्रेम करीत नसली तर काय करावे, दुस-याची बायको कशी वश करावी, द्रव्यहरण कसे करावे हे सांगितले असून जारण मारणादी गोष्टींचाही उल्लेख आहे. वास्तविक वेदांसारख्या ग्रंथात या विषयांची काय जरुरी होती? यातील पुरुष सुक्तात ब्राम्हणांपासून शूद्रांपर्यंत कोणी कसे वागावे हे दिले आहे. बुद्धाचा याचबाबत कटाक्ष होता व त्याच दृष्टीने चातुरवर्णयाबद्दल त्यांनी टिका केली आहे. क्षत्रियानी मारणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे सांगितले आहे. एकाने दुस-याला मारणे हे जरूरीही असू शकेल, पण कर्तव्य ठरणार नाही. गीतेच्या दुस-या अध्यायात १८ ते ३९ श्लोकात वेदांताचा आधार घेऊन आत्मा अविनाशी आहे, देह जरेने किंवा अन्य कारणाने नाहिसा होणारच, असेच विवरण केलेले आढळेल. परंतु विचार करा की एखाद्या खुनी खटल्यात वकिलाने जज्जास असे सांगितले की, 'साहेब आत्मा अविनाशी आहे, तेव्हा खुनाबद्दल आरोपीस का शिक्षा करता?' तर हे वकिलाचे म्हणणे कसे दिसेल?
 
बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानापुढे हां पुरावा टिकने शक्य नव्हते. बुद्ध तत्वाने सामाजिक, मानसिक व राजकीय क्रांती करुन शुद्राना उच्चपद प्राप्त करुन दिले. त्याकाळी अनेक शुद्र राजे झाल्याचे दाखले आहेत. आपल्या हातातील सत्ता गेल्यामुळे ब्राम्हणांनी पुन्हा चातुर्वर्ण्य पद्धतिचा पाया घालून भगवद्गितेच्याद्वारे ते काम केले व देशाची आपल्या हातून गेलेली सत्ता पुन्हा परत आपल्या हातात आणली.

वर्णाश्रम धर्माचा गीतेपूर्वी काय पाया होता तो जैमिनीने आपल्या पूर्वमीमांसा ग्रंथात दिला आहे. वेदावर बुद्धानेच नव्हे तर चार्वाक वगैरे विद्वानांनीही टिका केलेली आहे. बुद्धाच्या वेदावरील हल्ल्यामुळेच शूद्रांचा सेवाधर्म जावून ते राज्यकर्ते झाले.

सांख्य तत्वज्ञानावर श्रीकृष्णाने चातुर्वर्णयाची चौकट निर्माण केली. सांख्यकारानी त्रिगुणाला मान्यता दिलेली आहे आणि गीताकारानी चार गुण, चार वर्ण यांची सांगड घातलेली आहे. आतापर्यंत एकाही विद्वानाने सांख्यकारांच्या व गिताकारांच्या या तफावतीचा मेळ बसविलेला नाही. श्रीकृष्णाच्या भगवद्गितेने चातुर्वर्णास आधार दिला म्हणूनच आज चातुर्वर्ण टिकून राहिला आहे.
 
भगवदगीतेचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करताना मला या पुस्तकात चार ठिगळे बसविल्याचे आढळून आले. माझे मत असे आहे की प्रथम हा एक कृष्ण वर्णनाचा त्याच्या जातभाईनी म्हणजे सातवतानी गवळ्यानी, अर्जुन हतवीर्य झाला असताना कृष्णाने त्याला युद्धप्रवण केले म्हणून कृष्णाचे गुणगान करण्यासाठी रचलेला पोवाडा होता. त्यात धर्म अगर तत्वज्ञान नव्हते. त्यावेळी फ़क्त ६० श्लोक असावेत. नंतर हे लोक जेव्हा कृष्णाला ईश्वर मानु लागले त्यावेळी त्यांनी गायिलेली स्तुती म्हणजे भक्तिमार्ग झाला व अशारीतिने कृष्णाला देव बनविला. नंतर पुढे गितेचे असेच रूपांतर होऊन ती आजच्या स्वरुपात आली, यात मला कोणाला दोष द्यावयाचा नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही हे ग्रंथ प्रमाण म्हणून मानाल तोपर्यन्त जगात तुमचा उद्धार होणार नाही. या पुस्तकातून शूद्रांची निंदा व अवहेलना करण्यात आली आहे. त्यांच्यावर निरनिराळे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल, ते कायमचे दलित राहतील, अशी योजना करण्यात आली आहे. ती पुस्तके जर तुम्ही आम्हाला धर्मग्रंथ म्हणून प्रमाणभूत माना अशी सक्ती करीत असाल तर ते मी कधीही मान्य करणार नाही. हे माझे एक जीवन कार्य आहे. खालच्या वर्गातील लोकांना नि:संतान करण्याचा, त्यांना कायमचे पायदळी ठेवण्याचा व त्यांना रासातळाला नेण्याकरिता पद्धतशिर प्रयत्न करणारा असा एखादा विशिष्ट वर्ग जगातील इतर कोणत्याही देशात आढळणार नाही.
संदर्भ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग २
पेज नंबर ४८२, ४८३, ४८४

