ईस्ट इंडिया कंपनीच्या आमदनीत एक खटला चालू होता. त्यातील वादीची बाजू खोटी असतांना खरी करण्याच्या हेतूने आणि वादीच्या बाजुला उपयोगी पडतील असे पुरावे तयार करण्यासाठी ब्राम्हणांनी एक नवी स्मृति संस्कृत भाषेत तयार केली होती हे मशहूर आहेच.
अशाप्रकारचे डावपेच खेळण्याचे हिंदुस्थानातील ब्राम्हणांना वावड़े नाही. विधवा स्त्रियांनी सती जावे असा ब्राम्हणांनी हेका धरला व या गोष्टीला ऋग्वेदातुन आधार काढण्यासाठी ऋग्वेदातील 'अग्रे' शब्दाला 'अग्ने' असे रूप ब्राम्हणांनी दिले ही हकीकत प्रो. मॅक्समुलर यांनी स्पष्टपणे सांगितली आहे. पुरोहितांनी अशाप्रकारच्या घालघुसडी धार्मिक ग्रंथात केल्या आहेत.
- 'शुद्र पूर्वी कोण होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ब्राम्हण त्यांच्या हातात असलेल्या प्रशासकीय किंवा धार्मिक अधिकाराचा कसा गैरवापर करतात किंवा खोटे पुरावे कसे सादर करतात याचे उदाहरण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शुद्र पूर्वी कोण होते?' मध्ये दिले आहे.
जर अशा लोकांच्या हातात देशाच्या संविधानिक संस्था असतील तर ते आपल्या फायद्यासाठी काहीही खोटेपणा करुन निरपराध लोकांना फसवू शकतात हे कोणीही नाकारु शकत नाही. परंतु अशा लोकांना सुद्धा आम्ही निष्पक्ष आहोत हे जगाला दाखवायचे असते किंवा त्यांच्यावर पक्षपाताचा आरोप झाला तर त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या विरोधकांना उत्तर देता यावे यासाठी एखादे उदाहरण असावे, म्हणून त्यांना एखाद्या वेळेस बहुजन समाजासाठी नाईलाजाने निष्पक्ष निर्णय घ्यावा लागतो. शंभरातून असा एखादा निष्पक्ष निर्णय घेऊन बाकी नव्यानव वेळा पक्षपात केला तरी, 'तुमच्या मतासारखे झाले तर निष्पक्ष आणि तुमच्या मनाविरुद्ध झाले तर पक्षपात' असा तर्क ते किंवा त्यांचे समर्थक करु शकतात. परंतु असे तर्क बालिश असतात. अशा तर्काना कोणीही भीक घालत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.