१९२१ - २२ च्या नवजीवन या गुजराती साप्ताहिकामधुन मा. गांधीजींचे विचार.
१) हिंदूसमाज जिवंत आहे याला कारण हिंदूसमाजाचा आधार जातीव्यवस्था आहे हे होय, असा माझा विश्वास आहे.
२) स्वराज्याची बिजे जातीव्यवस्थेत शोधावी लागतील. वेगवेगळ्या जाती या सेवेसाठी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या विभागासारख्या आहेत.
३) जी व्यवस्था जातीव्यवस्था निर्माण करु शकली त्या व्यवस्थेतच संघटन शक्तीची अमाप क्षमता आहे असेच म्हणावे लागते.
४) जातीव्यवस्था ही प्राथमिक शिक्षणाच्या प्रचार प्रसाराची सहज उपलब्ध व्यवस्था होय.
५) राष्ट्रीय एकात्मतेसाठी जातीजातीत रोटी बेटी व्यवहार आवश्यक आहेत यावर माझा विश्वास नाही. सहभोजनाने मैत्रीसंबंध प्रस्थापित होतात असे म्हटले जाते पण अनुभव मात्र याच्या विरुद्ध आहे. मल विसर्जन ही जशी घाणेरडी क्रिया आहे तशी अन्न ग्रहण ही सुद्धा घाणेरडी क्रिया आहे. फरक एवढाच की मल विसर्जनाची ही क्रिया निसर्गाचा आदेश म्हणून आपण पाळतो. तेव्हा ही क्रिया केल्यानंतर आपणास स्वस्थता लाभते तर भोजनानंतर मात्र आपण अस्वस्थ होतो. निसर्गाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी, मलविसर्जनासाठी आपणास एकांत हवा असतो त्याचप्रमाणे अन्न ग्रहण करण्याच्या क्रियेसाठी आपणास एकांताचीच गरज आहे.
६) जातीव्यवस्था जातीजातीत रोटी बेटी व्यवहाराची अनुमती देत नाही म्हणून जातीव्यवस्था वाईट आहे असे आपण म्हणू शकत नाही.
७) जातीव्यवस्था हे नियंत्रण व्यवस्थेचे दूसरे नाव आहे. आणि रोटी बेटी व्यवहार बंदी हा मर्यादाचाच एक प्रकार आहे.
८) जातीव्यवस्था नष्ट करुन यूरोपची पाश्चिमात्य सामाजिक व्यवस्था स्वीकारणे याचा अर्थ हिंदूंनी आपली पिढ्यान पिढ्या वंशपरंपरागत चालत आलेली रोजगाराच्या हमीची, जीवीकोपार्जनाची व्यवस्था त्यागने असाच होईल. हे तत्व या जातीव्यवस्थेचा आत्मा आहे. वंशपरंपरागत व्यवसाय शाश्वत तत्व आहे. हे बदलणे म्हणजे अव्यवस्था निर्माण करणे होय. मी जर माझ्या जीवनात ब्राम्हणाला ब्राम्हण म्हणू शकलो नाहीतर ब्राम्हणाचा मला काहीही उपयोग नाही. जर दररोज ब्राम्हणाचे शुद्रात आणि शुद्राचे ब्राम्हणात रूपांतर होऊ लागले तर, समाजात पूर्णपणे गोंधळाची व्यवस्था, अव्यवस्था निर्माण होईल.
९) जातीव्यवस्था ही समाजाची स्वाभाविक व्यवस्था होय. हिंदुस्थानात या व्यवस्थेला धर्माचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे. इतर देशांना जातीव्यवस्थेची उपयोगिता समजलीच नाही. म्हणून जातीव्यवस्थेचे जे लाभ हिंदुस्थानाला मिळतात त्या लाभापासून हे देश वंचित आहेत. हे माझे जातीव्यवस्थेसंबंधी विचार आहेत म्हणून जातीव्यवस्था नष्ट व्हावी यासाठी जे प्रयत्न करतात मी त्यांचा विरोध करतो.
१९२५ साली मा. गांधी हे वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते बनले. मा. गांधी यांनी त्यांना अभिप्रेत असलेली वर्णव्यवस्था खालील प्रकारे स्पष्ट केली. हा उतारा त्यांच्या या विषयावरील वर्णव्यवस्था या लेखातून घेण्यात आला आहे.
१) वर्णव्यवस्था ही जन्माधिष्ठित आहे असा माझा विश्वास आहे.
२) वर्णव्यवस्थेत शूद्रांना ज्ञानार्जनापासून किंवा युद्ध कौशल्य शिकण्यापासून परावृत्त करणारी अशी कोणतीही व्यवस्था नाही. या उलट क्षत्रियही सेवा करु शकतात. पण या वर्णव्यवस्थेचा असा आदेश आहे की, ज्ञानार्जनानंतरही शुद्राने त्या ज्ञानाचा जीवीकोपार्जनासाठी उपयोग करु नये. त्याचप्रमाणे ब्राम्हणही युद्ध किंवा व्यापाराची कला शिकू शकतात. पण ब्राम्हणानेही या कलांना आपल्या जीवीकोपार्जनाचे माध्यम बनवू नये. वैश्यही ज्ञानार्जन करु शकतो. युद्ध कला शिकू शकतो पण त्यानेही या कलांचा उपयोग जीवीकोपार्जनासाठी करु नये.
३) जीवीकोपार्जनासाठी वर्णव्यवस्थेने ठरवून दिलेला व्यवसायच स्वीकारला पाहिजे. याचा अर्थ त्याने जीवीकोपार्जण्यासाठी वाड-वडिलांचा व्यवसायच स्वीकारावयास हवा.
४) वर्णव्यवस्थेचा उद्देश स्पर्धा, वर्गसंघर्ष आणि वर्गयुद्ध टाळणे हा आहे. माझा वर्णव्यवस्थेवर विश्वास आहे कारण ही व्यवस्था माणसांची कर्तव्ये आणि व्यवसाय निश्चित करणारी व्यवस्था आहे.
५) वर्णव्यवस्थेत कोणालाही आपला व्यवसाय निवडावयाचे स्वातंत्र्य नाही. त्यांचा व्यवसाय त्यांच्याकरिता वंशपरंपरेने निर्धारित केला जातो.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(काँग्रेस आणि गांधीनी अस्पृश्यांप्रति काय केले?)
आणि लक्षात घ्या की, मा. गांधीनी हे विचार प्रकट करण्यापूर्वी ते इंग्लंड सारख्या देशात राहून बैरिस्टर ची डिग्री घेऊन आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.