अशा देवांना काय पूजावे ?

ता. २८ ऑगस्ट १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वांद्रे, मुंबई येथील म्युनिसिपल हॉलमध्ये दिलेले भाषण.
हिंदू धर्माप्रमाणे आपण जे पाळीत होतो ते सर्व धार्मिक सण-वार सोडून दिले पाहिजेत. हे सोडून देण्याचे कारण आज जे मी सांगणार आहे ते मात्र निराळे आहे. हिंदू धर्माप्रमाणे जे काही विधी करतात ते धर्माच्याच नव्हे तर नीतीच्या दृष्टीने रास्त असतात काय याचा आपण विचार केला पाहिजे. काही विधीत तर अतिशय बाष्कळपणा भरलेला असतो. उदाहरणार्थ, शंकराच्या नावाने लोक सोमवारी उपवास करतात व शंकराच्या पिंडीची बहुतप्रकारे पूजा करतात. परंतु शंकराची पिंडी ही काय वस्तू आहे, याचा कोणी विचार केला आहे? ती दुसरे तिसरे काहीही नसून पुरुष-स्त्रीच्या संभोगक्रियेची प्रतिमा आहे. अशा बिभत्स प्रतिमेचे गोडवे आपण गावे का ? रस्त्यावर श्वानाप्रमाने जर नर-नारी वाह्यतगिरी करू लागले तर आपण त्यांची फुलाने पुजा करायची की जोड्याने? मग पार्वती-शंकर यांच्या त्याच क्रियेच्या प्रतिमेला म्हणजे देवाच्या बिभत्सपणाला आपण पूजावे काय?

गणपतीचासुद्धा तसलाच प्रकार ! गणपतीची कथा अशी आहे की एकदा पार्वती नग्न स्नान करीत होती. त्यावेळी शंकर कोठेतरी दुसरीकडे गेला होता. म्हणून पार्वतीने आपणास कोणापासून उपसर्ग पोहोचू नये म्हणून आपल्या अंगावरचा मळ काढून त्याचा राक्षणकर्ता गणपती बनविला. तेव्हा मळातुन उत्पन्न झालेल्या अमंगळाला देव कसे मानावयाचे? ईश्वर निष्कलंक, मूर्तिमंत, पवित्र असावयास पाहिजे. परंतु हिंदू धर्मातील देव मोठे विचित्र आहेत ! म्हणून त्यांची पुजा करू नये. अशी माझी प्रामाणिक समजूत आहे.

तिसरी गोष्ट दत्तात्रेयाची. अत्री ऋषीची बायको अनसुया ही महान पतिव्रता आहे. असे ब्रम्हा, विष्णु व महेश या तीन देवांच्या बायकांना नारद सांगत गेला. आपल्यापेक्षा कोणी स्त्री अधिक पतिव्रता असावी हे त्यांना पाहावेना. तेव्हा या तिन्ही बायकांनी आपापल्या नव-याना अनसुयेचे पातिव्रत्य हरण करण्यास सांगितले व बायकांचे म्हणणे ऐकून हे तिघे वीरही त्या कामास तयार झाले. हे तिघे अनसुयाच्या घरी गेले. तिच्या नव-याला काही कारण सांगून दुसरीकडे पाठविले व आपण अनसुयेच्या सहवासात राहु लागले. या अवस्थेत तिने एका मुलाला जन्म दिला आणि या बालकाचे जनकत्व कोणाकडे हा विचार पडल्यामुळे त्या तिघांवर सारखीच जबाबदारी टाकण्याकरिता त्याला तिन तोंडे लावली व तोच हा दत्तात्रेयाचा अवतार!
संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
          लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग २,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे, भाग २, १९३७ ते १९४५ (पेज नं. ४६, ४७)

शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

भीमा कोरेगाव

नमो बुद्धाय - जय भीम  
               पुण्याजवळ  भीमा नदीच्या काठी कोरेगाव या ठिकाणी ब्रिटीशांनी बांधलेला एक विजयस्तंभ आहे. या ठिकाणी १८१७ साली पेशव्यांचा इंग्रजांनी पराभव केला आणि या पराभवाबरोबरच पेशवाई नष्ट झाली. आणि पुण्याच्या शनिवारवाड्यावर ब्रिटीशांचा युनियन जॅक (झेंडा) फडकू लागला. या युद्धात ब्रिटीशांच्या बाजूने महार सैनिक लढले आणि त्यांची संख्या अगदी अल्पशी असताना देखील पेशव्यांच्या प्रचंड सैन्याचा त्यांनी पराभव केला, आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर महार सैनिकांनी ब्रिटीशांना विजय मिळवून दिला. या विजयाप्रितर्थ आणि महार सैनिकांच्या पराक्रमाचे स्मरण चिरकाल राहावे यासाठी ब्रिटीशांनी हा विजयस्तंभ  बांधला, आणि त्या स्तंभावर पराक्रमी महार सैनिकांची नावे कोरून ठेवली. 
  
              डॉ. बाबासाहेब आंबेडकर या स्तंभाला दरवर्षी भेट देत असत. विशेषत: जानेवारी महिन्यात ते जात असत आणि त्या सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चार शब्द बोलत असत. असेच एका वर्षीच्या तेथील भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले, ' हा विजयस्तंभ म्हणजे ब्राम्हणी सत्तेचा पराभव करून महार सैनिकांनी जो विजय मिळविला त्या विजयाचे हे एक प्रतिक आहे. महार सैनिकांच्या शौर्याचे हे प्रतिक आहे. महार सैनिक ब्रिटीशांच्या नेतृत्वाखाली इथे लढले, आणि त्यांनी बदनाम अशा पेशव्यांच्या  राजवटीचा शेवट केला.' 

              बाबासाहेबाना याबद्दल अभिमान होता. वास्तविक हा अभिमान ब्रिटीशांना मिळालेल्या  विजयापेक्षा महारानी  केलेल्या पराक्रमाबद्दलच अधिक होता. डॉ. आंबेडकरांचे हे भाषण हिंदुत्ववादी गोळवरकराना चांगलेच झोंबले. तेव्हा या भाषणावर आपली तीव्र  प्रतिक्रिया व्यक्त करताना गोळवरकर म्हणाले, ' डॉ. आंबेडकरांचे हे उदगार किती दुर्दैवी  आणि हृदयावर आघात करणारे आहेत ? स्वकीय पेशव्यांच्या विरुद्ध आणि परकीय  इंग्रजांच्या बाजूने लढणा-या महार सैनिकांच्या बाबतीत हि भाषा गुलामीची निदर्शक आहे,  ती विजयाची खुण  नाही. आपल्याच देशबांधावाच्या विरुद्ध लढणे हि स्वाभिमानाची  किंवा  विजयाची बाब नव्हे.'  
 
               डॉ. आंबेडकरांच्या विधानावर गोळवरकरांचा आक्षेप हा प्रथमदर्शनी कोणत्याही व्यक्तीस  योग्य आहे असेच वाटेल यात शंका नाही. गोळवरकराना महार सैनिकांची प्रवृत्ती गुलामीची  वाटते. परंतु राष्ट्रभक्त गोळवरकर गुरुजींनी एका महत्वाच्या गोष्टीकडे सोयीस्कररीत्या  कानाडोळा केला आहे. या महार लोकाना या देशात गुलाम कोणी केले ? त्यांच्यातील गुलामी प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातले ? पेशव्यांच्या काळात 'आम्हाला  गुलाम करा, आम्हाला बहिष्कृत करां,' अशी मागणी करून महारांनी शनवारवाड्यापुढे  धरणे धरल्याचा इतिहास तरी कोठे अस्तित्वात नाही. वास्तविक गोळवरकर हे चित्पावन ब्राम्हण, आणि पेशवे हे त्यांचेच ज्ञातीबांधव, तेव्हा आपल्या ज्ञातीबांधवांचे, चित्पावनांचे राज्य  बुडाल्याचे दु:ख गोळवरकरांना होणे हे अपरिहार्य आणि नैसर्गिक आहे. परंतु ज्या महार- मांगाना पेशव्यांच्या काळात गावात येण्याची परवानगी नव्हती, सकाळ-संध्याकाळ  फिरण्यास बंदी होती, ज्यांच्या गळ्यात थुंकण्यासाठी मडकी बांधण्यात आली होती, रस्त्यात ब्राम्हण भेटला तर आपला विटाळ होऊ नये म्हणून ज्या अस्पृश्यास पटकन खाली बसावे  लागे, ज्या महारांना व मांगांना तेल-शेंदूर पाजून इमारतीच्या पायात पुरून त्यांचा बळी दिला  असे, ज्या महारास त्याच्या क्षुल्लक गुन्ह्याबद्दल शिरच्छेदाची शिक्षा दिली जात असे. अशा महारांनी पेशव्यांचे राज्य हे आपलेच राज्य मानावे, अशी गोळवरकरांची इच्छा असेल,  तर त्यांच्यासारखा बेजबाबदार आणि दांभिक माणूस मिळणे कठीण बरे, राष्ठनिष्ठेच्या  भाषेतच जर बोलायचे झाले, तर या पेशव्यांच्या काळात त्यांनी राष्ठनिष्ठा जोपासली होती  काय ? या देशातल्या हिंदुत्ववादी ब्राम्हणांची कल्पना अशी आहे कि, राष्ठनिष्ठा केवळ  आपणच जोपासली. राष्ट्रावर जर कोणी खरेखुरे प्रेम केले असेल, तर ते आपणच. फुटीरवृत्ती, राष्ट्रविघातक कारवाया, अंतर्गत कलह आणि जातीयवाद यांनी सारी पेशवाई आतून  पूर्णतया पोखरून गेली होती. पेशवाईंच्या काळात राघोबा दादा अनेक वेळा वसईच्या  इंग्रजाना जाऊन मिळाला आणि माधवराव पेशव्यांच्या बरोबर त्याने युद्ध केले. नानासाहेब पेशव्याने आंग्रे घराण्यातील तुळाजीला  नेस्तनाबूत करण्यासाठी काय केले ? तर त्याने परकीय इंग्रज आणि पोर्तुगीज यांची मदत घेऊन स्वकीय तुळाजी आंग्रे यांचे पारिपत्य घडवून आणले. राघोबा दादा आणि नानासाहेब ह्यांच्या ह्या कृती कोणत्या राष्ट्रावादात  बसतात हे गोळवरकराना विचारायला हवे होते. १७६१ च्या पानिपतच्या युद्धात मल्हारराव  होळकराने अंतस्तपणे फितुरी करून युद्धात जाणून-बुजून तटस्थता स्वीकारली, त्याचप्रमाणे पेशव्यांनी उत्तर भारतातील हिंदू राज्यांना अनेक वेळा चौथाई, सरदेशमुखीच्या नावावर  लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना लुटारू समजत असत. पेशव्यांच्या विचारामध्ये  राष्ट्रभक्तीच असती, तर त्यांनी आपल्याच भारतीय राज्यांना म्हणजे शीख, जाट, राजपूत, बुंदेले वगैरेना शत्रू मानून लुटले नसते, आणि त्यांच्या या प्रवृत्तीमुळेच त्याना १७६१ च्या  युद्धात अब्दालीशी एकट्याने लढावे लागले. 
          
                 राष्ट्रावर प्रेम केवळ महारांनी करावे आणि पेशव्यांनी मात्र राज्य करावे, फितुरी करावी, जातीनिष्ठा जोपासाव्या, अशा प्रकारच्या गोळवरकरी विचारामुळेच देशाची खरी नासाडी  झाली आहे. वास्तविक हे हिंदुत्ववादी एकाच वेळी राष्ट्रनिष्ठा आणि जातीनिष्ठा जोपासू  पाहणारे आहेत. यांनी राष्ट्रप्रेमापेक्षा स्वत:च्या जातीवरच अधिक प्रेम केले असा इतिहास  आहे. वास्तविक गोळवरकराना जे दु:ख आहे ते स्वत:च्या ज्ञातीबांधवांचे  राज्य नष्ट झाले  याबद्दलचे आहे.  
                                                                                                
               इंग्रजांनी आपल्या पेशव्यांचे राज्य नष्ट केले हि बाब चित्पावन ब्राम्हण लोकांच्या दृष्टीने अत्यंत  दु:खाची होती. म्हणूनच इंग्रजांच्या विरुद्ध या देशातील पहिला उद्रेक झाला, तो १८५७ च्या  बंडाच्या रूपाने. या बंडात महत्वाचे पुढारी कोण होते ? या पुढा-यामध्ये ब्राम्हण अधिक होते. झाशीची राणी ब्राम्हण, तात्या टोपे ब्राम्हण, नानासाहेब पेशवे ब्राम्हण आणि ब्रिटीश     अधिका-यावर छावणीत पहिली गोळी झाडणारा मंगल पांडे हा देखील ब्राम्हणच. या १८५७ च्या बंडाला सावरकरांनी जे 'स्वातंत्र्यसमर' म्हणून गौरविले त्यालाही या   पार्श्वभूमीवर आणि सामाजिक संदर्भांत विशिष्ट अर्थ आहे. पुढील काळात इंग्रजांच्या  विरुद्ध जे लोक पुढे आले त्यामध्ये बंगाल मधील ब्राम्हण तरुण अधिक होते. महाराष्ट्रात वासुदेव  बळवंत, अनंत कान्हेरे, गोगटे, चाफेकर बंधू हि सारी मंडळी राष्ट्रवादी होती, पण त्यांच्या  राष्ट्रावादापेक्षा पेशव्यांचे राज्य नष्ट झाल्याचे गोळवरकराना जे दु:ख झाले त्या दु:खाशी  ते अधिक समरस होते. १८५७ च्या बंडाला सामाजिक पार्श्वभूमी फार मोठी होती. मंगल पांडे वगैरे लोकाना असे वाटत होते कि, ब्राह्मणांचे समाजातील वर्चस्व नष्ट करण्यासाठी  ब्रिटीश सर्व धोरणे आखीत आहेत. सैनिकी छावण्यातील सर्व जातींची समानता किंवा  डलहौसीच्या रेल्वेच्या सुधारणा हे सर्व त्यासाठीच आहे असा प्रचार करण्यात आला, म्हणूनच महात्मा ज्योतीराव फुल्यांनी या बंडास 'भट-पांड्याचे बंड' असे म्हटले होते आणि म्हणूनच या बंडामध्ये ब्रिटीशांचा विजय व्हावा असे फुल्यांना मनापासून वाटत होते.    
      
             तेव्हा कोरेगावच्या युद्धात महार ब्रिटीशांच्या बाजूने लढले, यावरून आपणास त्याना गुलामी  प्रवृत्तीचे लोक म्हणता येईल का  ? डॉ. आंबेडकरांनी अनेक ठिकाणी सांगितले होते कि, महार लोकांनी आपल्या चरीतार्थासाठी इंग्रजांच्या सैन्यात नोक-या धरल्या होत्या. वास्तविक महार सैनिकांची सैनिक परंपरा फार मोठी आहे. त्यांचा उल्लेख अलेक्झांडर रॉबर्टसनसारख्या विद्वानांनी स्वतंत्र पुस्तके लिहून केलेला आहे. मराठी राज्यांच्या काळात त्या राज्यांसाठी महारांनी अतुल असा पराक्रम केला आहे. आपल्या प्राणाचे अनेक ठिकाणी बलिदान दिले आहे. तेव्हा गोळवरकर गुरुजींनी डॉ. आंबेडकरांच्या विधानाला जी हरकत घेतली, जो विरोध केला त्यामध्ये कितपत तथ्य आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. परकीयांशी हातमिळवनी करून स्वकियांशी द्रोह केलेल्या अनेक हिंदूंची उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. राजा अंभी, जयचंद राठोड, राजा मानसिंह, राजा जयसिंह, चंद्रराव मोरे, स्वातंत्र्यलढ्याच्या काळातले भारतीय संस्थानिक, अशी अनेक ठळक उदाहरणे देशद्रोहाचा आणि स्वकीयांचा विश्वासघात करणा-यांचा इतिहास सांगतात. परंतु पोटासाठी लढणा-या महारांचे एकच एक उदाहरण हिंदुत्ववादी लोक कोरेगावच्या लढ्याच्या संदर्भात देत असतात आणि त्यांनी देशद्रोही म्हणून बदनाम करीत असतात हि एक आश्चर्यजनक बाब आहे. महार सैनिकांना एक उज्वल परंपरा या देशाच्या इतिहासात आहे. त्यांचा मात्र हे गोळवरकर प्रवृत्तीचे लोक सोयीस्करपणे उल्लेख टाळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्यांच्याही अगोदरपासून महार सैनिकांनी अनेक लढ्यात पराक्रम गाजविला आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे संरक्षण करण्याचे काम आणि त्याच बरोबर  किल्ल्यावरील तोफखाने चालविण्याचे काम महार, मांग इत्यादी जमातीतील सैनिकांनी अनेक वर्षे केले आहेत. राजाराम महाराजांच्या काळात मोगलांशी प्रचंड संघर्ष करून महार सैनिकांनी वैराटगड जिंकून घेतला आणि याप्रीतर्थ महाराजांनी अनेक महाराना पाटीलकीचे वतन दिले होते. पुढे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात (१६८३ ते १७०७) शिदानाक नावाच्या महाराने एक स्वतंत्र फलटण उभारून मोगालाविरुद्ध प्रचंड लढा दिला. याची बिदागी म्हणून महार सुभेदारास मिरजेजवळ कळंबी गाव इनाम म्हणून दिले. त्याचप्रमाणे शिदनाकचा नातू दुसरा शिदनाक याने १७९५ च्या खर्ड्याच्या लढाईत निजामाविरुद्ध अतुल पराक्रम गाजविला. पहिला बाजीराव आणि चिमाजी आप्पा ज्यावेळी वसईचा किल्ला लढवीत होते. त्यावेळी युद्धसामग्री आणि सैन्य समुद्राच्या पाण्यातून युद्धाच्या ठिकाणी पोहचविण्याचे अवघड आणि धाडसी काम महार सैनिकांनी केले. त्यापैकी सितामहार, फकीरा महार, बिरामहार, माणमहार, हंसामहार हे प्रमुख सैनिक  होते. 
                                           
              दुस-या बाजीरावाच्या काळात ब्रिटीशांनी एकदा रायगडावर हल्ला केला होता, त्यावेळी रायानाक नावाच्या महार रखवालदाराने १५ दिवस किल्ला लढवून किल्ल्याचे संरक्षण केले आणि शेवटी लढता लढता तो मरण पावला. अशा अनेक उदाहरणांनी या देशाचा इतिहास भरला आहे. महार सैनिकांची देशनिष्ठा, स्वामीनिष्ठा   आणि प्रामाणीकपणा हिंदुत्ववाद्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ कोरेगावच्या लढ्याचे उदाहरण पुढे करून त्याना गुलामी प्रवृत्तीचे लोक असे म्हणता येणार नाही.
संदर्भ - डॉ. आंबेडकरांचे विरोधक
           डॉ. दिनकर हेरलेकर

रविवार, १९ जून, २०१६

पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन

दिनांक २५ डिसेंबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भाषाणातील काही अंश

आज या ठिकाणी या छोट्याश्या मंदिरात भगवान बुद्धाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे एखादे मंदिर बांधण्यात आले तर त्यात भैरोबा, खंडोबा, मरीआई वगैरे नानाप्रकारच्या देवता ठेवल्या जातात. आपले लोक भाविक असल्यामुळे ते विष्णु, शिव अशात-हेच्या देवतांची स्थापना करतात. येथे आज हा नवीन देव आणून स्थापला आहे. आपल्यापैकी काही जणांनी भगवान बुद्धाचे नाव देखील ऐकले नसेल.
     
काही लोक म्हणतात की, हा नवीन देव कोठून आणला आहे. बुद्ध भगवंताचा हा धर्म या देशांमध्ये अत्यंत जुना आणि प्राचीन आहे. चीन, जापान, सयाम, इंग्लंड या बाहेरील देशातून हा धर्म येथे आणलेला नाही. या देवाला येथे कोणी आणले याबद्दलचा पहिला खुलासा असा करता येईल की, या देशातील पुरातन देवता आपल्याला ठिकठिकाणी सापडतात.
     
इतिहासाच्या काळामध्ये जी अनेक कारणे घडली त्यामुळे या धर्माचा लोप झाला.
     
बुद्ध धर्माला १९५६ साली अडीच हजार वर्षे पुरी होतील. हा धर्म साडेबाराशे वर्षे जिवंत होता; हे सिद्ध करण्यासाठी मी आज इतिहासातील पुरावा देणार आहे. पूर्वी या देशावर मुसलमानांच्या स्वा-या झाल्या. मुसलमान मूर्तिपूजक नसतात. त्यांनी बुद्ध धर्माच्या लोकांवर हल्ला चढविल्यामुळे हा धर्म खालावाला. अफगाणातील शंभर टक्के लोक बुद्ध धर्माचे होते. येथे बुद्ध धर्मात सात हजार भिक्षु होते. मुसलमानांनी त्यांच्यावर स्वा-या केल्या त्यावेळी त्या मुसलमानांपुढे दोनच प्रश्न होते. या देशातील लोकांनी मुसलमान धर्माचा स्वीकार करावा, हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न म्हणजे जो हा धर्म स्वीकारणार नाही त्यांची कत्तल करणे. त्यांनी या सात हजार भिंक्षुची कत्तल केली.
     
हा धर्म जिवंत होता तेव्हा तो फार प्रभावी होता. या देशात नालंदा विश्वविद्यालय होते. ज्ञानप्राप्ती करून देणे हे या धर्माचे तत्व होते. एक आचार्य व त्यांचे १० पोरे एकत्र बसत आणि ब्राम्हण शास्त्र शिकवित. अशी या धर्माची स्थिती नव्हती.
     
पहिले विश्वविद्यालय बौद्ध धर्मीय लोकांनी स्थापन केले. नालंदा विश्वविद्यालयात तेरा हजार विद्यार्थी व एक हजार अध्यापक होते. ब्राम्हण धर्म हा एकांगी होता. अन्य कारणांमुळे मुसलमानांच्या तडाख्यातून त्यांचा बचाव झाला. बौद्ध धर्माविरुद्ध ब्राम्हणांची कारस्थाने चालू होती. यामुळे तो खाली पडला.
     
तुमचा बौद्ध धर्म एवढा चांगला होता तर त्याचा ऱ्हास का झाला? असे माझे काही मित्र मला प्रश्न विचारतात. तेव्हा मी त्यांना असे विचारतो की, हा धर्म वाईट आहे म्हणून या धर्माचा ऱ्हास झाला असे म्हणावे तर चीन, जपान, कंबोडीया, सिलोन या देशांमध्ये या धर्माचा ऱ्हास का झाला नाही. तेथे अजून तो का टिकून आहे. या देशात हा धर्म नाहिसा झाला नाही तर त्याला निराळी वाळवी लागली असेल, कारस्थाने झाली असतील. सांगायचा मतलब असा की, त्याच्या निर्मितीपासून तो साडेबाराशे वर्षेपर्यंत यच्चयावत चालला होता. हा इतिहास इतिहासकारांनी लपवून ठेवला आहे. आपला महाराष्ट्र देशसुद्धा शंभर टक्के बौद्ध धर्मीय होता आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील पुरातनकाळच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येईल. भारतातील दोन हजार लेण्यांपैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत. ही लेणी म्हणजे बौद्ध भिंक्षुची राहण्याची ठिकाणे होती. महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत, असे सांगण्यात येते. परंतु विराटनगरी कोठे व पांडवांचे राज्य कोठे?
     
पंधरा हजार विहारातून सुमारे पस्तीस हजार भिक्षु राहत असत. जनतेकडून भिक्षा मागून ते आपली उपजीविका करीत. एक हजार दोनशे पन्नास वर्षे ते या प्रांतामध्ये होते. आपल्या वाडवडिलांपासून भगवंताची पूजा आपण करीत आलो आहो. हिंदू लोकांची धर्माची व्याख्या फार निराळी आहे. देवळात जाणे, घंटा वाजविणे, पूजा करणे आणि भटाला दोन पैसे देणे एवढेच या धर्माचे कार्य! जणू काही भटाच्या बापाचे ऋण फेडणे होय. परंतु हे काही आम्हाला जमले नाही विष्णूची पूजा करून विष्णू पावला नाही, शिवाच्या देवळात जाऊन शिव पावला नाही आणि मरीआई, म्हसोबा, खंडोबा तर पावलाच नाही. धर्माला नीतीचे बंधन हवे आहे. मनुष्याच्या पापी, दुराचारी वर्तनाला बंधन म्हणजेच धर्म!
     
कोणताही धर्म घेताना चोखाळून घेतला पाहिजे. धर्म म्हणजे बाजारपेठ आहे. ते विष्णूचे, ते शिवाचे, ते रामाचे दुकान आहे. तेथे पुजारी धुप, कापूर जाळत बसले आहेत. कृष्ण, राम, शिव, विष्णू यांचा धर्म हा असा धर्म आहे. धर्म मनुष्याचा उद्धार करतो. धर्म घात करण्याकरिता नसतो. आमची अवनती झाली असेल तर ती जातीभेदामुळे! जो धर्म जातीभेदाने बरबटलेला आहे, ज्या धर्मात असमानता आहे तो धर्म आम्ही कसा घेऊ? ज्या धर्मात समानता अधिष्ठित झाली आहे असा धर्म पाहिजे. बौद्ध धर्मात सर्वाना समान संधी व सर्वाना समान अधिकार दिलेला आहे. त्यात ऐक्यता आहे. भेदभाव नाही.
     
ह्या प्रसंगी आपणाला एका सुक्ताची आठवण करून द्यावीशी वाटते. ब्राम्हणाची पोरे होती, त्यांच्यामध्ये तत्वज्ञानाविषयी वाद चालू होता, 'ब्रम्ह हे घर आहे व आत्मा ब्रम्हाची छाया आहे.' ही सगळी पुराणातील वांगी आहेत. हा वाद मिटत नाही असे पाहून ती पोरे बुद्धाजवळ गेली. त्यांना ब्राम्हणांचे तत्वज्ञान पटलेले नव्हते. भगवंतानी त्यांना विचारले. हे ब्रम्ह सत्य आहे काय? तुम्ही ब्रम्ह पाहिले आहे काय? ते काही काळासाठी आहे की नित्य आहे! त्याचं रंगरूप कसं काय आहे? ते काही बोलते काय? त्याला चव आहे का सुगंध आहे? ते गुलाबाच्या फुलासारखे आहे की चाफ्याच्या? ते गोड आहे, तिखट आहे की आंबट आहे?
     
मनुष्यमात्राला सत्य कळण्याकरिता पाच इंद्रिये आहेत. डोळा, कान, नाक, जीभ वगैरे ती पाच इंद्रिये होत. डोळ्याने पाहता येते, कानाने ऐकायला येते नाकाने सुगंधित आहे की दुर्गंधित आहे असा वास कळतो. जिभेने खारट तिखट, आंबट चव कळते. पाच इंद्रियांची साक्ष ज्याला मिळते तेच सत्य. ब्रम्ह सत्य मानणे म्हणजे न पाहिलेल्या मुलीवर प्रेम करण्यासारखे आहे.
     
मला आपणाला दोन गोष्टी सांगावयाच्या आहेत. तुम्ही या धर्माचा स्वीकार कराल त्या दिवशी ब-याच गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. एकादशीला पंढरपूरला जाणे, द्वादशीला इतर क्षेत्राला जाणे बंद करायला हवेत. मला चांगली आठवण आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक येथे कुंड होते. या कुंडात फ़क्त पसाभर पाणी होते. यात्रेकरु लोक त्यात फड़के भिजवून घेऊन अंगाला चोळीत. अशा त-हेची खिचड़ी मी बौद्ध धर्मात होऊ देणार नाही. स्वच्छ पाण्यात घाणेरडे पाणी ओतता कामा नये. भगवान बुद्धाचा धर्म तोच आमचा धर्म, असा आता आम्ही निश्चय केला आहे. तुम्ही पंढरपुरला जाता, पांडुरंगाचे अभंग म्हणता. पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता यावर हुज्जत चालू आहे. पण माझा त्यांना खड़ा सवाल आहे की, विठ्ठलाची भानगड़ सोडून देऊन पंढरीचा पांडूरंग कोण? याचे पहिल्यांदा उत्तर द्या. तो होता कुठे? त्याला पळविलं कोणी? कोणी डुबविलं? पांडूरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करुन देईन. पुंडलीक या शब्दापासून पांडूरंग हा शब्द झाला. पुंडलीक याचा अर्थ कमळ. बौद्ध धर्मात मूर्तिपूजा नव्हती. अज्ञानी लोकांना तत्वज्ञान काय कळे! कमळाला पाली भाषेत पांडूरंग असे म्हणतात. तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राम्हणांनी बुद्धाच्या नावाचा लोप केला. मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी ही पांडव लेणी असल्याचे सांगतात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३